ETV Bharat / bharat

राज्यपालांची पत्रातील भाषा वाचून मी आश्चर्यचकित; शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र

कोरोनावर मात करण्यासाच्या धोरणात तुम्ही 'दो गज की दुरी' ही घोषणा दिली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने 'माझा परिवार माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत लोकांना एकमेकांमध्ये अतंर राखण्यासंदर्भात जागृत केले, असे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले.

author img

By

Published : Oct 13, 2020, 7:51 PM IST

Updated : Oct 13, 2020, 8:50 PM IST

sharad pawar and narendra modi
शरद पवार नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात ज्याप्रकारे शब्दप्रयोग केला, ते आश्चर्यचकित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

  • It was brought to my notice through the media, a letter written by the Hon. Governor of Maharashtra to the @CMOMaharashtra

    In this letter the Hon. Governor has sought the intervention of the Chief Minister to open up religious places for the public. pic.twitter.com/1he2VOatx3

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) October 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पत्रात शरद पवार म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाच्या धोरणात तुम्ही 'दो गज की दुरी' ही घोषणा दिली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने 'माझा परिवार माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत लोकांना एकमेकांमध्ये अंतर राखण्यासंदर्भात जागृत केले. तसेच महाराष्ट्र सरकारने 'दो गज की दुरी' ही मोहीम राबवण्यासंदर्भातही नियोजन करत आहे.

राज्यातील मंदिरे लोकांसाठी सुरू करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले, याबाबत मी माध्यमांत पाहिले. मात्र, तुम्हाला माहित आहे की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे आहेत. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. इतकेच नव्हे, तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिर आणि इतर धार्मिक स्थळे कोरोनाच्या आधीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे साक्षी आहेत. यांसारख्या धार्मिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवणे जवळपास अशक्य आहे. यामुळे या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत स्पष्ट निर्णय नाही घेतला.

मी इथे हेही नमूद करु इच्छितो की, माननीय राज्यपाल यांचे या विषयाबाबत व्यक्तिगत मत आणि दृष्टिकोन असू शकतो, या बाबीशी मी सहमत आहे. मी राज्यपाल या नात्याने मुख्यमंत्र्यांना आपले मत व्यक्त करणे याचेही मी कौतुक करतो. मात्र, राज्यपालांनी ज्याप्रकारे हे पत्र माध्यमांमध्ये जाहीर केले. तसेच ज्या प्रकारचा शब्दप्रयोग या पत्रात करण्यात आला ते पाहून मी आश्चर्यचकित आहे, असे पवार यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले.

पवारांनी पुढे लिहिले आहे, राज्यपालांनी लिहिलेल्या या पत्रातील काही मुद्द्यांबाबत मी बोलू इच्छितो. 'तुमच्याकडे हिंदुत्वाची ठाम मते आहे. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अयोध्येला जाऊन जाहिररित्या तुमची भक्ती दाखवली आहे. तसेच आषाढी एकादशीला तुम्ही पंढरपुरमधील विठ्ठल रुख्मिणी मंदिराला भेट देत पुजा केली.

मात्र, आश्चर्चयचकित आहे की, जर तुम्ही जर आपणास ईश्वरी संकेत मिळत असून तुम्ही धार्मिक स्थळे सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलत आहात. तुम्हाला धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार वाटतो. मात्र आता तुम्हीच धर्मनिरपेक्ष झालात का? असा प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या पत्रात विचारला आहे.

पवार आपल्या पत्रात पुढे म्हणाले, मला विश्वास आहे की, आपण ज्याप्रकारची भाषा राज्यपालांनी आपल्या पत्रात वापरली ती पाहिली असेल. संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) हा समानता आणि ढालेची भर घालतो आणि म्हणूनच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीने या घटनेच्या पायाला धरुन ठेवले आहे. दुर्दैवाने, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे राजकीय पक्षाच्या नेत्याला लिहिलेले असे दर्शविते. माझा लोकशाहीवर ठाम विश्वास आहे. तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री या दोघांमध्ये विचारांचे मुक्तपणे आदानप्रदान व्हावे, या मताचा मी आहे. मात्र, व्यक्तिने संवैधानिक पदावर असताना पदाचा मान राखला गेला पाहिजे. मात्र, यानंतर हा सर्व प्रकार पाहता मुख्यमंत्री यांच्याकडे राज्यापालांच्या पत्राला उत्तर देत ते माध्यमांध्ये प्रकाशित करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असेही पवार यांनी मोदींना लिहलेल्या पत्रात स्पष्ट केले.

शेवटी ते लिहतात, 'मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांच्याशी मी याबाबत अद्याप चर्चा केली नाही. मात्र, राज्यपालांच्या अशा वागण्याने मला दु:ख झाले आहे. तसेच मी तो खेद तुमच्यासमोर व्यक्त करत आहे.'

नवी दिल्ली - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात ज्याप्रकारे शब्दप्रयोग केला, ते आश्चर्यचकित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

  • It was brought to my notice through the media, a letter written by the Hon. Governor of Maharashtra to the @CMOMaharashtra

    In this letter the Hon. Governor has sought the intervention of the Chief Minister to open up religious places for the public. pic.twitter.com/1he2VOatx3

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) October 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पत्रात शरद पवार म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाच्या धोरणात तुम्ही 'दो गज की दुरी' ही घोषणा दिली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने 'माझा परिवार माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत लोकांना एकमेकांमध्ये अंतर राखण्यासंदर्भात जागृत केले. तसेच महाराष्ट्र सरकारने 'दो गज की दुरी' ही मोहीम राबवण्यासंदर्भातही नियोजन करत आहे.

राज्यातील मंदिरे लोकांसाठी सुरू करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले, याबाबत मी माध्यमांत पाहिले. मात्र, तुम्हाला माहित आहे की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे आहेत. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. इतकेच नव्हे, तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिर आणि इतर धार्मिक स्थळे कोरोनाच्या आधीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे साक्षी आहेत. यांसारख्या धार्मिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवणे जवळपास अशक्य आहे. यामुळे या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत स्पष्ट निर्णय नाही घेतला.

मी इथे हेही नमूद करु इच्छितो की, माननीय राज्यपाल यांचे या विषयाबाबत व्यक्तिगत मत आणि दृष्टिकोन असू शकतो, या बाबीशी मी सहमत आहे. मी राज्यपाल या नात्याने मुख्यमंत्र्यांना आपले मत व्यक्त करणे याचेही मी कौतुक करतो. मात्र, राज्यपालांनी ज्याप्रकारे हे पत्र माध्यमांमध्ये जाहीर केले. तसेच ज्या प्रकारचा शब्दप्रयोग या पत्रात करण्यात आला ते पाहून मी आश्चर्यचकित आहे, असे पवार यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले.

पवारांनी पुढे लिहिले आहे, राज्यपालांनी लिहिलेल्या या पत्रातील काही मुद्द्यांबाबत मी बोलू इच्छितो. 'तुमच्याकडे हिंदुत्वाची ठाम मते आहे. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अयोध्येला जाऊन जाहिररित्या तुमची भक्ती दाखवली आहे. तसेच आषाढी एकादशीला तुम्ही पंढरपुरमधील विठ्ठल रुख्मिणी मंदिराला भेट देत पुजा केली.

मात्र, आश्चर्चयचकित आहे की, जर तुम्ही जर आपणास ईश्वरी संकेत मिळत असून तुम्ही धार्मिक स्थळे सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलत आहात. तुम्हाला धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार वाटतो. मात्र आता तुम्हीच धर्मनिरपेक्ष झालात का? असा प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या पत्रात विचारला आहे.

पवार आपल्या पत्रात पुढे म्हणाले, मला विश्वास आहे की, आपण ज्याप्रकारची भाषा राज्यपालांनी आपल्या पत्रात वापरली ती पाहिली असेल. संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) हा समानता आणि ढालेची भर घालतो आणि म्हणूनच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीने या घटनेच्या पायाला धरुन ठेवले आहे. दुर्दैवाने, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे राजकीय पक्षाच्या नेत्याला लिहिलेले असे दर्शविते. माझा लोकशाहीवर ठाम विश्वास आहे. तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री या दोघांमध्ये विचारांचे मुक्तपणे आदानप्रदान व्हावे, या मताचा मी आहे. मात्र, व्यक्तिने संवैधानिक पदावर असताना पदाचा मान राखला गेला पाहिजे. मात्र, यानंतर हा सर्व प्रकार पाहता मुख्यमंत्री यांच्याकडे राज्यापालांच्या पत्राला उत्तर देत ते माध्यमांध्ये प्रकाशित करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असेही पवार यांनी मोदींना लिहलेल्या पत्रात स्पष्ट केले.

शेवटी ते लिहतात, 'मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांच्याशी मी याबाबत अद्याप चर्चा केली नाही. मात्र, राज्यपालांच्या अशा वागण्याने मला दु:ख झाले आहे. तसेच मी तो खेद तुमच्यासमोर व्यक्त करत आहे.'

Last Updated : Oct 13, 2020, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.