ETV Bharat / bharat

मध्यप्रदेश सरकारने ज्योतिरादित्य सिंधियासह आमदारांना पक्षात परतण्याचे केले आवाहन

author img

By

Published : Mar 11, 2020, 1:35 PM IST

ज्योतिरादित्य यांना गेल्या 18 वर्षांच्या राजकिय कारकिर्दीत काँग्रेसने काय-काय दिले, याची आठवण करुन देणारे आणि आमदारांना परत पक्षात येण्याचे आवाहन करणारे टि्वट मध्यप्रदेश काँग्रेस सरकारने केले आहे.

mp congress tweet on Madhya Pradesh Political Crisis
mp congress tweet on Madhya Pradesh Political Crisis

नवी दिल्ली - काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याबरोबर २२ आमदारांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारवर संकट आले आहे. यावर ज्योतिरादित्य यांना गेल्या 18 वर्षांच्या राजकिय कारकिर्दीत काँग्रेसने काय-काय दिले, याची आठवण करुन देणारे आणि आमदारांना परत पक्षात येण्याचे आवाहन करणारे टि्वट मध्यप्रदेश काँग्रेस सरकारने केले आहे.

'सिंधिया यांना गेल्या 18 वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेसने 17 वेळा खासदार, 2 वेळा केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस, उत्तर प्रदेशचे प्रभारी, कार्यसमिती सदस्य, निवडणूक अभियान प्रमुख बनवले. तसेच त्यांना ५० पेक्षा जास्त तिकीटे आणि ९ मंत्री दिले. काँग्रेसने त्यांच्यासाठी इतके करूनही ते मोदी-शाह यांच्या शरणमध्ये गेले', असे टि्वट मध्यप्रदेश काँग्रेस सरकारने केले आहे. त्याचबरोबर त्यांनी विश्वास तुटलेले एक छायाचित्र देखील शेअर केले आहे.

  • सिंधिया जी की 18 साल की राजनीति में कांग्रेस ने :

    - 17 साल सांसद बनाया
    - 2 बार केंद्रीय मंत्री बनाया
    - मुख्य सचेतक बनाया
    - राष्ट्रीय महासचिव बनाया
    - यूपी का प्रभारी बनाया
    - कार्यसमिति सदस्य बनाया
    - चुनाव अभियान प्रमुख बनाया
    - 50+ टिकट, 9 मंत्री दिये

    फिर भी मोदी-शाह की शरण में ? pic.twitter.com/bABGfFuYc5

    — MP Congress (@INCMP) March 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर दुसऱया टि्वटमध्ये मध्य प्रदेश सरकारने टि्वट करून राजीनामा दिलेल्या आमदारांना पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. घर सोडून जावू नका, तिथे सन्मान, प्रेम, आदर मिळणार नाही, असा आशय असलेली कविता शेअर केली आहे.

  • सम्मान-सौहार्द का,
    ये मंज़र न मिलेगा,
    घर छोड़ कर मत जाओ,
    कहीं घर न मिलेगा।

    याद बहुत आयेंगे,
    रिश्तों के ये लम्बे बरस,
    साया जब वहाँ कोई,
    सर पर न मिलेगा।

    नफ़रत के झुंड में,
    आग तो मिलेगी बहुत,
    पर यहाँ जैसा कहीं,
    प्यार का दर न मिलेगा।

    घर छोड़कर मत जाओ,
    कहीं घर न मिलेगा। pic.twitter.com/QbmdWpagrF

    — MP Congress (@INCMP) March 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले आहे. मात्र, बहुमत सिद्ध करु, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. काँग्रेसने सर्व आमदार सुरक्षिततेसाठी राजस्थानातील जयपूर शहरात हलविले आहेत. तेथील ब्यूना व्हिस्टा रिसॉर्टमध्ये ते थांबणार आहेत. दरम्यान भाजपने आपल्या १०६ आमदारांना हरियाणामध्ये नेले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याबरोबर २२ आमदारांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारवर संकट आले आहे. यावर ज्योतिरादित्य यांना गेल्या 18 वर्षांच्या राजकिय कारकिर्दीत काँग्रेसने काय-काय दिले, याची आठवण करुन देणारे आणि आमदारांना परत पक्षात येण्याचे आवाहन करणारे टि्वट मध्यप्रदेश काँग्रेस सरकारने केले आहे.

'सिंधिया यांना गेल्या 18 वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेसने 17 वेळा खासदार, 2 वेळा केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस, उत्तर प्रदेशचे प्रभारी, कार्यसमिती सदस्य, निवडणूक अभियान प्रमुख बनवले. तसेच त्यांना ५० पेक्षा जास्त तिकीटे आणि ९ मंत्री दिले. काँग्रेसने त्यांच्यासाठी इतके करूनही ते मोदी-शाह यांच्या शरणमध्ये गेले', असे टि्वट मध्यप्रदेश काँग्रेस सरकारने केले आहे. त्याचबरोबर त्यांनी विश्वास तुटलेले एक छायाचित्र देखील शेअर केले आहे.

  • सिंधिया जी की 18 साल की राजनीति में कांग्रेस ने :

    - 17 साल सांसद बनाया
    - 2 बार केंद्रीय मंत्री बनाया
    - मुख्य सचेतक बनाया
    - राष्ट्रीय महासचिव बनाया
    - यूपी का प्रभारी बनाया
    - कार्यसमिति सदस्य बनाया
    - चुनाव अभियान प्रमुख बनाया
    - 50+ टिकट, 9 मंत्री दिये

    फिर भी मोदी-शाह की शरण में ? pic.twitter.com/bABGfFuYc5

    — MP Congress (@INCMP) March 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर दुसऱया टि्वटमध्ये मध्य प्रदेश सरकारने टि्वट करून राजीनामा दिलेल्या आमदारांना पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. घर सोडून जावू नका, तिथे सन्मान, प्रेम, आदर मिळणार नाही, असा आशय असलेली कविता शेअर केली आहे.

  • सम्मान-सौहार्द का,
    ये मंज़र न मिलेगा,
    घर छोड़ कर मत जाओ,
    कहीं घर न मिलेगा।

    याद बहुत आयेंगे,
    रिश्तों के ये लम्बे बरस,
    साया जब वहाँ कोई,
    सर पर न मिलेगा।

    नफ़रत के झुंड में,
    आग तो मिलेगी बहुत,
    पर यहाँ जैसा कहीं,
    प्यार का दर न मिलेगा।

    घर छोड़कर मत जाओ,
    कहीं घर न मिलेगा। pic.twitter.com/QbmdWpagrF

    — MP Congress (@INCMP) March 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले आहे. मात्र, बहुमत सिद्ध करु, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. काँग्रेसने सर्व आमदार सुरक्षिततेसाठी राजस्थानातील जयपूर शहरात हलविले आहेत. तेथील ब्यूना व्हिस्टा रिसॉर्टमध्ये ते थांबणार आहेत. दरम्यान भाजपने आपल्या १०६ आमदारांना हरियाणामध्ये नेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.