नवी दिल्ली - गाजियाबादमधील वाल्मीकी समाज बांधवांकडून बौद्ध धर्म स्वीकारण्याचा मुद्द्याला आता राजकीय स्वरुप आले आहे. या विषयावरुन आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदियनाथ यांच्यावर राज्यात जातीय दंगली घडवण्याचा आरोप केला आहे.
'बलात्काऱ्यांना सरकारकडून वाचविण्याचा प्रयत्न'
संजय सिंह यांनी या पत्रात लिहिले आहे, की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून जातीय दंगली घडविण्याचे षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यूपीमध्ये विशेषता जाटव आणि वाल्मीकि समाज बांधवाविरुद्ध हिंसक घटना जास्त प्रमाणात घडत आहेत, याचवेळी दलित समाजातील महिलांवर सातत्याने बलात्कार होत आहेत. या घटनेतील आरोपींवर कारवाई करण्या ऐवजी सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.

'सत्तेच्या संरक्षणात अपराध'
भाजपचे एक आमदार वाल्मीकी समाज बांधवांना आयएसआयएसचे हस्तक असल्याचे आरोप करत आहेत. वाल्मिकी समाज दाऊद इब्राहिमकडून पैसे घेऊन धर्म सोडत आहेत. खरे पाहयचे तर उत्तर प्रदेशमधील सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणात या सर्वांवर अन्याय अत्याचार होत आहेत. या सर्वांना कंटाळून लोकांनी धर्म सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

'सीएम योगींची चौकशी करण्याची मागणी'
उत्तर प्रदेशमधील वाल्मीकी, जाटव, पासी, सोनकर, पाल, मौर्य, राजभर, कुशवाहा, निषाद, नाई, विश्वकर्मा, प्रजापति, यादव आणि इतर जातींच्या विरोधात योगी आदित्यनाथ सरकार अत्याचार करत आहे. संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे मागणी केली आहे.