ETV Bharat / bharat

लालू यादव आणि उपमुख्यमंत्री तेजश्वी यादव यांच्यावर सीबीआयच्या छाप्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

author img

By

Published : Mar 11, 2023, 5:34 PM IST

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सीबीआयने चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात बोलावले होते. याआधीही सीबीआयने लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठं वक्तव्य केलय. आम्ही एकत्र आलो आहोत, त्यामुळेच हे सगळं होत आहे. तसेच, त्यांनी तेजस्वी यादव यांच्यावर ही कारवाई सुडबुद्धीने केली जात आहे असही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री नितीश कुमार
मुख्यमंत्री नितीश कुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार माध्यमांशी बोलताना

पाटणा (बिहार): रेल्वेत जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी सीबीआयने लालू आणि कुटुंबीयांवर केलेल्या कारवाईवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटणा ते दिल्लीपर्यंतच्या छाप्यांवर सीएम नितीश म्हणाले की, ते जे काही करत आहेत ते चुकीचे आहे. (2017)मध्ये आरजेडीवर छापेमारी झाली आणि आताही होत आहे. आम्ही एकत्र आलो त्यामुळे ही कारवाई होत आहे. भाजपला सोडून आम्ही पुन्हा आमच्या मुळ ठिकाणी आलो आहोत म्हणून हे सगळे केले जात आहे असही नितीश यावेळी म्हणाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपने मोदी यांना बाजूला केले आहे. त्यामुळे त्यांना बोलतच राहावे लागेल असा टोला लगावला आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राला उत्तर : सीबीआय तपासाविरोधात विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहीले होते. मात्र, सीएम नितीश यांनी त्यावर सही केली नाही. यावर मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, वेगवेगळे पक्ष वेगवेगळे काम करतात. या सगळ्या गोष्टींची आम्हाला पर्वा नाही. त्यांना वाटेल तसे ते करतात. सात पक्ष एकत्र आहेत, सर्व काम करत आहेत. मला त्यावर बोलण्याची गरज नाही.

भाजपने मोदी यांना बाजूला केले : भाजपला सोडून आम्ही पुन्हा आमच्या मुळ ठिकाणी आलो आहोत म्हणून हे सगळे केले जात आहे असही नितीश यावेळी म्हणाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपने मोदी यांना बाजूला केले आहे. त्यामुळे त्यांना बोलतच राहावे लागेल असा टोला लगावला आहे.

महाआघाडीत सर्व काही ठीक आहे का?: मुख्यमंत्री नितीश यांची संयमी प्रतिक्रिया आणि विरोधकांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी न केल्याने अनेक नव्या अटकळांना जन्म मिळत आहे. महाआघाडीमुळे मुख्यमंत्री नितीश यांचा भ्रमनिरास होत असल्याचे बोलले जात आहे. सीएम नितीश यांनी त्यांच्या वक्तव्यात भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा : DCW Chief Swati Maliwal : माझ्या वडिलांनीच केले माझे लैंगिक शोषण, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार माध्यमांशी बोलताना

पाटणा (बिहार): रेल्वेत जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी सीबीआयने लालू आणि कुटुंबीयांवर केलेल्या कारवाईवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटणा ते दिल्लीपर्यंतच्या छाप्यांवर सीएम नितीश म्हणाले की, ते जे काही करत आहेत ते चुकीचे आहे. (2017)मध्ये आरजेडीवर छापेमारी झाली आणि आताही होत आहे. आम्ही एकत्र आलो त्यामुळे ही कारवाई होत आहे. भाजपला सोडून आम्ही पुन्हा आमच्या मुळ ठिकाणी आलो आहोत म्हणून हे सगळे केले जात आहे असही नितीश यावेळी म्हणाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपने मोदी यांना बाजूला केले आहे. त्यामुळे त्यांना बोलतच राहावे लागेल असा टोला लगावला आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राला उत्तर : सीबीआय तपासाविरोधात विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहीले होते. मात्र, सीएम नितीश यांनी त्यावर सही केली नाही. यावर मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, वेगवेगळे पक्ष वेगवेगळे काम करतात. या सगळ्या गोष्टींची आम्हाला पर्वा नाही. त्यांना वाटेल तसे ते करतात. सात पक्ष एकत्र आहेत, सर्व काम करत आहेत. मला त्यावर बोलण्याची गरज नाही.

भाजपने मोदी यांना बाजूला केले : भाजपला सोडून आम्ही पुन्हा आमच्या मुळ ठिकाणी आलो आहोत म्हणून हे सगळे केले जात आहे असही नितीश यावेळी म्हणाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपने मोदी यांना बाजूला केले आहे. त्यामुळे त्यांना बोलतच राहावे लागेल असा टोला लगावला आहे.

महाआघाडीत सर्व काही ठीक आहे का?: मुख्यमंत्री नितीश यांची संयमी प्रतिक्रिया आणि विरोधकांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी न केल्याने अनेक नव्या अटकळांना जन्म मिळत आहे. महाआघाडीमुळे मुख्यमंत्री नितीश यांचा भ्रमनिरास होत असल्याचे बोलले जात आहे. सीएम नितीश यांनी त्यांच्या वक्तव्यात भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा : DCW Chief Swati Maliwal : माझ्या वडिलांनीच केले माझे लैंगिक शोषण, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.