ETV Bharat / bharat

Indore Temple Accident : मंदिर दुर्घटनेत 35 जणांनी गमावला जीव, जाणून घ्या इनसाईड स्टोरी

author img

By

Published : Mar 31, 2023, 6:52 AM IST

Updated : Mar 31, 2023, 7:17 AM IST

रामनवमीच्या मुहूर्तावर इंदूरच्या बेलेश्वर मंदिरात भीषण अपघात झाला. या घटनेत सुमारे 35 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 19 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तेथे अजूनही बचावकार्य सुरू आहे. अद्याप, एक भाविक बेपत्ता आहे. ही घटना कशी घडली आणि अपघाताच्या वेळी मंदिराच्या आत असलेल्या विहिरीची काय अवस्था होती, वाचा इनसाइड स्टोरी..

Indore Temple Accident
इंदूर मंदिर दुर्घटना
इंदूर मंदिर दुर्घटना इनसाइड स्टोरी

इंदूर (मध्य प्रदेश) : इंदूरमधील बेलेश्वर महादेव मंदिरात रामनवमीच्या दिवशी झालेल्या दूर्घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेमागची कहाणी समोर आली आहे जी अत्यंत धक्कादायक आहे. मंदिराच्या आवारातील पुरातन विहीर झाकण्यासाठी मंदिरातील काही कामगारांनी छताचा स्लॅब टाकला होता. एवढेच नव्हे तर पायरीच्या बाजूच्या रेलिंगवरही स्लॅबचा भार टाकण्यात आला होता. प्रचंड गर्दीचा भार उचलता न आल्याने रेलिंग व स्लॅब तुटून हा अपघात झाला.

  • Stepwell collapse at Indore temple | Death toll rises to 35

    18 people were admitted to the hospital, out of which 2 people have been discharged. 35 people died. One person is still missing. Army, NDRF & SDRF teams are conducting search & rescue operation: Indore Collector Dr… pic.twitter.com/3Ff6VzAkXs

    — ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी इंदूरमधील रामनवमी घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे. इंदूरच्या स्नेह नगरमध्ये महादेव मंदिराच्या आवारात जवळपास 7 दशकांपासून एक विहीर आहे. येथे लोक पूजा करण्यासाठी येतात. गेल्या महाशिवरात्रीलाही येथे हजारोंची गर्दी जमली होती. त्यानंतरही या विहिरीवर लोकांची ये-जा सुरू होती. असा अपघात महाशिवरात्रीला झाला असता तर मृतांची संख्या 200 वर पोहोचली असती, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

कसा घडला अपघात ? : रामनवमीच्या मुहूर्तावर भाविक पायरीवर झाकलेल्या स्लॅबवरबसून हवन करत होते. दुपारी बारा वाजेपर्यंत येथे लोकांची वर्दळ वाढत बावडीच्या स्लॅबवर भाविकांची संख्या शंभरच्या आसपास पोहोचली. यावेळी गर्दीचा भार उचलू न शकल्याने रेलिंगजवळील स्टेपवेलचा स्लॅब तुटला. त्यामुळे स्लॅबच्या अगदीवर बसलेले लोक विहिरीत पडले. तर रेलिंगजवळ बसलेले लोक कसेतरी बचावले. पायरीच्या स्लॅबमधील लोखंडी सळ्यांमुळे विहिरीत पडलेल्या लोकांना लगेच बाहेर पडता आले नाही. पाण्यात पडलेल्या काही लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र लॅबचा ढिगारा आणि इतर लोक वरून खाली पडल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. या घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. बचाव मोहिमेद्वारे त्यांचा शोध घेणे सुरू आहे.

हेही वाचा : Indore Temple Stepwell Collapsed : मध्यप्रदेशात मंदिरातल्या विहिरीवरील स्लॅब कोसळून अनेक भाविक पडले विहिरीत; 13 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

इंदूर मंदिर दुर्घटना इनसाइड स्टोरी

इंदूर (मध्य प्रदेश) : इंदूरमधील बेलेश्वर महादेव मंदिरात रामनवमीच्या दिवशी झालेल्या दूर्घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेमागची कहाणी समोर आली आहे जी अत्यंत धक्कादायक आहे. मंदिराच्या आवारातील पुरातन विहीर झाकण्यासाठी मंदिरातील काही कामगारांनी छताचा स्लॅब टाकला होता. एवढेच नव्हे तर पायरीच्या बाजूच्या रेलिंगवरही स्लॅबचा भार टाकण्यात आला होता. प्रचंड गर्दीचा भार उचलता न आल्याने रेलिंग व स्लॅब तुटून हा अपघात झाला.

  • Stepwell collapse at Indore temple | Death toll rises to 35

    18 people were admitted to the hospital, out of which 2 people have been discharged. 35 people died. One person is still missing. Army, NDRF & SDRF teams are conducting search & rescue operation: Indore Collector Dr… pic.twitter.com/3Ff6VzAkXs

    — ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी इंदूरमधील रामनवमी घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे. इंदूरच्या स्नेह नगरमध्ये महादेव मंदिराच्या आवारात जवळपास 7 दशकांपासून एक विहीर आहे. येथे लोक पूजा करण्यासाठी येतात. गेल्या महाशिवरात्रीलाही येथे हजारोंची गर्दी जमली होती. त्यानंतरही या विहिरीवर लोकांची ये-जा सुरू होती. असा अपघात महाशिवरात्रीला झाला असता तर मृतांची संख्या 200 वर पोहोचली असती, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

कसा घडला अपघात ? : रामनवमीच्या मुहूर्तावर भाविक पायरीवर झाकलेल्या स्लॅबवरबसून हवन करत होते. दुपारी बारा वाजेपर्यंत येथे लोकांची वर्दळ वाढत बावडीच्या स्लॅबवर भाविकांची संख्या शंभरच्या आसपास पोहोचली. यावेळी गर्दीचा भार उचलू न शकल्याने रेलिंगजवळील स्टेपवेलचा स्लॅब तुटला. त्यामुळे स्लॅबच्या अगदीवर बसलेले लोक विहिरीत पडले. तर रेलिंगजवळ बसलेले लोक कसेतरी बचावले. पायरीच्या स्लॅबमधील लोखंडी सळ्यांमुळे विहिरीत पडलेल्या लोकांना लगेच बाहेर पडता आले नाही. पाण्यात पडलेल्या काही लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र लॅबचा ढिगारा आणि इतर लोक वरून खाली पडल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. या घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. बचाव मोहिमेद्वारे त्यांचा शोध घेणे सुरू आहे.

हेही वाचा : Indore Temple Stepwell Collapsed : मध्यप्रदेशात मंदिरातल्या विहिरीवरील स्लॅब कोसळून अनेक भाविक पडले विहिरीत; 13 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Last Updated : Mar 31, 2023, 7:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.