ETV Bharat / bharat

'सकारात्मकता हा तर मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी मोदींनी केलेला PR स्टंट'

author img

By

Published : May 27, 2021, 10:08 PM IST

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. आज राहुल गांधींनी टि्वट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

राहुल-मोदी
राहुल-मोदी

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी रांगाच रांगा आहे. ही विदारक परिस्थिती कोरोनाचे अनियंत्रित चित्र दर्शवत आहे. या भयान परिस्थीतीवरून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. आज राहुल गांधींनी टि्वट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

सकारात्मकता हा एक पंतप्रधानांचा पीआर स्टंट आहे. पंतप्रधानांच्या धोरणांमुळे झालेल्या कोरोना मृत्यूची खरी आकडेवारी लपविण्यासाठी हा करण्यात आला आहे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. तसेच सोशल मीडिया आणि आपली खोटी प्रतिमा ही सरकारची प्राथमिकता आहे. मात्र, वाढती महागाई आणि कोरोना लस नागरिकांची प्राथमिकता आहे. हे कसले चांगले दिवस, असेही टि्वट राहुल गांधींनी केले होते.

कोरोना लसीकरणावरूनही त्यांनी मोदींवर टीका केली होती. केंद्र सरकारने कोरोना लसीची खरेदी करावी आणि लसींच वितरण राज्यांना करावं. त्यानंतरच प्रत्येक गावात लस सुरक्षितरित्या पोहचू शकेल. एवढी साधी आणि सरळ गोष्ट केंद्राच्या का लक्षात येत नाही, असेही ते म्हणाले होते.

देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी -

  • गेल्या 24 तासांत - 2,11,298 नव्या रुग्णांची नोंद, तर 3,847 मृत्यू
  • एकूण रुग्ण : 2,73,69,093
  • आतापर्यंतचे कोरोनामुक्त : 2,46,33,951
  • एकूण मृत्यू संख्या : 3,15,235
  • सक्रिय रुग्ण : 24,19,907
  • आतापर्यंत लसीकरण : 20,26,95,874

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी रांगाच रांगा आहे. ही विदारक परिस्थिती कोरोनाचे अनियंत्रित चित्र दर्शवत आहे. या भयान परिस्थीतीवरून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. आज राहुल गांधींनी टि्वट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

सकारात्मकता हा एक पंतप्रधानांचा पीआर स्टंट आहे. पंतप्रधानांच्या धोरणांमुळे झालेल्या कोरोना मृत्यूची खरी आकडेवारी लपविण्यासाठी हा करण्यात आला आहे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. तसेच सोशल मीडिया आणि आपली खोटी प्रतिमा ही सरकारची प्राथमिकता आहे. मात्र, वाढती महागाई आणि कोरोना लस नागरिकांची प्राथमिकता आहे. हे कसले चांगले दिवस, असेही टि्वट राहुल गांधींनी केले होते.

कोरोना लसीकरणावरूनही त्यांनी मोदींवर टीका केली होती. केंद्र सरकारने कोरोना लसीची खरेदी करावी आणि लसींच वितरण राज्यांना करावं. त्यानंतरच प्रत्येक गावात लस सुरक्षितरित्या पोहचू शकेल. एवढी साधी आणि सरळ गोष्ट केंद्राच्या का लक्षात येत नाही, असेही ते म्हणाले होते.

देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी -

  • गेल्या 24 तासांत - 2,11,298 नव्या रुग्णांची नोंद, तर 3,847 मृत्यू
  • एकूण रुग्ण : 2,73,69,093
  • आतापर्यंतचे कोरोनामुक्त : 2,46,33,951
  • एकूण मृत्यू संख्या : 3,15,235
  • सक्रिय रुग्ण : 24,19,907
  • आतापर्यंत लसीकरण : 20,26,95,874
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.