ETV Bharat / bharat

Assam Floods : आसाममध्ये पूरपरिस्थिती बिकट.. अनेक ठिकाणी शेतजमिनी गेल्या वाहून.. मोठे नुकसान

author img

By

Published : Jun 23, 2022, 12:36 PM IST

आसाममध्ये पूरस्थिती बिकट बनली आहे. येथील, सोनितपूर जिल्ह्यातील मिसामरी येथील गभोरू नदीच्या परिसरातील आलेल्या पुरामुळे जमिनीची प्रचंड धूप सुरू ( Massive erosion of Gabhoru River in Misamari ) आहे. शेकडो हेक्टर शेतजमीन आणि घरे नदीत वाहून गेली आहेत.

Assam Floods
आसाममध्ये पूरपरिस्थिती

रंगपारा ( आसाम ) : शेजारच्या अरुणाचल प्रदेशातून वेगाने वाहणाऱ्या गवरू नदीच्या पुरामुळे सोनितपूरमध्ये मोठा पूर आला ( Massive erosion of Gabhoru River in Misamari ) आहे. मिसामरी येथील बांगलगाव आणि थेराजुली गावातील अनेक लोकांच्या जमिनी या नदीने आधीच वाहून गेल्या आहेत. नदीने नुकत्याच पाच कुटुंबांच्या जमिनी वाहून गेल्या.

त्याभागातील 1000 पेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका बसला आहे. गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळालेले निवासस्थानही नदीत वाहून गेले, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. स्वतःची काँक्रीटची घरे पडल्याने परिसरातील रहिवाशांना सुरक्षिततेसाठी पलायन करावे लागले आहे. नदीतील धूप रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना केल्या नसल्याने, ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जलसंपदा विभागाने नदीला पूर येऊ नये यासाठी लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास मिसमरी-थेलामरा जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यालाही धोका निर्माण होणार आहे. थेराजुली प्राथमिक शाळा आणि राधाकृष्ण धार्मिक संस्थेलाही या नदीमुळे धोका निर्माण झाला आहे. बाणगाव, मिसमरी येथे पूर येऊ नये यासाठी शासनाने कायमस्वरूपी पावले उचलली नसल्याची अनेक कारणे आहेत.

हेही वाचा : TMC protest outside Radisson Blu Hotel : बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर जोरदार गोंधळ.. आंदोलनाला सुरुवात

रंगपारा ( आसाम ) : शेजारच्या अरुणाचल प्रदेशातून वेगाने वाहणाऱ्या गवरू नदीच्या पुरामुळे सोनितपूरमध्ये मोठा पूर आला ( Massive erosion of Gabhoru River in Misamari ) आहे. मिसामरी येथील बांगलगाव आणि थेराजुली गावातील अनेक लोकांच्या जमिनी या नदीने आधीच वाहून गेल्या आहेत. नदीने नुकत्याच पाच कुटुंबांच्या जमिनी वाहून गेल्या.

त्याभागातील 1000 पेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका बसला आहे. गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळालेले निवासस्थानही नदीत वाहून गेले, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. स्वतःची काँक्रीटची घरे पडल्याने परिसरातील रहिवाशांना सुरक्षिततेसाठी पलायन करावे लागले आहे. नदीतील धूप रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना केल्या नसल्याने, ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जलसंपदा विभागाने नदीला पूर येऊ नये यासाठी लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास मिसमरी-थेलामरा जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यालाही धोका निर्माण होणार आहे. थेराजुली प्राथमिक शाळा आणि राधाकृष्ण धार्मिक संस्थेलाही या नदीमुळे धोका निर्माण झाला आहे. बाणगाव, मिसमरी येथे पूर येऊ नये यासाठी शासनाने कायमस्वरूपी पावले उचलली नसल्याची अनेक कारणे आहेत.

हेही वाचा : TMC protest outside Radisson Blu Hotel : बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर जोरदार गोंधळ.. आंदोलनाला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.