ETV Bharat / bharat

अयोध्या प्रकरण : फेरविचार याचिकांवर आज सुनावणी

अयोध्याप्रकरणी फेरविचार याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली अशोक भूषण, धनंजय चंद्रचूड ,एस. ए. नझीर आणि संजीव खन्ना या न्यायाधीशांचे खंडपीठ गुरुवारी दुपारी सुनावणी करणार आहे.

author img

By

Published : Dec 12, 2019, 9:35 AM IST

अयोध्या प्रकरण
अयोध्या प्रकरण

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला अयोध्याप्रकरणी निकाल जाहीर केला होता. विवादीत जमीन ही राम जन्मभूमीच असून बाबरी मशिदीकरता वेगळी जागा देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या दालनात सुनावणी होणार आहे.


जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना सय्यद अशहद रशीदी यांनी पहिली फेरविचार याचिका २ डिसेंबर रोजी दाखल केली होती. यामध्ये १४ मुद्द्यांवर फेरविचारावा करावा असे म्हटले आहे. तसेच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमीयत उलेमा ए िहंद यांनीही फेरविचार याचिका दाखल केल्या आहेत. याचबरोबर निर्मोही आखाड्याने देखील ९ नोव्हेंबर रोजी फेरविचार याचिका दाखल केली होती.


फेरविचार याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली अशोक भूषण, धनंजय चंद्रचूड ,एस. ए. नझीर आणि संजीव खन्ना या न्यायाधीशांचे खंडपीठ गुरुवारी दुपारी सुनावणी करणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने अयोध्या प्रकरणात एकमताने निकाल दिला. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत मशीद बांधण्यासाठी ५ एकर जमीन द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जमीन ही सध्या केंद्र सरकारच्या ताब्यात राहणार आहे. केंद्र सरकारला तीन महिन्यात ट्रस्ट निर्माण करावी लागणार आहे. ट्रस्टकडे मंदिराचे बांधकाम करण्याचे काम असणार आहे.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला अयोध्याप्रकरणी निकाल जाहीर केला होता. विवादीत जमीन ही राम जन्मभूमीच असून बाबरी मशिदीकरता वेगळी जागा देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या दालनात सुनावणी होणार आहे.


जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना सय्यद अशहद रशीदी यांनी पहिली फेरविचार याचिका २ डिसेंबर रोजी दाखल केली होती. यामध्ये १४ मुद्द्यांवर फेरविचारावा करावा असे म्हटले आहे. तसेच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमीयत उलेमा ए िहंद यांनीही फेरविचार याचिका दाखल केल्या आहेत. याचबरोबर निर्मोही आखाड्याने देखील ९ नोव्हेंबर रोजी फेरविचार याचिका दाखल केली होती.


फेरविचार याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली अशोक भूषण, धनंजय चंद्रचूड ,एस. ए. नझीर आणि संजीव खन्ना या न्यायाधीशांचे खंडपीठ गुरुवारी दुपारी सुनावणी करणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने अयोध्या प्रकरणात एकमताने निकाल दिला. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत मशीद बांधण्यासाठी ५ एकर जमीन द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जमीन ही सध्या केंद्र सरकारच्या ताब्यात राहणार आहे. केंद्र सरकारला तीन महिन्यात ट्रस्ट निर्माण करावी लागणार आहे. ट्रस्टकडे मंदिराचे बांधकाम करण्याचे काम असणार आहे.

Intro:Body:

df


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.