ETV Bharat / bharat

'२६/११'चा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानात अटक

author img

By

Published : Jul 17, 2019, 1:06 PM IST

Updated : Jul 17, 2019, 1:50 PM IST

२६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार, दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तान सरकारने अटक केली आहे.

दहशतवादी हफिज सईद

इस्लामाबाद - २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तान सरकारने अटक केली आहे. भारताच्या दहशतवादी विरोधी लढ्याचे हे मोठे यश समजले जात आहे. हाफिज सईद जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. अटक करुन हाफिजला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सईदच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. हफीज सईदला अटक करुन पाकिस्तान सर्व जगाला मुर्ख बनवत आहे. न्यायालयामध्ये सईद विरुद्ध पाकिस्तान कसे पुरावे सादर करतोय, तसेच त्याला दोषी ठरवण्यासाठी किती प्रयत्न करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, अन्यथा सईदला अटक करणे हे पाकिस्तानचे एक नाटक ठरेल, असे निकम म्हणाले.

इस्लामाबाद - २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तान सरकारने अटक केली आहे. भारताच्या दहशतवादी विरोधी लढ्याचे हे मोठे यश समजले जात आहे. हाफिज सईद जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. अटक करुन हाफिजला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सईदच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. हफीज सईदला अटक करुन पाकिस्तान सर्व जगाला मुर्ख बनवत आहे. न्यायालयामध्ये सईद विरुद्ध पाकिस्तान कसे पुरावे सादर करतोय, तसेच त्याला दोषी ठरवण्यासाठी किती प्रयत्न करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, अन्यथा सईदला अटक करणे हे पाकिस्तानचे एक नाटक ठरेल, असे निकम म्हणाले.

Intro:किट नंबर 319


Body:लोकलचा पेंटोग्राफ तुटून दोन महिला प्रवासी गंभीर जखमी ; कल्याण -कर्जत रेल्वे सेवा विस्कळीत

ठाणे :- मध्य रेल्वेच्या मागे लागलेला शुक्लकाष्ट काही बंद होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे, आज सकाळच्या सुमाराला लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्याचा प्रकार कल्याण आणि विठ्ठलवाडी स्टेशन दरम्यान घडला आहे , या प्रकारामुळे कर्जत-कल्याण हा रेल्वेमार्ग पूर्णपणे ठप्प पडला आहे,
आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला, बदलापूर निघालेले मुंबई लोकलने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक सोडल्यानंतर अचानक त्या लोकलचा पेंटोग्राफ तुटला तर त्याची वायर अंगावर पडल्याने दोन महिला प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, या महिलांना रेल्वे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर या घटनेमुळे ऐन सकाळच्या वेळेस मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने परिणामी अनेक प्रवाशांनी लोकलमधून कल्याणच्या दिशेने पायी चालण्यास सुरुवात केली आहे,

दरम्यान, कर्जत, खोपोली आणि अंबरनाथ तसेच कल्याण, ठाणे डोंबिवली स्टेशन वरून विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे, तसेच कल्याण आणि ठाणे स्टेशन वरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार असल्याचे ही सांगण्यात आले, तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेने ही या मार्गावर जादा बसेससोडले आहे,


Conclusion:
Last Updated : Jul 17, 2019, 1:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.