ETV Bharat / bharat

केरळमध्ये कोरोनाचे आणखी ५ रुग्ण आढळले; देशभरात ३९ जणांना लागण

कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने देशवासियांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून परिपत्रक जारी केले असून गर्दी असलेल्या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे.

author img

By

Published : Mar 8, 2020, 12:00 PM IST

convid19
कोरोना संसर्ग

नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा ३९ वर पोहचला आहे. केरळमध्ये नव्याने ५ जणांना कोरोना झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. यातील तिघेजण काही दिवसांपूर्वी इटलीहून माघारी आले होते. त्यांच्यामुळे इतर दोघांना लागण झाली आहे. पथ्थनममिथ्था जिल्ह्यामध्ये हे रुग्ण आढळून आले आहे.

सर्वांना रुग्णालयामध्ये अलिप्त ठेवण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले.

नुकतेच इराणमधून प्रवास करून आलेल्या लडाखमधील दोन नागरिक आणि ओमान देशातून प्रवास करून आलेल्या तामिळनाडूतील एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे विशेष सचिव संजीव कुमार यांनी दिली. त्यामुळे देशभरामध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण झाले आहेत.

कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने देशवासियांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून परिपत्रक जारी केले असून गर्दी असलेल्या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. तसेच, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे टाळावे, असे आरोग्य मंत्रालयाने परिपत्रकामध्ये म्हटले आहे.

कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये जवळपास १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्येही मृतांचा आकडा वाढत आहे. चीनमध्ये ३ हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आशियायी देशांमध्येही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. हस्तांदोलन, गर्दीतून प्रवास, सार्वजनिक कार्यक्रम, टाळण्याबरोबरच शारिरीक स्वच्छता पाळण्यासाठी सरकारकडून जनजागृती करण्यात येत आहे.

१८ जानेवारीपासून देशात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. चीन, जपान, हाँगकाँग, नेपाळ, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड या देशातील नागरिकांची पहिल्यापासूनच तपासणी करण्यात येत आहे. आता परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. एन ९५ मास्क आणि अन्य वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा तयार ठेवण्यात आल्या आहेत. तर १९ आणखी तयार करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी एक कॉल सेंटरही उभारण्यात आले असून जागतिक आरोग्य संघटनेच्या आम्ही संपर्कात आहोत. इराणमधील तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.

चीनमधील वुहानमध्ये अडकेलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. तेथून आलेल्या नागरिकांची 'टेस्ट निगेटिव्ह' आहे. चीन, जपान, इटलीला जाणाऱ्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. गरज नसेल तर चीन आणि इटलीला जाऊ नका. ४ मार्चपर्यंत ६ लाख ११ हजार १७६ प्रवाशांची चाचणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या मदतीसाठी आरोग्य मंत्रालयाने नियमावली जारी केली आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा ३९ वर पोहचला आहे. केरळमध्ये नव्याने ५ जणांना कोरोना झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. यातील तिघेजण काही दिवसांपूर्वी इटलीहून माघारी आले होते. त्यांच्यामुळे इतर दोघांना लागण झाली आहे. पथ्थनममिथ्था जिल्ह्यामध्ये हे रुग्ण आढळून आले आहे.

सर्वांना रुग्णालयामध्ये अलिप्त ठेवण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले.

नुकतेच इराणमधून प्रवास करून आलेल्या लडाखमधील दोन नागरिक आणि ओमान देशातून प्रवास करून आलेल्या तामिळनाडूतील एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे विशेष सचिव संजीव कुमार यांनी दिली. त्यामुळे देशभरामध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण झाले आहेत.

कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने देशवासियांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून परिपत्रक जारी केले असून गर्दी असलेल्या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. तसेच, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे टाळावे, असे आरोग्य मंत्रालयाने परिपत्रकामध्ये म्हटले आहे.

कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये जवळपास १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्येही मृतांचा आकडा वाढत आहे. चीनमध्ये ३ हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आशियायी देशांमध्येही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. हस्तांदोलन, गर्दीतून प्रवास, सार्वजनिक कार्यक्रम, टाळण्याबरोबरच शारिरीक स्वच्छता पाळण्यासाठी सरकारकडून जनजागृती करण्यात येत आहे.

१८ जानेवारीपासून देशात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. चीन, जपान, हाँगकाँग, नेपाळ, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड या देशातील नागरिकांची पहिल्यापासूनच तपासणी करण्यात येत आहे. आता परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. एन ९५ मास्क आणि अन्य वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा तयार ठेवण्यात आल्या आहेत. तर १९ आणखी तयार करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी एक कॉल सेंटरही उभारण्यात आले असून जागतिक आरोग्य संघटनेच्या आम्ही संपर्कात आहोत. इराणमधील तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.

चीनमधील वुहानमध्ये अडकेलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. तेथून आलेल्या नागरिकांची 'टेस्ट निगेटिव्ह' आहे. चीन, जपान, इटलीला जाणाऱ्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. गरज नसेल तर चीन आणि इटलीला जाऊ नका. ४ मार्चपर्यंत ६ लाख ११ हजार १७६ प्रवाशांची चाचणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या मदतीसाठी आरोग्य मंत्रालयाने नियमावली जारी केली आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.