ETV Bharat / bharat

मकर संक्रांतीला सुरू होणार अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम

author img

By

Published : Jan 3, 2021, 8:13 AM IST

अयोध्येमध्ये राम मंदिर बांधले जाणार आहे. येत्या मकर संक्रांतीपासून बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने दिली आहे. डिसेंबर २०२३पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Ram Temple
राम मंदिर

नवी दिल्ली - येत्या मकर संक्रांतीपासून म्हणजेच १५ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. तीन वर्षात राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने शनिवारी दिली.

५ एकर जागेमध्ये बांधले जाणारे हे राम मंदिर तीन मजली असणार आहे. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट आणि उंची १६१ फूट असणार आहे. या बांधकामासाठी साधारण ४०० वर्षांपर्यंत तग धरेल अशा सिमेंटचा वापर केला जाणार आहे. मंदिराच्या दर्शनीभागात २२ पायऱ्या असतील तर, ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी लिफ्ट आणि एस्कलेटरचीही सुविधा असणार आहे. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला ६५ एकर क्षेत्रामध्ये विविध बांधकामे केली जाणार आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बांधकामचे कंत्राट दिलेल्या कंपन्यांना मंदिर पूर्ण करण्यास साधारण तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे डिसेंबर २०२३पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दिवसाला ५० हजार भाविक मंदिरात येतील, असा अंदाज ट्रस्टला आहे. बांधकामासाठी देणगी जमा केली जाणार आहे. जानेवारी महिन्यापासून ते मेघ पौर्णिमेपर्यंत हे काम चालणार आहे. यासाठी ४ लाख स्वयंसेवक ११ कोटी घरांना भेटी देणार आहेत.

आयआयटी चेन्नई आणि लार्सन अँड टुब्रोच्या अभियंत्यांनी घेतल्या चाचण्या

राम जन्मभूमी मंदिर बांधकामाच्या ठिकाणी एकूण 12 खांबांसाठी खोदकाम करून त्यात बसवलेल्या खांबांची चाचणी करण्यात आली. या खांबांच्या तपासणीचे काम आयआयटी चेन्नईचे अभियंते आणि मंदिर बांधकामासाठी अधिकृत नियुक्ती केलेल्या लार्सन अँड टुब्रोच्या युनिटने केली. पायासाठी घातलेले खांब 1 मीटर व्यासाच्या आत 33 मीटर खोलीपर्यंत खोदले गेले आहेत. भूकंपाच्या धक्क्याने भगवान रामाच्या मंदिरावर परिणाम होऊ नये आणि पूर आल्यासही या ऐतिहासिक मंदिरास कोणताही धोका होऊ नये, या दृष्टीने पाया जमिनीपासून शंभर फुटांपेक्षा जास्त खोलीवर ठेवला जात आहे. तसेच, या खांबांवर 700 टनांचे वजन टाकून त्यांच्या क्षमतेचे मूल्यांकनही आयआयटी चेन्नईच्या तज्ज्ञांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्तींचा सामना करूनही भगवान राम यांचे मंदिर उभे राहील

ट्रस्टने भगवान श्री राम मंदिर अयोध्येत बांधले जावे, यासाठी जगातील ऐतिहासिक मंदिर बनविण्यासाठी एक विशेष कृती योजना तयार केली आहे. या मंदिराच्या रचनेपासून ते पाया घालण्यापर्यंत सर्व बाबींमध्ये हे मंदिर शेकडो नव्हे तर, हजारो वर्षे हवामान आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करू शकेल, अशा मजबुतीकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. तसेच, विशेष सौंदर्यासह बांधण्यात येत असलेले हे राम मंदिर श्रद्धा आणि पर्यटनाचे केंद्र बनेल, असे ट्रस्टने म्हटले आहे.

नवी दिल्ली - येत्या मकर संक्रांतीपासून म्हणजेच १५ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. तीन वर्षात राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने शनिवारी दिली.

५ एकर जागेमध्ये बांधले जाणारे हे राम मंदिर तीन मजली असणार आहे. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट आणि उंची १६१ फूट असणार आहे. या बांधकामासाठी साधारण ४०० वर्षांपर्यंत तग धरेल अशा सिमेंटचा वापर केला जाणार आहे. मंदिराच्या दर्शनीभागात २२ पायऱ्या असतील तर, ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी लिफ्ट आणि एस्कलेटरचीही सुविधा असणार आहे. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला ६५ एकर क्षेत्रामध्ये विविध बांधकामे केली जाणार आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बांधकामचे कंत्राट दिलेल्या कंपन्यांना मंदिर पूर्ण करण्यास साधारण तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे डिसेंबर २०२३पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दिवसाला ५० हजार भाविक मंदिरात येतील, असा अंदाज ट्रस्टला आहे. बांधकामासाठी देणगी जमा केली जाणार आहे. जानेवारी महिन्यापासून ते मेघ पौर्णिमेपर्यंत हे काम चालणार आहे. यासाठी ४ लाख स्वयंसेवक ११ कोटी घरांना भेटी देणार आहेत.

आयआयटी चेन्नई आणि लार्सन अँड टुब्रोच्या अभियंत्यांनी घेतल्या चाचण्या

राम जन्मभूमी मंदिर बांधकामाच्या ठिकाणी एकूण 12 खांबांसाठी खोदकाम करून त्यात बसवलेल्या खांबांची चाचणी करण्यात आली. या खांबांच्या तपासणीचे काम आयआयटी चेन्नईचे अभियंते आणि मंदिर बांधकामासाठी अधिकृत नियुक्ती केलेल्या लार्सन अँड टुब्रोच्या युनिटने केली. पायासाठी घातलेले खांब 1 मीटर व्यासाच्या आत 33 मीटर खोलीपर्यंत खोदले गेले आहेत. भूकंपाच्या धक्क्याने भगवान रामाच्या मंदिरावर परिणाम होऊ नये आणि पूर आल्यासही या ऐतिहासिक मंदिरास कोणताही धोका होऊ नये, या दृष्टीने पाया जमिनीपासून शंभर फुटांपेक्षा जास्त खोलीवर ठेवला जात आहे. तसेच, या खांबांवर 700 टनांचे वजन टाकून त्यांच्या क्षमतेचे मूल्यांकनही आयआयटी चेन्नईच्या तज्ज्ञांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्तींचा सामना करूनही भगवान राम यांचे मंदिर उभे राहील

ट्रस्टने भगवान श्री राम मंदिर अयोध्येत बांधले जावे, यासाठी जगातील ऐतिहासिक मंदिर बनविण्यासाठी एक विशेष कृती योजना तयार केली आहे. या मंदिराच्या रचनेपासून ते पाया घालण्यापर्यंत सर्व बाबींमध्ये हे मंदिर शेकडो नव्हे तर, हजारो वर्षे हवामान आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करू शकेल, अशा मजबुतीकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. तसेच, विशेष सौंदर्यासह बांधण्यात येत असलेले हे राम मंदिर श्रद्धा आणि पर्यटनाचे केंद्र बनेल, असे ट्रस्टने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.