चेन्नई - साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ कादंबरीकार एस. कंडासामी यांचे आज सकाळी निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.
नॅशनल बुक ट्रस्टने लिहिलेल्या ‘छयवनम’ या पहिल्या कादंबरीतून लेखक कंडासामी यांनी तमिळ साहित्यिक जगतात पहिले पाऊल ठेवले. त्यांना 1998 मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'विसरणाई' या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला.
ते त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांसमवेत चेन्नईमध्ये राहत होते. गेल्या दहा दिवसांपासून ते आजारपणामुळे खासगी रुग्णालयात दाखल होते.
‘कंडासामी यांचे शेवटचे लेखन चीन आणि त्यांच्या इतिहासावर आधारित आहे. पुस्तकाची सॉफ्ट कॉपी तयार असल्याने लवकरच ती प्रकाशित केली जाईल,’ अशी माहिती त्यांचे पुत्र सरावानन यांनी दिली आहे.