ETV Bharat / bharat

प्रियकराबरोबर पत्नी गेली पळून, पतीने 2 मुलींची केली हत्या - प्रियकराबरोबर पत्नी गेली पळून

पत्नी प्रियकरासह पळून गेल्यानंतर मुलींची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. कलबुर्गीतील बांबू बाजार येथील भोवी गल्ली येथे राहणारा लक्ष्मीकांता हा व्यवसायाने ऑटोचालक होता. आरोपीने अंजलीच्या प्रेमात पडल्यानंतर तिच्याशी लग्न केले होते. या जोडप्याला चार मुले होती.

प्रियकराबरोबर पत्नी गेली पळून, पतीने 2 मुलींची केली हत्या
प्रियकराबरोबर पत्नी गेली पळून, पतीने 2 मुलींची केली हत्या
author img

By

Published : Jun 30, 2022, 10:03 AM IST

कलबुर्गी: पत्नी आपल्या प्रियकरासह पळून गेल्यानंतर मुलींची हत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. कलबुर्गीतील बांबू बाजार येथील भोवी गल्ली येथे राहणारा लक्ष्मीकांता (३४) हा व्यवसायाने ऑटोचालक होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने अंजलीच्या प्रेमात पडल्यानंतर तिच्याशी लग्न केले होते. या जोडप्याला एकत्र चार मुले होती.

चार महिन्यांपूर्वी त्याची पत्नी आपल्या प्रियकरासह पळून गेली होती. आरोपीला गंभीर मानसिक आघात झाला आणि तेव्हापासून तो चिडलेल्या मानसिकतेत होता. त्याने दारूही घेतली. पत्नी पळून गेल्यानंतर मुले आजीच्या घरी राहत होती. मंगळवारी लक्ष्मीकांत आपल्या मुलांना भेटायला गेला आणि सोनी (१०) आणि मयुरी (८) या दोघांना एमबी नगरच्या एका उद्यानात घेऊन गेला. त्यांने दोघांची गळफास लावून हत्या केली.

आरोपीने आपल्या मुलांचे मृतदेह मागच्या सीटखाली ठेवले होते. तसाच रिक्षातून तो शहरभर फिरल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांचे असेही म्हणणे आहे की अनेकांनी त्यांच्या सीटखाली दोन मृतदेह असल्याची कल्पना नसतानाही त्याच्या ऑटोमध्ये प्रवास केला होता. बुधवारी दुपारपर्यंत तो संपूर्ण शहरात फिरला होता आणि नंतर पोलिसांनी त्याला पकडले.

कलबुर्गी: पत्नी आपल्या प्रियकरासह पळून गेल्यानंतर मुलींची हत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. कलबुर्गीतील बांबू बाजार येथील भोवी गल्ली येथे राहणारा लक्ष्मीकांता (३४) हा व्यवसायाने ऑटोचालक होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने अंजलीच्या प्रेमात पडल्यानंतर तिच्याशी लग्न केले होते. या जोडप्याला एकत्र चार मुले होती.

चार महिन्यांपूर्वी त्याची पत्नी आपल्या प्रियकरासह पळून गेली होती. आरोपीला गंभीर मानसिक आघात झाला आणि तेव्हापासून तो चिडलेल्या मानसिकतेत होता. त्याने दारूही घेतली. पत्नी पळून गेल्यानंतर मुले आजीच्या घरी राहत होती. मंगळवारी लक्ष्मीकांत आपल्या मुलांना भेटायला गेला आणि सोनी (१०) आणि मयुरी (८) या दोघांना एमबी नगरच्या एका उद्यानात घेऊन गेला. त्यांने दोघांची गळफास लावून हत्या केली.

आरोपीने आपल्या मुलांचे मृतदेह मागच्या सीटखाली ठेवले होते. तसाच रिक्षातून तो शहरभर फिरल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांचे असेही म्हणणे आहे की अनेकांनी त्यांच्या सीटखाली दोन मृतदेह असल्याची कल्पना नसतानाही त्याच्या ऑटोमध्ये प्रवास केला होता. बुधवारी दुपारपर्यंत तो संपूर्ण शहरात फिरला होता आणि नंतर पोलिसांनी त्याला पकडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.