ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी आज 'मन की बात'द्वारे साधणार देशाशी संवाद...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशाशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी ११ वाजता रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधतील.

author img

By

Published : Jun 28, 2020, 9:56 AM IST

Prime Minister Modi to share thoughts in 'Mann ki Baat' at 11 am today
पंतप्रधान मोदी आज 'मन की बात'द्वारे साधणार देशाशी संवाद...

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशाशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी ११ वाजता रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधतील. दरम्यान, मोदी ६६ व्यांदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित करत असतात. यात ते वेगवेगळ्या विषयावर बोलतात.

पंतप्रधान मोदींच्या आजच्या मन की बातमध्ये, २० लाख कोटींचे पॅकेज, लॉकडाऊनचा पुढचा टप्पा, आत्मनिर्भर भारत या सगळ्या गोष्टींचा समावेश असणार आहे. असे असले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शवरुन प्रसारित केला जाणार आहे. तसेच याचे लाईव्ह प्रसारण पीएमओ ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री, डीडी न्यूज आणि यूट्यूब चॅनल एअरवरूनही केले जाणार आहे.

कोरोना विषयावर मागील वेळी मन की बातमध्ये बोलताना मोदी यांनी, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, साबणाने हात वारंवार धुवा, असे आवाहन केले होते.

दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात शनिवारी कोरोनाग्रस्ताचा आकडा ५ लाखावर पोहोचला. यातले साधारणतः तीन लाख रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही शनिवारी भारताचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५८ टक्के झाल्याचे स्पष्ट केले. या सगळ्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे.

  • Prime Minister Narendra Modi to address the nation through his radio programme 'Mann Ki Baat' at 11 AM today. (file pic) pic.twitter.com/78nDUe1KgR

    — ANI (@ANI) June 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दुसरीकडे शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना विषयावरुन मोदींना लक्ष्य केले होते. मोदी कोरोनाच्या संकटापुढ हात टेकले आहेत, अशी टीका राहुल यांनी केली होती. सरकारकडे काही उपाय योजना नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आरोपांना पंतप्रधान मोदी काही उत्तर देणार का? हेही पाहावे लागेल.

हेही वाचा - पाकिस्तानात अडकलेले 208 भारतीय अटारी सीमेवरून मायदेशी परतले

हेही वाचा - भारताचे सुपुत्र पी. व्ही. नरसिंहराव राजकारणातील संन्यासी - डॉ. मनमोहन सिंह

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशाशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी ११ वाजता रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधतील. दरम्यान, मोदी ६६ व्यांदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित करत असतात. यात ते वेगवेगळ्या विषयावर बोलतात.

पंतप्रधान मोदींच्या आजच्या मन की बातमध्ये, २० लाख कोटींचे पॅकेज, लॉकडाऊनचा पुढचा टप्पा, आत्मनिर्भर भारत या सगळ्या गोष्टींचा समावेश असणार आहे. असे असले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शवरुन प्रसारित केला जाणार आहे. तसेच याचे लाईव्ह प्रसारण पीएमओ ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री, डीडी न्यूज आणि यूट्यूब चॅनल एअरवरूनही केले जाणार आहे.

कोरोना विषयावर मागील वेळी मन की बातमध्ये बोलताना मोदी यांनी, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, साबणाने हात वारंवार धुवा, असे आवाहन केले होते.

दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात शनिवारी कोरोनाग्रस्ताचा आकडा ५ लाखावर पोहोचला. यातले साधारणतः तीन लाख रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही शनिवारी भारताचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५८ टक्के झाल्याचे स्पष्ट केले. या सगळ्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे.

  • Prime Minister Narendra Modi to address the nation through his radio programme 'Mann Ki Baat' at 11 AM today. (file pic) pic.twitter.com/78nDUe1KgR

    — ANI (@ANI) June 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दुसरीकडे शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना विषयावरुन मोदींना लक्ष्य केले होते. मोदी कोरोनाच्या संकटापुढ हात टेकले आहेत, अशी टीका राहुल यांनी केली होती. सरकारकडे काही उपाय योजना नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आरोपांना पंतप्रधान मोदी काही उत्तर देणार का? हेही पाहावे लागेल.

हेही वाचा - पाकिस्तानात अडकलेले 208 भारतीय अटारी सीमेवरून मायदेशी परतले

हेही वाचा - भारताचे सुपुत्र पी. व्ही. नरसिंहराव राजकारणातील संन्यासी - डॉ. मनमोहन सिंह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.