ETV Bharat / bharat

देशात 24 तासात आढळले 1 हजार 990 कोरोनाबाधित, तर 49 जण दगावले

गेल्या 24 तासात देशात एकूण 1 हजार 990 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

author img

By

Published : Apr 26, 2020, 3:02 PM IST

India's COVID-19 count reaches 26,496, deaths at 824
India's COVID-19 count reaches 26,496, deaths at 824

नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 1 हजार 990 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजार 496 झाला आहे, यात 19 हजार 868 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 5 हजार 804 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 824 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये 7 हजार 628 कोरोनाबाधित असून 323 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 3 हजार 71 कोरोनाबाधित असून 133 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्येही 2 हजार 83 कोरोनाबाधित आढळले असून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 2 हजार 625कोरोनाबाधित तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 1 हजार 821 कोरोनाबाधित असून 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. देशभरातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. एक महिन्यापासून देशामध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. एकीकडे अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आवाहन असताना कोरोनालाही देशातून समुळ नष्ट करण्याचे आवाहन सरकारपुढे आहे.

नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 1 हजार 990 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजार 496 झाला आहे, यात 19 हजार 868 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 5 हजार 804 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 824 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये 7 हजार 628 कोरोनाबाधित असून 323 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 3 हजार 71 कोरोनाबाधित असून 133 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्येही 2 हजार 83 कोरोनाबाधित आढळले असून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 2 हजार 625कोरोनाबाधित तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 1 हजार 821 कोरोनाबाधित असून 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. देशभरातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. एक महिन्यापासून देशामध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. एकीकडे अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आवाहन असताना कोरोनालाही देशातून समुळ नष्ट करण्याचे आवाहन सरकारपुढे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.