ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर गांधीजींच्या चरख्याला शेवटची घरघर

author img

By

Published : Oct 12, 2022, 7:10 PM IST

काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानाने लोकांच्या दैनंदिन जीवनात जोरदार प्रवेश केल्याने, चरख्याचे महत्त्व झपाट्याने कमी झाले आहे. खादीच्या कापडाच्या तुलनेत मशीनमध्ये खादी वेगाने बनवली जाते. हाताने विणकाम करून एका दिवसात जास्तीत जास्त 12 मीटर खादी तयार होते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर गांधीजींच्या चरख्याला शेवटची घरघर लागली आहे असेच त्यामुळे म्हणावे लागेल.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर गांधीजींच्या चरख्याला शेवटची घरघर
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर गांधीजींच्या चरख्याला शेवटची घरघर

अहमदाबाद - आपण भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे केले. यानिमित्ताने पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. तसेच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दाखवलेला प्रगतीशील मार्ग. ते म्हणाले होते, आपण वर्तमानात काय करतो यावर आपले भविष्य अवलंबून आहे. महात्मा गांधींनी अशा भारताचा विचार केला जो स्वावलंबी असेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लागेल. त्यांचा असा विश्वास होता की चरखा हा स्वावलंबी होण्याचा एक मार्ग आहे आणि तोच स्वातंत्र्य लढ्याचा केंद्रबिंदू होता. रोजगार निर्मितीच्या दृष्टीनेही या चरख्याचे चक्रच स्वतंत्र भारतासाठी आश्चर्यकारक काम केले, अशी त्यांना खात्री होती.

चरख्याचे महत्व कमी - गेल्या 75 वर्षात देशाने प्रगतीची उच्च शिखरे गाठली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील यांत्रिकीकरणामुळे चरख्याचे महत्व कमी झाले तरी पण वारसा मात्र कायम आहे. जर इतिहासाचा विचार केला तर, 25 मे 1915 रोजी भारतात परतल्यावर गांधीजींनी लोकांना चरख्याची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला होता. 1920 च्या मध्यापर्यंत चरख्याने लोकांच्या मनात प्रवेश केला होता. चरखा हा स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख प्रतीक म्हणून उदयास आला. सुरुवातीला चरख्यांवरच खादीचे कापड तयार झाले. आजही खादी उद्योगात जगात आपण आघाडीवर आहोत.

दिवसात जास्तीत जास्त 12 मीटर खादी - एकट्या गुजरातमध्ये, सुमारे 12.15 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. तिथे वार्षिक उत्पादन सुमारे 31.50 लाख बॉल्स ऑफ कॉटन अर्थात लिंट होते. त्याचे सुती कापड तयार होते. पूर्वी हे कापड चरख्यावर हाताने विणले जात होते. काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानाने लोकांच्या दैनंदिन जीवनात जोरदार प्रवेश केल्याने, चरख्याचे महत्त्व झपाट्याने कमी झाले आहे. अहमदाबादमधील इमाम मंझील येथे ५० वर्षांपासून खादी विणकर रणजीत यांनी ते गांधींच्या विचारांच्या मार्गाने कसे चालले होते यावर आपला अनुभव सांगितला. ते ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, मी 10 वर्षांपासून इमाम मंझिलमध्ये खादी विणत आहे. पूर्वी मी इतर ठिकाणी काम करायचो. खादी तयार करण्याचे काम हेच माझे उदरनिर्वाहाचे साधन आहे. खादीच्या कापडाच्या तुलनेत मशीनमध्ये खादी वेगाने बनवली जाते. हाताने विणकाम करून एका दिवसात जास्तीत जास्त 12 मीटर खादी तयार होते.

चरखा पूर्णपणे इतिहासजमा होणार - रणजीत यांनी सूत कातण्याची आणि विणकामाची कला वडिलांकडून शिकून घेतली. मात्र ते त्यांच्या सध्याच्या समस्यांबद्दल बोलणे टाळतात. रणजीत यांना दोन मुले आहेत. त्यांनी आता विणकाम सोडून खाजगी कंपनीत नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. विणकाम आणि मास स्पिनर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांचीही हीच अवस्था आहे. चरख्याला याचा फटका बसत आहे. जुनागढच्या मंगरूळ तालुक्यातील दिवासा गाव, जे पूर्वी पूर्णवेळ हाताने चरख्याद्वारे विणकाम आणि मास स्पिनिंगमध्ये कार्यरत होते. आता त्यांनीही ते काम सोडले आहे. गावात आता हातमाग आणि यांत्रिक मागांवर विणकाम केले जाते. ज्यामुळे गांधीजींचा चरखा पूर्णपणे इतिहासजमा होणार असे दिसते.

व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न - दिवासा गावातील विणकर अनेक वर्षांपासून हातमागावर कापड बनवत आहेत. पण एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात इथले विणकर सूतकताई आणि हातमाग व्यवसाय वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. एकेकाळी गावातील सर्व लोक हातमाग आणि चरख्याद्वारे कापड बनवून काम करत होते. येथे पंजाब, दिल्ली, हरियाणा, अहमदाबाद आणि जामनगर येथून कच्चा माल यायचा. सध्या शाल ही या परिसराची प्रमुख ओळख आहे. दिवासा गावातील विणकर सांगतात की ते पारंपारिक व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत. सध्याच्या फॅशन ट्रेंडसह, मिलच्या कपड्यांशी त्यांची तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे हातमागाचे कापड झपाट्याने मागे पडत आहे. सध्याच्या परिस्थितीत हे कापड व्यावसायिकदृष्ट्या अव्यवहार्य बनले आहे.

हातमाग कापड बनवण्यास सुरुवात - सुरेंद्रनगरकडे पाहिल्यात तिथेही यापेक्षा काही वेगळे चित्र दिसत नाही. सुरेंद्र नगर जिल्ह्यात सर्वाधिक कापूस उत्पादन होऊनही खादी उद्योगात मोठी घसरण होत आहे. घटत्या व्यवसायामुळे हात विणकर आता हातमाग विणकामाकडे वळले आहेत. सुरेंद्र नगरच्या मुळी तालुक्यातील गौतमगड येथील मूळ रहिवासी असलेले हिंमत डोलिया आजवर पिढ्यानपिढ्या हातमागावर कापड विणत होते. पण आता त्यांनी हा व्यवसाय सोडला आहे. या कुटुंबाने अलीकडे वडिलोपार्जित व्यवसाय सोडून हातमाग व्यवसाय सुरू केला आहे. हातमाग विणकर हिंमत डोलिया यांनी सांगितले की त्यांचे पूर्वज चरख्यावर काताईच्या माध्यमातून खादी विणत असत. परंतु खादीच्या किमतीत वाढ न झाल्याने आणि उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांनी त्याऐवजी हातमाग कापड बनवण्यास सुरुवात केली.

चूल पेटणेही मुश्किलीचे - पण तरीही त्याचा लाभ झाला नाही. यामुळे त्याला घर चालवणे आणि त्याच्या घरची चूल पेटणेही मुश्किलीचे झाले आहे. त्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. पॅकेजेस तसेच ग्राहकांना त्यांच्याकडून थेट वस्तू खरेदी करण्याची योजना देण्याचा प्रस्तावही दिला आहे. पण त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. हेच नाही तर इतर अशा अनेक असंख्य कुटुंबांनी उदरनिर्वाहासाठी पारंपरिक व्यवसायाला रामराम केला आहे. गुजरातमध्ये, वैयक्तिक विणकाम सध्या अहमदाबादमध्ये आढळते. तिथे चरखा कताई आता दुर्मीळ होत चालली आहे. पण सुरेंद्र नगर, लिबडी, धंधुका, लाठी आणि मेहसाणा आणि नवसारी येथे आजही हाताने विणकाम चालते. मात्र सामुहिकपणे फक्त अहमदाबादमध्येच विणकाम केले जाते, इतर कोठेही नाही.

रामजी बधिया - राज्यातील एकूण 10,000 विणकरांपैकी एक रामजी बधिया होते. ते त्यांची सुरस कथा सांगत की त्यांचे संपूर्ण कुटुंब कसे हाताने विणकाम करत होते. आता ही कथा सांगण्यासाठी रामजी हयात नाहीत, तर त्यांचा नातू हेमंत आता ही गोष्ट सांगतो. विशेष म्हणजे रामजी बधिया यांनीच गांधीजींना चरख्यावर सूत कसे कातायचे ते शिकवले होते. बापूंनी 1917 मध्ये कोचरबहून अहमदाबादमधील साबरमतीच्या काठावर त्यांचा आश्रम स्थलांतरित केला होता. तेव्हाच त्यांनी हातमाग विकत घेतला. पण राष्ट्रपिता यांना तो हाताळणे कठीण झाले. मग ते काम रामजींवर येऊन पडले. गांधीजींच्या विनंतीवरुन, रामजी आणि त्यांची पत्नी आणि मुले त्यांचे मूळ गाव लाठी सोडून आश्रमात स्थायिक झाले आणि तेथे विणकाम सुरू केले. त्यावेळी गांधीजी हे रामजी बधिया यांचे पहिले विणकाम करणारे विद्यार्थी होते. सर्व आश्रमवासी देखील ही कला शिकू लागले, असे रामजींचा नातू हेमंत याने ईटीव्ही भारतला सांगितले.

हेमंतच्या मते, इतर कापडाच्या तुलनेत हातमाग खादी उन्हाळ्यात थंडावा अधिक परिणामकारकपणे देते. इमाम मंझिल येथे परदेशीही खादी खरेदीसाठी येतात. लोक ती परदेशात घेऊन जातात आणि तिथे नफा कमावतात. अहमदाबादमध्ये 40 हून अधिक खादीची दुकाने आहेत. खादीचे कापड एका दिवसात हजारो मीटरवर मशीनवर बनवता येते. हाताने विणकाम करून, दोन लोक दिवसभरात फक्त 12 ते 15 मीटर कापड बनवू शकतात. व्यवसायाच्या दृष्टीने याचा किती मोठा फटका बसतो ते प्रत्येकानेच पाहिले पाहिजे.

बापूंचे मूल्य चिरंतन - चरखा चालवून उदरनिर्वाह करणे हे आता एक कठीण काम झाले आहे. गांधी आश्रमाचे सचिव अमृत मोदी यांच्या मते, बापूंचे मूल्य चिरंतन होते. ते शतकानुशतके टिकेल. आजचा काळ झपाट्याने बदलत आहे. मानवावर तंत्रज्ञानाचा प्रभाव आजच्या काळात प्रचंड आहे. त्यामुळे आता विणकाम हाताने नव्हे तर यंत्राने केले जाते. जेव्हा बापूंनी सूत काताईला सुरुवात केली तेव्हा त्यांचा मुख्य उद्देश लोकांना रोजगार देणे हा होता, असेही अमृत मोदींनी ईटीव्ही भारतला सांगितले.

गांधीजी अनेकदा चरख्यासोबत स्वावलंबनाबाबत बोलले आहेत. त्यांना कापसातील दरिद्री नारायणाला बाहेर काढायचे होते. स्वावलंबनांच्या मार्गाने सूत कताई करुन स्वतः बनवलेले कपडे वापरणे हा त्यामागील उद्देश होता. गांधीजींच्या काळात, आपल्या देशातील बहुतेक लोक शेतीवर अवलंबून होते. जे प्रामुख्याने निसर्गाच्या भरोश्यावर होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी बापूंनी चरखा लोकांसमोर ठेवला होता. गांधीजींच्या काळात चालणारे चरखे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येत होते. जर चरखा खराब झाला, तर तो स्वतःच दुरुस्त करू शकतो. त्यावेळी गांधीजी चरख्याबद्दल माहिती देण्यासाठी भारतभर फिरत होते, असेही अमृत मोदींनी स्पष्ट केले.

एकेकाळची आपली चमक आणि उपयुक्तता गमावूनही, गांधीकुटीर हृदयकुंजच्या लॉबीमध्ये ठेवलेला चरखा केवळ देशवासीयांसाठीच नाही तर परदेशी मान्यवरांसाठीही विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि नुकतेच हत्या झालेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे या जागतिक नेत्यांनी गांधीजींच्या चरख्यावर हात आजमावला आहे.

त्यांच्यासाठी चरखा फिरवणे ही एक प्रतीकात्मक कृती आहे. मात्र त्यांनी दिलेला संदेश आजही गांधीवादी मूल्ये जिवंत ठेवण्याचा होता, हे विसरता येणार नाही. हृदयकुंजच्या संवाद प्रभारी लताबेन परमार यांनी सांगितले की, 14व्या शतकात सूतकताईवर विणकाम सुरू झाले. १९१५ मध्ये गांधीजी आफ्रिकेतून परतले आणि त्यांनी चरख्याचा वेध घेतला. गायकवाड प्रांतातील विधवा गंगाबहेन यांनी बापूंना चरखा भेट दिला. बापू तासन्तास बसून चरखा चालवण्याचा प्रयत्न करत होते. पण चरखा चालवण्याच्या संथ प्रक्रियेमुळे बापूंनी आधुनिक चरखा बनवण्याची तयारी केली. त्यानंतर असा चरखा बनवणाऱया विजेत्यासाठी 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, असेही परमर यांनी स्पष्ट केले.

गुजरात राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ मात्र विपरित घटनाक्रमामुळे हतबल असल्याचे दिसते. मंडळाचा विणकरांशी फारसा संपर्क नाही. मंडळाद्वारे फक्त त्या संस्थांना किंवा सोसायट्यांना चरखा दिला जातो, ज्यांच्याकडे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे प्रमाणपत्र आहे. राज्यात अशा एकूण 207 संस्था अस्तित्वात आहेत. व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या 8 तारांच्या चरख्याची किंमत 15,000 रुपये आहे. तसेच 25 किंवा त्याहून अधिक चरख्याची मागणी करणाऱ्या संस्थांना चरखा दिला जातो. यातील 65 टक्के रक्कम सरकार आणि 35 टक्के रक्कम त्या संस्थांकडून घेतली जाते.

अत्यंत तुटपुंजा पगार - कारागिरांबद्दल जितके सांगावे तितके कमी आहे. त्यांना अत्यंत तुटपुंजा पगार मिळतो. रेकॉर्डसाठी सांगायचे झाले तर, 3 रुपये प्रति लूम स्पेशल स्पिनिंग सहाय्य म्हणून, 6 रुपये विशेष विणकाम सहाय्य आणि 2 रुपये विणकाम सहाय्य म्हणून दिले जातात. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, 2011 ते 2015 या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण खादीचे उत्पादन 37.146 कोटी रुपयांचे आणि विक्री 56.546 कोटी रुपययांची झाली आहे. तसेच यातून एकूण 9,966 रोजगार निर्मिती झाली.

व्यवसायिकताही रसातळाला - शिक्षणाचा विचार केला तर चरखा गुजरातमधील सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषय आहे. पण हा विषय केवळ अभ्यासक्रमापुरताच मर्यादित राहिला आहे. गुजरात विद्यापीठात सकाळच्या प्रार्थनेदरम्यान विद्यार्थ्यांना चरखा फिरवावा लागतो. तो फक्त सुमारे 15 मिनिटांसाठी. गांधीजींच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी खादी विकत घेतात. ती एक प्रतिकात्मक कृती असते. मात्र ती खादी यंत्रमाग निर्मित असते. त्यामुळे खरा उद्देश पूर्ण होत नाही. त्यातून केवळ महात्मा गांधींजींच्या मूल्यांचा प्रसार होतो. याचा सारांश काढला तर एकच म्हणावे लागेल की चरख्याने नुसती चमकच गमावली नाही तर त्याची व्यवसायिकताही रसातळाला गेली आहे.

अहमदाबाद - आपण भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे केले. यानिमित्ताने पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. तसेच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दाखवलेला प्रगतीशील मार्ग. ते म्हणाले होते, आपण वर्तमानात काय करतो यावर आपले भविष्य अवलंबून आहे. महात्मा गांधींनी अशा भारताचा विचार केला जो स्वावलंबी असेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लागेल. त्यांचा असा विश्वास होता की चरखा हा स्वावलंबी होण्याचा एक मार्ग आहे आणि तोच स्वातंत्र्य लढ्याचा केंद्रबिंदू होता. रोजगार निर्मितीच्या दृष्टीनेही या चरख्याचे चक्रच स्वतंत्र भारतासाठी आश्चर्यकारक काम केले, अशी त्यांना खात्री होती.

चरख्याचे महत्व कमी - गेल्या 75 वर्षात देशाने प्रगतीची उच्च शिखरे गाठली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील यांत्रिकीकरणामुळे चरख्याचे महत्व कमी झाले तरी पण वारसा मात्र कायम आहे. जर इतिहासाचा विचार केला तर, 25 मे 1915 रोजी भारतात परतल्यावर गांधीजींनी लोकांना चरख्याची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला होता. 1920 च्या मध्यापर्यंत चरख्याने लोकांच्या मनात प्रवेश केला होता. चरखा हा स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख प्रतीक म्हणून उदयास आला. सुरुवातीला चरख्यांवरच खादीचे कापड तयार झाले. आजही खादी उद्योगात जगात आपण आघाडीवर आहोत.

दिवसात जास्तीत जास्त 12 मीटर खादी - एकट्या गुजरातमध्ये, सुमारे 12.15 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. तिथे वार्षिक उत्पादन सुमारे 31.50 लाख बॉल्स ऑफ कॉटन अर्थात लिंट होते. त्याचे सुती कापड तयार होते. पूर्वी हे कापड चरख्यावर हाताने विणले जात होते. काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानाने लोकांच्या दैनंदिन जीवनात जोरदार प्रवेश केल्याने, चरख्याचे महत्त्व झपाट्याने कमी झाले आहे. अहमदाबादमधील इमाम मंझील येथे ५० वर्षांपासून खादी विणकर रणजीत यांनी ते गांधींच्या विचारांच्या मार्गाने कसे चालले होते यावर आपला अनुभव सांगितला. ते ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, मी 10 वर्षांपासून इमाम मंझिलमध्ये खादी विणत आहे. पूर्वी मी इतर ठिकाणी काम करायचो. खादी तयार करण्याचे काम हेच माझे उदरनिर्वाहाचे साधन आहे. खादीच्या कापडाच्या तुलनेत मशीनमध्ये खादी वेगाने बनवली जाते. हाताने विणकाम करून एका दिवसात जास्तीत जास्त 12 मीटर खादी तयार होते.

चरखा पूर्णपणे इतिहासजमा होणार - रणजीत यांनी सूत कातण्याची आणि विणकामाची कला वडिलांकडून शिकून घेतली. मात्र ते त्यांच्या सध्याच्या समस्यांबद्दल बोलणे टाळतात. रणजीत यांना दोन मुले आहेत. त्यांनी आता विणकाम सोडून खाजगी कंपनीत नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. विणकाम आणि मास स्पिनर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांचीही हीच अवस्था आहे. चरख्याला याचा फटका बसत आहे. जुनागढच्या मंगरूळ तालुक्यातील दिवासा गाव, जे पूर्वी पूर्णवेळ हाताने चरख्याद्वारे विणकाम आणि मास स्पिनिंगमध्ये कार्यरत होते. आता त्यांनीही ते काम सोडले आहे. गावात आता हातमाग आणि यांत्रिक मागांवर विणकाम केले जाते. ज्यामुळे गांधीजींचा चरखा पूर्णपणे इतिहासजमा होणार असे दिसते.

व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न - दिवासा गावातील विणकर अनेक वर्षांपासून हातमागावर कापड बनवत आहेत. पण एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात इथले विणकर सूतकताई आणि हातमाग व्यवसाय वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. एकेकाळी गावातील सर्व लोक हातमाग आणि चरख्याद्वारे कापड बनवून काम करत होते. येथे पंजाब, दिल्ली, हरियाणा, अहमदाबाद आणि जामनगर येथून कच्चा माल यायचा. सध्या शाल ही या परिसराची प्रमुख ओळख आहे. दिवासा गावातील विणकर सांगतात की ते पारंपारिक व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत. सध्याच्या फॅशन ट्रेंडसह, मिलच्या कपड्यांशी त्यांची तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे हातमागाचे कापड झपाट्याने मागे पडत आहे. सध्याच्या परिस्थितीत हे कापड व्यावसायिकदृष्ट्या अव्यवहार्य बनले आहे.

हातमाग कापड बनवण्यास सुरुवात - सुरेंद्रनगरकडे पाहिल्यात तिथेही यापेक्षा काही वेगळे चित्र दिसत नाही. सुरेंद्र नगर जिल्ह्यात सर्वाधिक कापूस उत्पादन होऊनही खादी उद्योगात मोठी घसरण होत आहे. घटत्या व्यवसायामुळे हात विणकर आता हातमाग विणकामाकडे वळले आहेत. सुरेंद्र नगरच्या मुळी तालुक्यातील गौतमगड येथील मूळ रहिवासी असलेले हिंमत डोलिया आजवर पिढ्यानपिढ्या हातमागावर कापड विणत होते. पण आता त्यांनी हा व्यवसाय सोडला आहे. या कुटुंबाने अलीकडे वडिलोपार्जित व्यवसाय सोडून हातमाग व्यवसाय सुरू केला आहे. हातमाग विणकर हिंमत डोलिया यांनी सांगितले की त्यांचे पूर्वज चरख्यावर काताईच्या माध्यमातून खादी विणत असत. परंतु खादीच्या किमतीत वाढ न झाल्याने आणि उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांनी त्याऐवजी हातमाग कापड बनवण्यास सुरुवात केली.

चूल पेटणेही मुश्किलीचे - पण तरीही त्याचा लाभ झाला नाही. यामुळे त्याला घर चालवणे आणि त्याच्या घरची चूल पेटणेही मुश्किलीचे झाले आहे. त्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. पॅकेजेस तसेच ग्राहकांना त्यांच्याकडून थेट वस्तू खरेदी करण्याची योजना देण्याचा प्रस्तावही दिला आहे. पण त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. हेच नाही तर इतर अशा अनेक असंख्य कुटुंबांनी उदरनिर्वाहासाठी पारंपरिक व्यवसायाला रामराम केला आहे. गुजरातमध्ये, वैयक्तिक विणकाम सध्या अहमदाबादमध्ये आढळते. तिथे चरखा कताई आता दुर्मीळ होत चालली आहे. पण सुरेंद्र नगर, लिबडी, धंधुका, लाठी आणि मेहसाणा आणि नवसारी येथे आजही हाताने विणकाम चालते. मात्र सामुहिकपणे फक्त अहमदाबादमध्येच विणकाम केले जाते, इतर कोठेही नाही.

रामजी बधिया - राज्यातील एकूण 10,000 विणकरांपैकी एक रामजी बधिया होते. ते त्यांची सुरस कथा सांगत की त्यांचे संपूर्ण कुटुंब कसे हाताने विणकाम करत होते. आता ही कथा सांगण्यासाठी रामजी हयात नाहीत, तर त्यांचा नातू हेमंत आता ही गोष्ट सांगतो. विशेष म्हणजे रामजी बधिया यांनीच गांधीजींना चरख्यावर सूत कसे कातायचे ते शिकवले होते. बापूंनी 1917 मध्ये कोचरबहून अहमदाबादमधील साबरमतीच्या काठावर त्यांचा आश्रम स्थलांतरित केला होता. तेव्हाच त्यांनी हातमाग विकत घेतला. पण राष्ट्रपिता यांना तो हाताळणे कठीण झाले. मग ते काम रामजींवर येऊन पडले. गांधीजींच्या विनंतीवरुन, रामजी आणि त्यांची पत्नी आणि मुले त्यांचे मूळ गाव लाठी सोडून आश्रमात स्थायिक झाले आणि तेथे विणकाम सुरू केले. त्यावेळी गांधीजी हे रामजी बधिया यांचे पहिले विणकाम करणारे विद्यार्थी होते. सर्व आश्रमवासी देखील ही कला शिकू लागले, असे रामजींचा नातू हेमंत याने ईटीव्ही भारतला सांगितले.

हेमंतच्या मते, इतर कापडाच्या तुलनेत हातमाग खादी उन्हाळ्यात थंडावा अधिक परिणामकारकपणे देते. इमाम मंझिल येथे परदेशीही खादी खरेदीसाठी येतात. लोक ती परदेशात घेऊन जातात आणि तिथे नफा कमावतात. अहमदाबादमध्ये 40 हून अधिक खादीची दुकाने आहेत. खादीचे कापड एका दिवसात हजारो मीटरवर मशीनवर बनवता येते. हाताने विणकाम करून, दोन लोक दिवसभरात फक्त 12 ते 15 मीटर कापड बनवू शकतात. व्यवसायाच्या दृष्टीने याचा किती मोठा फटका बसतो ते प्रत्येकानेच पाहिले पाहिजे.

बापूंचे मूल्य चिरंतन - चरखा चालवून उदरनिर्वाह करणे हे आता एक कठीण काम झाले आहे. गांधी आश्रमाचे सचिव अमृत मोदी यांच्या मते, बापूंचे मूल्य चिरंतन होते. ते शतकानुशतके टिकेल. आजचा काळ झपाट्याने बदलत आहे. मानवावर तंत्रज्ञानाचा प्रभाव आजच्या काळात प्रचंड आहे. त्यामुळे आता विणकाम हाताने नव्हे तर यंत्राने केले जाते. जेव्हा बापूंनी सूत काताईला सुरुवात केली तेव्हा त्यांचा मुख्य उद्देश लोकांना रोजगार देणे हा होता, असेही अमृत मोदींनी ईटीव्ही भारतला सांगितले.

गांधीजी अनेकदा चरख्यासोबत स्वावलंबनाबाबत बोलले आहेत. त्यांना कापसातील दरिद्री नारायणाला बाहेर काढायचे होते. स्वावलंबनांच्या मार्गाने सूत कताई करुन स्वतः बनवलेले कपडे वापरणे हा त्यामागील उद्देश होता. गांधीजींच्या काळात, आपल्या देशातील बहुतेक लोक शेतीवर अवलंबून होते. जे प्रामुख्याने निसर्गाच्या भरोश्यावर होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी बापूंनी चरखा लोकांसमोर ठेवला होता. गांधीजींच्या काळात चालणारे चरखे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येत होते. जर चरखा खराब झाला, तर तो स्वतःच दुरुस्त करू शकतो. त्यावेळी गांधीजी चरख्याबद्दल माहिती देण्यासाठी भारतभर फिरत होते, असेही अमृत मोदींनी स्पष्ट केले.

एकेकाळची आपली चमक आणि उपयुक्तता गमावूनही, गांधीकुटीर हृदयकुंजच्या लॉबीमध्ये ठेवलेला चरखा केवळ देशवासीयांसाठीच नाही तर परदेशी मान्यवरांसाठीही विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि नुकतेच हत्या झालेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे या जागतिक नेत्यांनी गांधीजींच्या चरख्यावर हात आजमावला आहे.

त्यांच्यासाठी चरखा फिरवणे ही एक प्रतीकात्मक कृती आहे. मात्र त्यांनी दिलेला संदेश आजही गांधीवादी मूल्ये जिवंत ठेवण्याचा होता, हे विसरता येणार नाही. हृदयकुंजच्या संवाद प्रभारी लताबेन परमार यांनी सांगितले की, 14व्या शतकात सूतकताईवर विणकाम सुरू झाले. १९१५ मध्ये गांधीजी आफ्रिकेतून परतले आणि त्यांनी चरख्याचा वेध घेतला. गायकवाड प्रांतातील विधवा गंगाबहेन यांनी बापूंना चरखा भेट दिला. बापू तासन्तास बसून चरखा चालवण्याचा प्रयत्न करत होते. पण चरखा चालवण्याच्या संथ प्रक्रियेमुळे बापूंनी आधुनिक चरखा बनवण्याची तयारी केली. त्यानंतर असा चरखा बनवणाऱया विजेत्यासाठी 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, असेही परमर यांनी स्पष्ट केले.

गुजरात राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ मात्र विपरित घटनाक्रमामुळे हतबल असल्याचे दिसते. मंडळाचा विणकरांशी फारसा संपर्क नाही. मंडळाद्वारे फक्त त्या संस्थांना किंवा सोसायट्यांना चरखा दिला जातो, ज्यांच्याकडे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे प्रमाणपत्र आहे. राज्यात अशा एकूण 207 संस्था अस्तित्वात आहेत. व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या 8 तारांच्या चरख्याची किंमत 15,000 रुपये आहे. तसेच 25 किंवा त्याहून अधिक चरख्याची मागणी करणाऱ्या संस्थांना चरखा दिला जातो. यातील 65 टक्के रक्कम सरकार आणि 35 टक्के रक्कम त्या संस्थांकडून घेतली जाते.

अत्यंत तुटपुंजा पगार - कारागिरांबद्दल जितके सांगावे तितके कमी आहे. त्यांना अत्यंत तुटपुंजा पगार मिळतो. रेकॉर्डसाठी सांगायचे झाले तर, 3 रुपये प्रति लूम स्पेशल स्पिनिंग सहाय्य म्हणून, 6 रुपये विशेष विणकाम सहाय्य आणि 2 रुपये विणकाम सहाय्य म्हणून दिले जातात. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, 2011 ते 2015 या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण खादीचे उत्पादन 37.146 कोटी रुपयांचे आणि विक्री 56.546 कोटी रुपययांची झाली आहे. तसेच यातून एकूण 9,966 रोजगार निर्मिती झाली.

व्यवसायिकताही रसातळाला - शिक्षणाचा विचार केला तर चरखा गुजरातमधील सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषय आहे. पण हा विषय केवळ अभ्यासक्रमापुरताच मर्यादित राहिला आहे. गुजरात विद्यापीठात सकाळच्या प्रार्थनेदरम्यान विद्यार्थ्यांना चरखा फिरवावा लागतो. तो फक्त सुमारे 15 मिनिटांसाठी. गांधीजींच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी खादी विकत घेतात. ती एक प्रतिकात्मक कृती असते. मात्र ती खादी यंत्रमाग निर्मित असते. त्यामुळे खरा उद्देश पूर्ण होत नाही. त्यातून केवळ महात्मा गांधींजींच्या मूल्यांचा प्रसार होतो. याचा सारांश काढला तर एकच म्हणावे लागेल की चरख्याने नुसती चमकच गमावली नाही तर त्याची व्यवसायिकताही रसातळाला गेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.