ETV Bharat / bharat

Congress Leaders Detained : राहुल गांधी, प्रियंकासह काँग्रेसचे अनेक नेते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

author img

By

Published : Aug 5, 2022, 2:37 PM IST

महागाईविरोधात राजधानी दिल्लीत आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi Arrest ), प्रियंका गांधी-वाड्रा ( Priyanka Gandhi Arrest ) यांचाही समावेश आहे.

Congress Leaders Detained
Congress Leaders Detained

नवी दिल्ली - महागाईविरोधात राजधानी दिल्लीत आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi Arrest ), प्रियंका गांधी-वाड्रा ( Priyanka Gandhi Arrest ) यांना दिल्ली पोलिसांनी आज ताब्यात घेतले. या दोघांसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात Congress Leaders Detained घेतले. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आज देशभरात आंदोलनास सुरुवात केली. राजधानी दिल्लीतून या आंदोलनाला प्रारंभ झाला.

महागाईविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात

संसद भवनासमोर आंदोलन - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसद भवनासमोर काँग्रेस खासदारांनी आंदोलन केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेसचे सर्व खासदार, कार्यकर्ते काळे कपडे घालून सरकारचा निषेध करीत होते. यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी राष्ट्रपती भवनाकडे कूच केले.

राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा - संसद भवनासमोर आंदोलन केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी आपला मोर्चा राष्ट्रपती भवनाकडे वळविला. संसद भवन ते राष्ट्रपती भवन अशा खासदारांच्या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी हे करीत आहेत. तत्पूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सरकारवर घणाघाती हल्ला केला. काँग्रेसने 70 वर्षात देशासाठी जे कमावले ते भाजपच्या सरकारने 8 वर्षात गमावले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

मोजक्या लोकांच्या हितासाठी - 4-5 लोकांचे हित जपण्यासाठी सरकार चालविले जात आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांना केला. लोकांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, समाजातील हिंसाचार उठवता कामा नये, हा या सरकारचा हा एकमेव अजेंडा आहे. मोजक्या 4-5 लोकांचे हित जपण्यासाठी सरकार चालवले जात आहे आणि ही हुकूमशाही 2-3 मोठ्या व्यावसायिकांच्या हितासाठी 2 लोक चालवत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी नाव घेता मोदी व शाह यांच्यावर केली आहे.

लोकशाहीचा मृत्यू - या देशात लोकशाहीचा मृत्यू होत असल्याचे आपण पाहत आहोत, अशी विखारी टिका राहुल गांधी यांनी केली. जवळपास शतकापूर्वीपासून सुरू झालेल्या भारताने जे कमाविले आहे ते तुमच्या डोळ्यांसमोर नष्ट होत आहे. हुकूमशाही सुरू करण्याच्या या कल्पनेच्या विरोधात जो कोणी उभा राहतो त्याच्यावर हल्ले केले जातात, तुरुंगात टाकले जाते, अटक केली जाते आणि मारहाण केली जाते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

हेही वाचा - RBI hikes repo rate: रिझर्व बँकेने रेपो दर 50 बेस पॉईंटने वाढवला, कर्जे महागणार

नवी दिल्ली - महागाईविरोधात राजधानी दिल्लीत आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi Arrest ), प्रियंका गांधी-वाड्रा ( Priyanka Gandhi Arrest ) यांना दिल्ली पोलिसांनी आज ताब्यात घेतले. या दोघांसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात Congress Leaders Detained घेतले. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आज देशभरात आंदोलनास सुरुवात केली. राजधानी दिल्लीतून या आंदोलनाला प्रारंभ झाला.

महागाईविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात

संसद भवनासमोर आंदोलन - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसद भवनासमोर काँग्रेस खासदारांनी आंदोलन केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेसचे सर्व खासदार, कार्यकर्ते काळे कपडे घालून सरकारचा निषेध करीत होते. यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी राष्ट्रपती भवनाकडे कूच केले.

राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा - संसद भवनासमोर आंदोलन केल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी आपला मोर्चा राष्ट्रपती भवनाकडे वळविला. संसद भवन ते राष्ट्रपती भवन अशा खासदारांच्या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी हे करीत आहेत. तत्पूर्वी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सरकारवर घणाघाती हल्ला केला. काँग्रेसने 70 वर्षात देशासाठी जे कमावले ते भाजपच्या सरकारने 8 वर्षात गमावले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

मोजक्या लोकांच्या हितासाठी - 4-5 लोकांचे हित जपण्यासाठी सरकार चालविले जात आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांना केला. लोकांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, समाजातील हिंसाचार उठवता कामा नये, हा या सरकारचा हा एकमेव अजेंडा आहे. मोजक्या 4-5 लोकांचे हित जपण्यासाठी सरकार चालवले जात आहे आणि ही हुकूमशाही 2-3 मोठ्या व्यावसायिकांच्या हितासाठी 2 लोक चालवत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी नाव घेता मोदी व शाह यांच्यावर केली आहे.

लोकशाहीचा मृत्यू - या देशात लोकशाहीचा मृत्यू होत असल्याचे आपण पाहत आहोत, अशी विखारी टिका राहुल गांधी यांनी केली. जवळपास शतकापूर्वीपासून सुरू झालेल्या भारताने जे कमाविले आहे ते तुमच्या डोळ्यांसमोर नष्ट होत आहे. हुकूमशाही सुरू करण्याच्या या कल्पनेच्या विरोधात जो कोणी उभा राहतो त्याच्यावर हल्ले केले जातात, तुरुंगात टाकले जाते, अटक केली जाते आणि मारहाण केली जाते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

हेही वाचा - RBI hikes repo rate: रिझर्व बँकेने रेपो दर 50 बेस पॉईंटने वाढवला, कर्जे महागणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.