ETV Bharat / bharat

Punjab News : बंदिवान सिंहांच्या सुटकेच्या मागणीसाठी कौमी इन्साफ मोर्चात संघर्ष, एकाचा हात कापला - Qaumi Insaf Morcha demanding

पंजाबच्या मोहालीमध्ये बंदिवान सिंहांच्या सुटकेसाठी कौमी इन्साफ मोर्चामध्ये रक्तरंजित चकमक झाली. ज्यामध्ये, एक जण गंभीर जखमी झाला. या संघर्षाबाबत पोलीस तपास करत असून, जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Punjab News
बंदिवान सिंहांच्या सुटकेच्या मागणीसाठी कौमी इन्साफ मोर्चात संघर्ष
author img

By

Published : Apr 9, 2023, 4:04 PM IST

चंदीगड (पंजाब) : मोहालीमध्ये बंदिवान सिंहांच्या सुटकेच्या मागणीसाठी कौमी इंसाफ मोर्चामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला आहे. कौमी इन्साफ मोर्चाच्या निहंगांमध्ये झालेल्या संघर्षात बब्बर सिंग चंडी (बाबा आमना ग्रुप) नावाचा निहंग गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत, त्याला मोहालीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जेथे त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पीजीआयमध्ये रेफर करण्यात आले आहे.

संघर्षात त्याचे दोन्ही हात कापले : मिळालेल्या माहितीनुसार, बंदिस्त सिंहांच्या सुटकेसाठी कौमी इन्साफ मोर्चादरम्यान काल रात्री रक्तरंजित संघर्ष झाला. आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत निहंग सिंग ज्याचे नाव बब्बर सिंग असल्याचे सांगितले जात आहे, तो गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. निहंग सिंहांमध्ये झालेल्या संघर्षात त्याचे दोन्ही हात कापले गेले. घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी त्यांना मोहाली येथील रुग्णालयात दाखल केले.

मारामारीचे कारण अद्याप समजू शकले नाही : डॉक्टरांनी सांगितले की, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, मारामारीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जखमी तरुणाची प्रकृती स्थिर : मोहालीत मोर्चात झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, हाणामारीचे कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. दुसरीकडे, या प्रकरणी जखमी तरुणाची प्रकृती स्थिर आल्यानंतर त्याचा जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या घटनास्थळी जाऊन मारामारीची कारणे शोधली जात आहेत.

द्याप कोणताही निकाल लागलेला नाही : गेल्या अनेक दिवसांपासून मोहालीत बंदिवान सिंहांच्या सुटकेसाठी कौमी इंसाफ मोर्चा काढला जात आहे. बंदिस्त सिंहांच्या सुटकेबाबत आघाडीने सरकारशी अनेकदा चर्चा करून निदर्शनेही केली असली, तरी अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही. बडस्तुर परिसरात संघटनांचा मोर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे

हेही वाचा : नक्षलवाद्यांनी 3 व्यावसायिकांना केली मारहाण, एकाचा मृत्यू, सुरक्षा दल- नक्षलवाद्यांमध्ये चकमक

चंदीगड (पंजाब) : मोहालीमध्ये बंदिवान सिंहांच्या सुटकेच्या मागणीसाठी कौमी इंसाफ मोर्चामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला आहे. कौमी इन्साफ मोर्चाच्या निहंगांमध्ये झालेल्या संघर्षात बब्बर सिंग चंडी (बाबा आमना ग्रुप) नावाचा निहंग गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत, त्याला मोहालीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जेथे त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पीजीआयमध्ये रेफर करण्यात आले आहे.

संघर्षात त्याचे दोन्ही हात कापले : मिळालेल्या माहितीनुसार, बंदिस्त सिंहांच्या सुटकेसाठी कौमी इन्साफ मोर्चादरम्यान काल रात्री रक्तरंजित संघर्ष झाला. आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत निहंग सिंग ज्याचे नाव बब्बर सिंग असल्याचे सांगितले जात आहे, तो गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. निहंग सिंहांमध्ये झालेल्या संघर्षात त्याचे दोन्ही हात कापले गेले. घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी त्यांना मोहाली येथील रुग्णालयात दाखल केले.

मारामारीचे कारण अद्याप समजू शकले नाही : डॉक्टरांनी सांगितले की, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, मारामारीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जखमी तरुणाची प्रकृती स्थिर : मोहालीत मोर्चात झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, हाणामारीचे कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. दुसरीकडे, या प्रकरणी जखमी तरुणाची प्रकृती स्थिर आल्यानंतर त्याचा जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या घटनास्थळी जाऊन मारामारीची कारणे शोधली जात आहेत.

द्याप कोणताही निकाल लागलेला नाही : गेल्या अनेक दिवसांपासून मोहालीत बंदिवान सिंहांच्या सुटकेसाठी कौमी इंसाफ मोर्चा काढला जात आहे. बंदिस्त सिंहांच्या सुटकेबाबत आघाडीने सरकारशी अनेकदा चर्चा करून निदर्शनेही केली असली, तरी अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही. बडस्तुर परिसरात संघटनांचा मोर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे

हेही वाचा : नक्षलवाद्यांनी 3 व्यावसायिकांना केली मारहाण, एकाचा मृत्यू, सुरक्षा दल- नक्षलवाद्यांमध्ये चकमक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.