ETV Bharat / bharat

गांधी १५० :  स्वातंत्र्यसंग्रामामध्ये हजारीबागचे योगदान

झारखंडमधील हजारीबाग शहर हे तिथल्या अभयारण्यांसाठी तर प्रसिद्ध आहेच. मात्र या शहराला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. जाणून घेऊया स्वातंत्र्यसंग्रामामध्ये हजारीबागचे काय योगदान होते...

author img

By

Published : Sep 19, 2019, 5:05 AM IST

Gandhi 150

रांची - स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान, १८ सप्टेंबर १९२५ला गांधीजींनी हजारीबाग शहराला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी सेंट कोलंबस महाविद्यालयातील विटले सभागृहात भाषण केले होते. या भाषणामध्ये त्यांनी साक्षरता, अस्पृश्यता, विधवा पुनर्विवाह अशा बऱ्याच मुद्यांना हात घातला होता.

गांधी १५० : स्वातंत्र्यसंग्रामामध्ये हजारीबागचे योगदान
राष्ट्रीय चळवळ उभारण्याकरता हजारीबाग हे मोक्याचे शहर होते. येथील मतवारी मैदानावर महात्मा गांधींनी स्वातंत्र्य सैनिकांना संबोधित करत एक भाषण केले होते. या भाषणात त्यांनी ब्रिटिश सरकारवर आणि समाजातील भेदभावावर टीका केली होती. आज या जागेला गांधी मैदान म्हणून ओळखले जाते. याच दरम्यान गांधीजींनी कर्जनी मैदानावर देखील सभा घेतली होती. यावेळी सुरत बाबू यांच्या घरी गांधीजींनी मुक्काम केला होता. विनोबा भावे विद्यापिठाचे प्र-कुलगुरू डॉ. रमेश शरण यांनी सांगितले, की महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त विद्यापिठात चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही पहा : मंडला : जिथे बापूंनी अस्पृश्यतेविरूद्ध उभारले होते मोठे आंदोलन

हजारीबागमधील प्रसिद्ध स्वातंत्र्य योद्धे रामनारायण सिंह हे गांधीजींच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. गांधीजी आणि रामनारायण यांच्यात नेहमी पत्रव्यवहार होत असे. ज्यामध्ये ते सामाजिक बाबी आणि स्वातंत्र्यलढ्याबाबत चर्चा करत. रामनारायण यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर, गांधीजींनी पत्र लिहून त्यांचे सांत्वन केले होते.

महात्मा गांधींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी हजारीबागला देखील आणल्या होत्या. हजारीबागच्या कुमार टोलीमध्ये त्यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. जिथे मोठ्या प्रमाणावर लोकांनी गांधीजींना श्रद्धांजली वाहिली.

नंतर, याठिकाणी गांधीजींचे स्मारक देखील उभारण्यात आले. दरवर्षी येथे गांधीजींची जयंती आणि पुण्यतिथीला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

हेही पहा : उमाशंकर प्रसाद : 'महाराजगंजचे गांधी आणि मालवीय'

रांची - स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान, १८ सप्टेंबर १९२५ला गांधीजींनी हजारीबाग शहराला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी सेंट कोलंबस महाविद्यालयातील विटले सभागृहात भाषण केले होते. या भाषणामध्ये त्यांनी साक्षरता, अस्पृश्यता, विधवा पुनर्विवाह अशा बऱ्याच मुद्यांना हात घातला होता.

गांधी १५० : स्वातंत्र्यसंग्रामामध्ये हजारीबागचे योगदान
राष्ट्रीय चळवळ उभारण्याकरता हजारीबाग हे मोक्याचे शहर होते. येथील मतवारी मैदानावर महात्मा गांधींनी स्वातंत्र्य सैनिकांना संबोधित करत एक भाषण केले होते. या भाषणात त्यांनी ब्रिटिश सरकारवर आणि समाजातील भेदभावावर टीका केली होती. आज या जागेला गांधी मैदान म्हणून ओळखले जाते. याच दरम्यान गांधीजींनी कर्जनी मैदानावर देखील सभा घेतली होती. यावेळी सुरत बाबू यांच्या घरी गांधीजींनी मुक्काम केला होता. विनोबा भावे विद्यापिठाचे प्र-कुलगुरू डॉ. रमेश शरण यांनी सांगितले, की महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त विद्यापिठात चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही पहा : मंडला : जिथे बापूंनी अस्पृश्यतेविरूद्ध उभारले होते मोठे आंदोलन

हजारीबागमधील प्रसिद्ध स्वातंत्र्य योद्धे रामनारायण सिंह हे गांधीजींच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. गांधीजी आणि रामनारायण यांच्यात नेहमी पत्रव्यवहार होत असे. ज्यामध्ये ते सामाजिक बाबी आणि स्वातंत्र्यलढ्याबाबत चर्चा करत. रामनारायण यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर, गांधीजींनी पत्र लिहून त्यांचे सांत्वन केले होते.

महात्मा गांधींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी हजारीबागला देखील आणल्या होत्या. हजारीबागच्या कुमार टोलीमध्ये त्यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. जिथे मोठ्या प्रमाणावर लोकांनी गांधीजींना श्रद्धांजली वाहिली.

नंतर, याठिकाणी गांधीजींचे स्मारक देखील उभारण्यात आले. दरवर्षी येथे गांधीजींची जयंती आणि पुण्यतिथीला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

हेही पहा : उमाशंकर प्रसाद : 'महाराजगंजचे गांधी आणि मालवीय'

Intro:Body:

गांधी १५० :  स्वातंत्र्यसंग्रामामध्ये हजारीबागचे योगदान...





झारखंडमधील हजारीबाग शहर हे तिथल्या अभयारण्यांसाठी तर प्रसिद्ध आहेच. मात्र या शहराला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. जाणून घेऊया स्वातंत्र्यसंग्रामामध्ये हजारीबागचे काय योगदान होते...

रांची - स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान, १८ सप्टेंबर १९२५ला गांधीजींनी हजारीबाग शहराला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी सेंट कोलंबस महाविद्यालयातील विटले सभागृहात भाषण केले होते. या भाषणामध्ये त्यांनी साक्षरता, अस्पृश्यता, विधवा पुनर्विवाह अशा बऱ्याच मुद्यांना हात घातला होता.

राष्ट्रीय चळवळ उभारण्याकरीता हजारीबाग हे मोक्याचे शहर होते. इथल्या मतवारी मैदानावर महात्मा गांधींनी स्वातंत्र्य सैनिकांना संबोधित करत एक भाषण केले होते. या भाषणात त्यांनी ब्रिटिश सरकारवर आणि समाजातील भेदभावावर टीका केली होती. आज या जागेला गांधी मैदान म्हणून ओळखले जाते. याच दरम्यान गांधीजींनी कर्जनी मैदानावर देखील सभा घेतली होती. यावेळी सुरत बाबू यांच्या घरी गांधीजींनी मुक्काम केला होता. 

विनोबा भावे विद्यापिठाचे प्र-कुलगुरू डॉ. रमेश शरण यांनी सांगितले, की महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती निमित्त विद्यापिठात चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हजारीबागमधील प्रसिद्ध स्वातंत्र्य योद्धे रामनारायण सिंह हे गांधीजींच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. गांधीजी आणि रामनारायण यांच्यात नेहमी पत्रव्यवहार होत असे. ज्यामध्ये ते सामाजिक बाबी आणि स्वातंत्र्यलढ्याबाबत चर्चा करत. रामनारायण यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर, गांधीजींनी पत्र लिहून त्यांचे सांत्वन केले होते.  

महात्मा गांधींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी हजारीबागला देखील आणल्या होत्या. हजारीबागच्या कुमार टोलीमध्ये त्यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. जिथे मोठ्या प्रमाणावर लोकांनी गांधीजींना श्रद्धांजली वाहिली.

नंतर, याठिकाणी गांधीजींचे स्मारक देखील उभारण्यात आले. दरवर्षी येथे गांधीजींची जयंती आणि पुण्यतिथीला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.