ETV Bharat / bharat

महाकुंभमधून परतलेल्यासाठी राज्यांकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सहा संतांनी कुंभ संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. कुंभात मोठ्या संख्येने लोक संक्रमित झाल्याच्या वृत्तानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्यांकडून महाकुंभमधून परतलेल्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

author img

By

Published : Apr 18, 2021, 7:36 PM IST

Updated : Apr 18, 2021, 9:48 PM IST

Breaking News

नवी दिल्ली - देशातील कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत प्राणघातक ठरत आहे. दररोज नवीन रुग्णांचा रेकॉर्ड होत आहेत. रविवारी संसर्गाची 2 लाखापेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. महाकुंभमधील विविध आखाड्यांच्या 100 हून अधिक संतांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सहा संतांनी कुंभ संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. कुंभात मोठ्या संख्येने लोक संक्रमित झाल्याच्या वृत्तानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्यांकडून महाकुंभमधून परतलेल्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

दिल्ली -

हरिद्वार कुंभहून दिल्लीला येणार्‍या लोकांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा आदेश दिल्ली सरकारने जारी केला. त्याशिवाय 4 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत कुंभमेळ्यात जे उपस्थित होते, त्यांना आपली माहिती दिल्ली सरकारच्या www.delhi.gov.in वर 24 तासांच्या आत अपलोड करावी लागेल.

गुजरात -

अहमदाबाद कुंभात शाही स्नान करून गुजरातला परतणाऱ्यांना आरटी-पीसीआर तपासणीशिवाय प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. नकारात्मक आढळल्यासच शहरात जाण्याची परवानगी दिली जाईल. सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कुंभमेळ्यातून परतणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मध्य प्रदेश

कुंभमधून परतणाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश मध्य प्रदेश सरकारने दिले आहेत. गेल्या पाच दिवसांत, हरिद्वारमध्ये एकूण 2167 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

ओडिशा -

आरटीपीसीआर चाचणी आणि 14 दिवसांचे अलगीकरण कुंभमधून परतणाऱ्यांसाठी बंधनकारक आहे. याखेरीज कुंभात सामील झालेल्यांचा डेटा जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना सामायिक केला गेला आहे.

कर्नाटक -

हरिद्वारमधील कुंभमेळ्यातून परतणार्‍या कर्नाटकातील सर्व लोकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच त्यांनी 14 विलगीकरणात रहावे.

नवी दिल्ली - देशातील कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत प्राणघातक ठरत आहे. दररोज नवीन रुग्णांचा रेकॉर्ड होत आहेत. रविवारी संसर्गाची 2 लाखापेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. महाकुंभमधील विविध आखाड्यांच्या 100 हून अधिक संतांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सहा संतांनी कुंभ संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. कुंभात मोठ्या संख्येने लोक संक्रमित झाल्याच्या वृत्तानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्यांकडून महाकुंभमधून परतलेल्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

दिल्ली -

हरिद्वार कुंभहून दिल्लीला येणार्‍या लोकांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा आदेश दिल्ली सरकारने जारी केला. त्याशिवाय 4 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत कुंभमेळ्यात जे उपस्थित होते, त्यांना आपली माहिती दिल्ली सरकारच्या www.delhi.gov.in वर 24 तासांच्या आत अपलोड करावी लागेल.

गुजरात -

अहमदाबाद कुंभात शाही स्नान करून गुजरातला परतणाऱ्यांना आरटी-पीसीआर तपासणीशिवाय प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. नकारात्मक आढळल्यासच शहरात जाण्याची परवानगी दिली जाईल. सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कुंभमेळ्यातून परतणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मध्य प्रदेश

कुंभमधून परतणाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश मध्य प्रदेश सरकारने दिले आहेत. गेल्या पाच दिवसांत, हरिद्वारमध्ये एकूण 2167 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

ओडिशा -

आरटीपीसीआर चाचणी आणि 14 दिवसांचे अलगीकरण कुंभमधून परतणाऱ्यांसाठी बंधनकारक आहे. याखेरीज कुंभात सामील झालेल्यांचा डेटा जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना सामायिक केला गेला आहे.

कर्नाटक -

हरिद्वारमधील कुंभमेळ्यातून परतणार्‍या कर्नाटकातील सर्व लोकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच त्यांनी 14 विलगीकरणात रहावे.

Last Updated : Apr 18, 2021, 9:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.