ETV Bharat / bharat

थांबा..! 'येत्या 7 दिवसांत कायदेशीररित्या शाहीन बाग खाली करू'

दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुडी यांनी हिंदू सेनेला मोर्चा न काढण्याचे आवाहन केले आहे. कायदेशीर रित्या येत्या 7 दिवसांमध्ये शाहीन बाग खाली करून रस्ता मोकळा करण्यात येईल, असे रमेश बिधुडी म्हणाले.

author img

By

Published : Mar 1, 2020, 1:13 PM IST

रमेश बिधुडी
रमेश बिधुडी

नवी दिल्ली - शाहीन बागेतील सीएए आंदोलनाविरोधात हिंदू सेनेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुडी यांनी हिंदू सेनेला मोर्चा न काढण्याचे आवाहन केले आहे. कायदेशीर रित्या येत्या 7 दिवसांमध्ये शाहीन बाग खाली करून रस्ता मोकळा करण्यात येईल, असे रमेश बिधुडी म्हणाले.

रमेश बिधूडी यांनी शाहीन बागविरोधी मोर्चामध्ये लोकांना न जाण्याचे आवाहन केले आहे. रस्ता जाम झाल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, त्याविरोधामध्ये मोर्चा काढण्याची गरज नाही. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांतता कायम ठेवणे गरजेचे आहे. सरकारकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येईल आणि येत्या 7 दिवसांच्या आतमध्ये आम्ही कायदेशीर रित्या शाहीन बाग खाली करू, असे रमेश बिधुडी म्हणाले.

'कायदेशीररित्या येत्या 7 दिवसांमध्ये शाहीन बाग खाली करू'

शाहीन बाग परिसरात दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून धरणे आंदोलन सुरू आहे. विवादित नारगरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलक करत आहेत. या धरणे आंदोलनामुळे नोएडा आणि फरिदाबादकडे जाणारे मार्गही बंद झाले आहेत.

या परिसरात दिल्ली पोलिसांनी जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शाहीन बाग परिसर खाली करण्याचे वक्तव्य हिंदू सेनेने शनिवारी केले होते. ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

नवी दिल्ली - शाहीन बागेतील सीएए आंदोलनाविरोधात हिंदू सेनेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुडी यांनी हिंदू सेनेला मोर्चा न काढण्याचे आवाहन केले आहे. कायदेशीर रित्या येत्या 7 दिवसांमध्ये शाहीन बाग खाली करून रस्ता मोकळा करण्यात येईल, असे रमेश बिधुडी म्हणाले.

रमेश बिधूडी यांनी शाहीन बागविरोधी मोर्चामध्ये लोकांना न जाण्याचे आवाहन केले आहे. रस्ता जाम झाल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, त्याविरोधामध्ये मोर्चा काढण्याची गरज नाही. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांतता कायम ठेवणे गरजेचे आहे. सरकारकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येईल आणि येत्या 7 दिवसांच्या आतमध्ये आम्ही कायदेशीर रित्या शाहीन बाग खाली करू, असे रमेश बिधुडी म्हणाले.

'कायदेशीररित्या येत्या 7 दिवसांमध्ये शाहीन बाग खाली करू'

शाहीन बाग परिसरात दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून धरणे आंदोलन सुरू आहे. विवादित नारगरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलक करत आहेत. या धरणे आंदोलनामुळे नोएडा आणि फरिदाबादकडे जाणारे मार्गही बंद झाले आहेत.

या परिसरात दिल्ली पोलिसांनी जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शाहीन बाग परिसर खाली करण्याचे वक्तव्य हिंदू सेनेने शनिवारी केले होते. ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.