ETV Bharat / bharat

नितीश कुमार बिहारचे 37 वे मुख्यमंत्री; उपमुख्यमंत्री पद 'या' दोन जणांकडे

आज नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा राजधानी पाटण्यातील राजभवनात पार पडला. तर भारतीय जनता पक्षाचे नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा दुपारी चारच्या सुमारास झाला.

author img

By

Published : Nov 16, 2020, 6:09 PM IST

नितीश कुमार बिहारचे 37 वे मुख्यमंत्री
नितीश कुमार बिहारचे 37 वे मुख्यमंत्री

पाटणा - अखेर बिहारमध्ये पुन्हा नितीशराज आले आहे. आज नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा राजधानी पाटण्यातील राजभवनात पार पडला. यावेळी राज्यपाल फागू चौहान यांनी नितिश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तर भारतीय जनता पक्षाचे नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा दुपारी चारच्या सुमारास झाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग यासारख्या मूलभूत प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.

नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळाि
nitish-kumar-oath-ceremony-in-patna-bihar
बिहारचे दोन उपमुख्यमंत्री

जेडीयू नेते विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी आणि मेवा लाल चौधरी यांनी बिहारच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. हिंदुस्तानी आम मोर्चाचे (एचएएम) प्रमुख जीतन मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) चे मुकेश सहनी यांनीही बिहारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर भारतीय जनता पक्षाचे नेते मंगल पांडे आणि अमरेंद्र प्रताप सिंह यांनी बिहारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

शपथविधी सोहळ्यापूर्वी

नंद किशोर यादव यांना विधानसभा अध्यक्ष बनवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. तर राष्ट्रीय जनता दलाने शपथविधीवर बहिष्कार टाकला. राजदचे नेते तेजस्वी यादव शपथ सोहळ्याला उपस्थित राहिले नाही.

कोणाला किती जागा -

तीन टप्प्यात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा 10 नोव्हेंबरला निकाल समोर आला. 243 मतदारसंघासाठी झालेल्या या निवडणुकीत एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 125 जागा मिळाल्या आहेत. तर यूपीएला 110 जागांवर समाधान मानावे लागले. एनडीएत भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर जनता दल (यू) 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा (सेक्युलर) आणि विकासशील इन्सान पार्टीने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला आहे.

तर महागठबंधनने 110 जागांवर विजय मिळवला. यात आरजेडीला 75, काँग्रेस 19, सीपीआय (मा-ले) 12, सीपीएम आणि सीपीआयला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत. याचबरोबर एमआयएमला 5 जागा मिळाल्या आहेत. तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला. बहुमतासाठी 122 ही म‌ॅजिक फिगर आहे. . एनडीएमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांची निवड होते की, नाही याबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, बिहारमध्ये पुन्हा नितीश यांचे सरकार आले.

पाटणा - अखेर बिहारमध्ये पुन्हा नितीशराज आले आहे. आज नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा राजधानी पाटण्यातील राजभवनात पार पडला. यावेळी राज्यपाल फागू चौहान यांनी नितिश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तर भारतीय जनता पक्षाचे नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा दुपारी चारच्या सुमारास झाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग यासारख्या मूलभूत प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.

नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळाि
nitish-kumar-oath-ceremony-in-patna-bihar
बिहारचे दोन उपमुख्यमंत्री

जेडीयू नेते विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी आणि मेवा लाल चौधरी यांनी बिहारच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. हिंदुस्तानी आम मोर्चाचे (एचएएम) प्रमुख जीतन मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) चे मुकेश सहनी यांनीही बिहारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर भारतीय जनता पक्षाचे नेते मंगल पांडे आणि अमरेंद्र प्रताप सिंह यांनी बिहारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

शपथविधी सोहळ्यापूर्वी

नंद किशोर यादव यांना विधानसभा अध्यक्ष बनवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. तर राष्ट्रीय जनता दलाने शपथविधीवर बहिष्कार टाकला. राजदचे नेते तेजस्वी यादव शपथ सोहळ्याला उपस्थित राहिले नाही.

कोणाला किती जागा -

तीन टप्प्यात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा 10 नोव्हेंबरला निकाल समोर आला. 243 मतदारसंघासाठी झालेल्या या निवडणुकीत एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 125 जागा मिळाल्या आहेत. तर यूपीएला 110 जागांवर समाधान मानावे लागले. एनडीएत भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर जनता दल (यू) 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा (सेक्युलर) आणि विकासशील इन्सान पार्टीने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला आहे.

तर महागठबंधनने 110 जागांवर विजय मिळवला. यात आरजेडीला 75, काँग्रेस 19, सीपीआय (मा-ले) 12, सीपीएम आणि सीपीआयला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत. याचबरोबर एमआयएमला 5 जागा मिळाल्या आहेत. तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला. बहुमतासाठी 122 ही म‌ॅजिक फिगर आहे. . एनडीएमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांची निवड होते की, नाही याबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, बिहारमध्ये पुन्हा नितीश यांचे सरकार आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.