ETV Bharat / bharat

IND vs WI 5th T20 : भारताचा वेस्ट इंडिजवर 88 धावांनी मोठा विजय; 4-1 च्या फरकाने जिंकली मालिका - IND vs WI 5th T20

श्रेयस अय्यर (64) आणि दीपक हुडा (38) आणि फिरकीपटूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने रविवारी येथे पाचव्या टी-20सामन्यात वेस्ट इंडिजचा 88 धावांनी पराभव ( WI lost by 88 runs against India ) करून मालिका 4-1 अशी जिंकली.

IND
IND
author img

By

Published : Aug 8, 2022, 12:34 PM IST

फ्लोरिडा: भारत आणि वेस्ट इंडिज संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी-20 सामना ( IND vs WI 5th T20 ), रविवारी लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने श्रेयस अय्यर (64) आणि दीपक हुडा (38) आणि फिरकीपटूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा 88 धावांनी पराभव ( India won by 88 runs ) केला.

त्याचबरोबर पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशा फरकाने आपल्या नावे केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्यानंतर विंडीजचा डाव 15.4 षटकांत 100 धावांत आटोपला. त्यामुळे भारतीय संघाने मोठा विजय नोंदवला.

भारतीय फिरकीपटूंची शानदार कामगिरी -

भारतीय फिरकीपटूंनी 9.2 षटकांत 43 धावांत सर्व 10 बळी घेतले. यामध्ये रवी विश्नोईने 2.4 षटकात 16 धावांत 4 बळी घेतले, तर डावखुऱ्या अक्षर पटेल ( Left-hander Akshar Patel ) आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजसाठी फक्त शिमरॉन हेटमायर (35 चेंडूत 56) हाच योगदान देऊ शकला. नियमित कर्णधार रोहितच्या जागी संघाची धुरा सांभाळणाऱ्या हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

श्रेयसचे दमदार अर्धशतक -

श्रेयसने 40 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह सलामीवीर इशान किशन ( Opener Ishan Kishan ) (13 चेंडूत 11 धावा), पहिल्या विकेटसाठी 38 आणि हुडाच्या दुसऱ्या विकेटसाठी 76 धावा ठोकल्या. हुडाने 25 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. शेवटच्या षटकात धावबाद होण्यापूर्वी कर्णधार हार्दिकने 16 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या.

ओडिन स्मिथची भेदक गोलंदाजी -

वेस्ट इंडिजकडून ओडिन स्मिथने ( Fast bowler Odean Smith ) चार षटकांत 33 धावा देत तीन बळी घेतले. या सामन्यात पुन्हा एकदा नव्या जोडीने भारतीय संघासाठी डावाची सुरुवात केली. अय्यरने किफायतशीर फटके केली, परंतु इशान संघातील संधीचे सोने करण्यात अपयशी ठरला. जेव्हा अय्यरआणि हुड्डा फलंदाजी करत होते तेव्हा संघ 200 हून अधिक धावांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत होते.

सामन्याच्या 14व्या षटकात विजेचा कडकडाट झाल्याने सामना 15 मिनिटे थांबवावा लागला. यावेळी भारतीय संघ तीन गड्यांच्या मोबदल्यात 135 धावा अशा चांगल्या स्थितीत होता पण अखेरच्या षटकांमध्ये संघाला अपेक्षेप्रमाणे वेगवान धावा करता आल्या नाहीत. संजू सॅमसन ( Batsman Sanju Samson ) (15 धावा) पुन्हा एकदा अपयशी ठरला, तर दिनेश कार्तिक (12 धावा) सलग दुसऱ्या सामन्यात फिनिशरची भूमिका बजावू शकला नाही.

श्रेयसने ( Batsman Shreyas Iyer ) डावाच्या सुरुवातीलाही आक्रमक खेळ केला. त्याने सलग दोन चौकार मारून डॉमिनिक ड्रेक्सविरुद्ध हात उघडले. इशान पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर हुडाने कीमो पॉलच्या चेंडूवर यष्टिरक्षकावरुन चौकार मारला. आठव्या षटकात श्रेयसने स्मिथविरुद्ध सलग दोन षटकार मारून धावगती जलद केली, तर हुडाने हेडन वॉल्शविरुद्ध किफायतशीर षटकार ठोकला.

त्याने ओबेद मॅकॉयच्या डोक्यावरुन आणखी एक शानदार षटकार ठोकला. याआधीच मालिका जिंकलेल्या भारतीय संघाने कर्णधार रोहित, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव या चार अनुभवी खेळाडूंच्या जागी इशान, कुलदीप, पंड्या आणि श्रेयसचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला होता.

हेही वाचा - Kamal-Sreeja Akula clinch Gold : शरथ कमल-श्रीजा अकुला यांना टेबल टेनिस मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक

फ्लोरिडा: भारत आणि वेस्ट इंडिज संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी-20 सामना ( IND vs WI 5th T20 ), रविवारी लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने श्रेयस अय्यर (64) आणि दीपक हुडा (38) आणि फिरकीपटूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा 88 धावांनी पराभव ( India won by 88 runs ) केला.

त्याचबरोबर पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशा फरकाने आपल्या नावे केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्यानंतर विंडीजचा डाव 15.4 षटकांत 100 धावांत आटोपला. त्यामुळे भारतीय संघाने मोठा विजय नोंदवला.

भारतीय फिरकीपटूंची शानदार कामगिरी -

भारतीय फिरकीपटूंनी 9.2 षटकांत 43 धावांत सर्व 10 बळी घेतले. यामध्ये रवी विश्नोईने 2.4 षटकात 16 धावांत 4 बळी घेतले, तर डावखुऱ्या अक्षर पटेल ( Left-hander Akshar Patel ) आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजसाठी फक्त शिमरॉन हेटमायर (35 चेंडूत 56) हाच योगदान देऊ शकला. नियमित कर्णधार रोहितच्या जागी संघाची धुरा सांभाळणाऱ्या हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

श्रेयसचे दमदार अर्धशतक -

श्रेयसने 40 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह सलामीवीर इशान किशन ( Opener Ishan Kishan ) (13 चेंडूत 11 धावा), पहिल्या विकेटसाठी 38 आणि हुडाच्या दुसऱ्या विकेटसाठी 76 धावा ठोकल्या. हुडाने 25 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. शेवटच्या षटकात धावबाद होण्यापूर्वी कर्णधार हार्दिकने 16 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या.

ओडिन स्मिथची भेदक गोलंदाजी -

वेस्ट इंडिजकडून ओडिन स्मिथने ( Fast bowler Odean Smith ) चार षटकांत 33 धावा देत तीन बळी घेतले. या सामन्यात पुन्हा एकदा नव्या जोडीने भारतीय संघासाठी डावाची सुरुवात केली. अय्यरने किफायतशीर फटके केली, परंतु इशान संघातील संधीचे सोने करण्यात अपयशी ठरला. जेव्हा अय्यरआणि हुड्डा फलंदाजी करत होते तेव्हा संघ 200 हून अधिक धावांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत होते.

सामन्याच्या 14व्या षटकात विजेचा कडकडाट झाल्याने सामना 15 मिनिटे थांबवावा लागला. यावेळी भारतीय संघ तीन गड्यांच्या मोबदल्यात 135 धावा अशा चांगल्या स्थितीत होता पण अखेरच्या षटकांमध्ये संघाला अपेक्षेप्रमाणे वेगवान धावा करता आल्या नाहीत. संजू सॅमसन ( Batsman Sanju Samson ) (15 धावा) पुन्हा एकदा अपयशी ठरला, तर दिनेश कार्तिक (12 धावा) सलग दुसऱ्या सामन्यात फिनिशरची भूमिका बजावू शकला नाही.

श्रेयसने ( Batsman Shreyas Iyer ) डावाच्या सुरुवातीलाही आक्रमक खेळ केला. त्याने सलग दोन चौकार मारून डॉमिनिक ड्रेक्सविरुद्ध हात उघडले. इशान पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर हुडाने कीमो पॉलच्या चेंडूवर यष्टिरक्षकावरुन चौकार मारला. आठव्या षटकात श्रेयसने स्मिथविरुद्ध सलग दोन षटकार मारून धावगती जलद केली, तर हुडाने हेडन वॉल्शविरुद्ध किफायतशीर षटकार ठोकला.

त्याने ओबेद मॅकॉयच्या डोक्यावरुन आणखी एक शानदार षटकार ठोकला. याआधीच मालिका जिंकलेल्या भारतीय संघाने कर्णधार रोहित, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव या चार अनुभवी खेळाडूंच्या जागी इशान, कुलदीप, पंड्या आणि श्रेयसचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला होता.

हेही वाचा - Kamal-Sreeja Akula clinch Gold : शरथ कमल-श्रीजा अकुला यांना टेबल टेनिस मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.