ETV Bharat / bharat

Electricity Connection After 36 Years : 'हे' कुटुंब 36 वर्षांपासून होते अंधारात..आता मिळाले वीज कनेक्शन! वाचा रंजक कहानी - ३६ वर्षांनंतर वीज जोडणी

शेख कुटुंबीय कोलकाता येथील वॉर्ड क्रमांक 111 चे रहिवासी आहेत. आर्थिक क्षमतेअभावी त्यांना आजतागायत वीज जोडणी मिळू शकली नाही. मात्र आता मंत्री अरुप बिस्वास यांच्या मदतीने शुक्रवारी त्यांना एकदाचे वीज कनेक्शन मिळाले. (Family gets electricity connection after 36 years). (Kolkata Family gets electricity connection). वाचा संपूर्ण बातमी..

Electricity Connection After 36 Years
३६ वर्षांनंतर कुटुंबाला वीज मिळाली
author img

By

Published : Jan 7, 2023, 5:18 PM IST

कोलकाता : संध्याकाळ झाली की संपूर्ण कोलकाता शहर दिव्यांच्या उजेडाने उजळून निघते. मात्र शहराच्या दक्षिणेला असलेल्या ब्रह्मपूरमध्ये असलेल्या सकिना शेखचे घर इतके दिवस अंधारातच होते. गारियातील ब्रह्मपूर येथील शेख कुटुंब 36 वर्षे वीजेविना जगत होते. शेवटी आत्ता त्यांना एकदाचे वीज कनेक्शन मिळाले. इतक्या दिवसांनी वीज मिळाल्याने शेख यांचे सर्व कुटुंब आनंदित झाले आहे. (Family gets electricity connection after 36 years). (Kolkata Family gets electricity connection).

दैनंदिन कामांसाठी शेजाऱ्यांवर अवलंबून : कोलकात्याच्या कडाक्याच्या उन्हात पंख्याखाली किंवा एअर कंडिशनरखाली बसून आराम मिळावा म्हणून अशी एकच आशा या असहाय कुटुंबाची होती. शेख कुटुंबीय त्यांच्या माफक आर्थिक पार्श्वभूमीमुळे टी.व्ही पाहण्यासाठी किंवा मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी देखील शेजाऱ्यांवर अवलंबून होते. वीज जोडणी घेण्यासाठी लागणारी रक्कमही या कुटुंबाला भरता आली नाही. त्यामुळे शेख कुटुंबीयांनी वर्षानुवर्षे आपले आयुष्य अंधारात काढले.

ऊर्जामंत्र्यांनी घेतली दखल : राज्यमंत्री अरूप बिस्वास यांच्या मदतीने शुक्रवारी ब्रह्मपूर येथील शेख कुटुंबीयांच्या घरी वीज जोडणी आली. कोलकाता नगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 111 च्या ब्रह्मपूर जी ब्लॉकमध्ये त्यांचे घर उजळल्यानंतर घरातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला. कोलकात्याला लागून असलेल्या या भागात अलीकडच्या काळात विकासाची छटा दिसते आहे. सकीना शेख यांची मुलगी आणि जावईही त्यांच्यासोबत राहतात. काही दिवसांपूर्वी टोलीगंजचे आमदार आणि राज्याचे ऊर्जामंत्री अरूप बिस्वास यांनी ब्रह्मपूरला भेट देऊन सकीनाची असहायता पाहिली होती. कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अखत्यारीतील अशा प्रकरणामुळे बिस्वास यांना धक्का बसला आणि त्यांनी लगेच कारवाई केली. कुटुंबाला वीज जोडणी देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

दीर्घ प्रतीक्षेनंतर विजेचे कनेक्शन मिळाले : मंत्र्यांच्या सूचनेनंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली नाही. स्थानिक नगरसेवक संदीप दास यांच्या मदतीने कुटुंबाला त्वरीत वीज जोडणी मिळाली. अरुप बिस्वास यांच्या सूचनेनंतर, पार्षद संदीप दास यांनी वीज वितरण कंपनीशी बोलून आवश्यक ती सर्व प्रक्रिया पार पाडली. सकीनाच्या कुटुंबाला दीर्घ प्रतीक्षेनंतर बरीच मेहनत करून विजेचे कनेक्शन मिळाले आहे.

प्रशासनाने मदत केली : ईटीव्ही भारतशी बोलताना सकीना म्हणाल्या, 'मी येथे ३६ वर्षांपासून राहते आहे. वीज जोडणी घेण्याची आमची आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र मी कोणाची मदतही मागू शकत नाही. पण काळाची गरज नाकारता येत नाही. त्यामुळे मला माझ्या असहायतेची माहिती मंत्री आणि स्थानिक नगरसेवकाला सांगावी लागली. त्यांनी खूप मदत केली आहे. त्यांच्या मदतीने माझे घर अंधारातून मुक्त झाले'.

पिण्याच्या पाण्याची लाईनही टाकली : सकिनाच्या घरात विजेच्या जोडणीशिवाय पिण्याच्या पाण्याची लाईनही टाकण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 111 चे नगरसेवक संदीप दास म्हणाले, 'वीज जोडणी मिळाल्यानंतर या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू आले आहे, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आम्ही त्यांच्या घरी पिण्याच्या पाण्याच्या लाईनही पोहोचवल्या आहेत. जर मी लोकांच्या चेहऱ्यावर अशाप्रकारे हसू आणू शकलो, तर मी नगरसेवक म्हणून स्वतःला यशस्वी समजेन.'

कोलकाता : संध्याकाळ झाली की संपूर्ण कोलकाता शहर दिव्यांच्या उजेडाने उजळून निघते. मात्र शहराच्या दक्षिणेला असलेल्या ब्रह्मपूरमध्ये असलेल्या सकिना शेखचे घर इतके दिवस अंधारातच होते. गारियातील ब्रह्मपूर येथील शेख कुटुंब 36 वर्षे वीजेविना जगत होते. शेवटी आत्ता त्यांना एकदाचे वीज कनेक्शन मिळाले. इतक्या दिवसांनी वीज मिळाल्याने शेख यांचे सर्व कुटुंब आनंदित झाले आहे. (Family gets electricity connection after 36 years). (Kolkata Family gets electricity connection).

दैनंदिन कामांसाठी शेजाऱ्यांवर अवलंबून : कोलकात्याच्या कडाक्याच्या उन्हात पंख्याखाली किंवा एअर कंडिशनरखाली बसून आराम मिळावा म्हणून अशी एकच आशा या असहाय कुटुंबाची होती. शेख कुटुंबीय त्यांच्या माफक आर्थिक पार्श्वभूमीमुळे टी.व्ही पाहण्यासाठी किंवा मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी देखील शेजाऱ्यांवर अवलंबून होते. वीज जोडणी घेण्यासाठी लागणारी रक्कमही या कुटुंबाला भरता आली नाही. त्यामुळे शेख कुटुंबीयांनी वर्षानुवर्षे आपले आयुष्य अंधारात काढले.

ऊर्जामंत्र्यांनी घेतली दखल : राज्यमंत्री अरूप बिस्वास यांच्या मदतीने शुक्रवारी ब्रह्मपूर येथील शेख कुटुंबीयांच्या घरी वीज जोडणी आली. कोलकाता नगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 111 च्या ब्रह्मपूर जी ब्लॉकमध्ये त्यांचे घर उजळल्यानंतर घरातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला. कोलकात्याला लागून असलेल्या या भागात अलीकडच्या काळात विकासाची छटा दिसते आहे. सकीना शेख यांची मुलगी आणि जावईही त्यांच्यासोबत राहतात. काही दिवसांपूर्वी टोलीगंजचे आमदार आणि राज्याचे ऊर्जामंत्री अरूप बिस्वास यांनी ब्रह्मपूरला भेट देऊन सकीनाची असहायता पाहिली होती. कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अखत्यारीतील अशा प्रकरणामुळे बिस्वास यांना धक्का बसला आणि त्यांनी लगेच कारवाई केली. कुटुंबाला वीज जोडणी देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

दीर्घ प्रतीक्षेनंतर विजेचे कनेक्शन मिळाले : मंत्र्यांच्या सूचनेनंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली नाही. स्थानिक नगरसेवक संदीप दास यांच्या मदतीने कुटुंबाला त्वरीत वीज जोडणी मिळाली. अरुप बिस्वास यांच्या सूचनेनंतर, पार्षद संदीप दास यांनी वीज वितरण कंपनीशी बोलून आवश्यक ती सर्व प्रक्रिया पार पाडली. सकीनाच्या कुटुंबाला दीर्घ प्रतीक्षेनंतर बरीच मेहनत करून विजेचे कनेक्शन मिळाले आहे.

प्रशासनाने मदत केली : ईटीव्ही भारतशी बोलताना सकीना म्हणाल्या, 'मी येथे ३६ वर्षांपासून राहते आहे. वीज जोडणी घेण्याची आमची आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र मी कोणाची मदतही मागू शकत नाही. पण काळाची गरज नाकारता येत नाही. त्यामुळे मला माझ्या असहायतेची माहिती मंत्री आणि स्थानिक नगरसेवकाला सांगावी लागली. त्यांनी खूप मदत केली आहे. त्यांच्या मदतीने माझे घर अंधारातून मुक्त झाले'.

पिण्याच्या पाण्याची लाईनही टाकली : सकिनाच्या घरात विजेच्या जोडणीशिवाय पिण्याच्या पाण्याची लाईनही टाकण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 111 चे नगरसेवक संदीप दास म्हणाले, 'वीज जोडणी मिळाल्यानंतर या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू आले आहे, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आम्ही त्यांच्या घरी पिण्याच्या पाण्याच्या लाईनही पोहोचवल्या आहेत. जर मी लोकांच्या चेहऱ्यावर अशाप्रकारे हसू आणू शकलो, तर मी नगरसेवक म्हणून स्वतःला यशस्वी समजेन.'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.