ETV Bharat / bharat

गांधी १५० : स्वातंत्र्यलढ्यामध्ये बक्सरचे योगदान...

ज्या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीही अस्ताला जात नाही असे लोक म्हणत, त्याच ब्रिटिशांना शह देत, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला. महात्मा गांधींची सत्य आणि अहिंसा ही शस्त्रे वापरत आपण ब्रिटिशांवर मात केली होती. त्यांच्यासोबतच, स्वातंत्र्यलढ्यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या कित्येक शूर स्वातंत्र्यसैनिकांचेही योगदान हे अतुलनीय आणि कधीही न विसरण्यासारखे आहे.

author img

By

Published : Sep 11, 2019, 10:57 PM IST

Updated : Sep 12, 2019, 7:27 AM IST

गांधी १५०

पाटणा - गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीमध्ये, बक्सरचं मोठं योगदान राहिलं आहे. बक्सरच्या शाहबादमध्येच महात्मा गांधींनी आपल्या स्वातंत्र्यता आंदोलनाचा पाया रचला. या दरम्यान, गांधीजींनी बक्सरला पाच वेळा भेट दिली. ११ ऑगस्ट १९२१ला गांधीजींनी असहकार आंदोलनासाठी बक्सरला भेट दिली. तर, २५ एप्रिल १९३४ला त्यांनी सविनय कायदेभंगाच्या आंदोलनासाठी बक्सरला भेट दिली. याआधी १९९४, १९१७ आणि १९१९मध्येही ते बक्सरला गेले होते.

बक्सरमध्ये गेल्यानंतर, गांधीजींनी सगळ्यात आधी श्रीचंद मंदिराला भेट दिली होती. याच मंदिरातच एके काळी डॉ. राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, अनुग्रह नारायण सिंह असे दिग्गज नेते राहिले आहेत. मात्र, आज या मंदिराची पडझड झाली आहे.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये बक्सरचे योगदान...

१९१७च्या चंपारण आंदोलनापासून १९४२च्या चले जाव आंदोलनापर्यंत जेव्हा कधी गांधीजींनी बस्तरला भेट दिली, त्यांना मोठ्या प्रमाणात लोकांनी पाठिंबा दिला. अगदी महिलादेखील यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन, महिला आपल्या अंगावरचे दागिनेही त्यांच्या झोळीत टाकले होते.

रामशंकर तिवारी या एका स्थानिक नेत्याच्या कार्याने प्रभावित होऊन, गांधीजींनी कोरानसराई या गावाला भेट दिली. हे गाव जिल्हा मुख्यालयापासून ३० किलोमीटर लांब होते. तिथे त्यांनी स्थानिक नेत्यांची बैठक घेतली. या भेटीनंतर गांधीजी परत गेले. मात्र इकडे, स्थानिक नेत्यांनी दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खून केला, ज्यामुळे स्वातंत्र्यलढ्याच्या आगीत आणखी तेल ओतले गेले. या घटनेला कित्येक दशके लोटली आहेत. मात्र, या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना आजही या गोष्टीचा अभिमान वाटतो.

हेही पहा : चंपारणचे 'ते' आंदोलन, ज्यामुळे गांधी झाले 'महात्मा'...

पाटणा - गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीमध्ये, बक्सरचं मोठं योगदान राहिलं आहे. बक्सरच्या शाहबादमध्येच महात्मा गांधींनी आपल्या स्वातंत्र्यता आंदोलनाचा पाया रचला. या दरम्यान, गांधीजींनी बक्सरला पाच वेळा भेट दिली. ११ ऑगस्ट १९२१ला गांधीजींनी असहकार आंदोलनासाठी बक्सरला भेट दिली. तर, २५ एप्रिल १९३४ला त्यांनी सविनय कायदेभंगाच्या आंदोलनासाठी बक्सरला भेट दिली. याआधी १९९४, १९१७ आणि १९१९मध्येही ते बक्सरला गेले होते.

बक्सरमध्ये गेल्यानंतर, गांधीजींनी सगळ्यात आधी श्रीचंद मंदिराला भेट दिली होती. याच मंदिरातच एके काळी डॉ. राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, अनुग्रह नारायण सिंह असे दिग्गज नेते राहिले आहेत. मात्र, आज या मंदिराची पडझड झाली आहे.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये बक्सरचे योगदान...

१९१७च्या चंपारण आंदोलनापासून १९४२च्या चले जाव आंदोलनापर्यंत जेव्हा कधी गांधीजींनी बस्तरला भेट दिली, त्यांना मोठ्या प्रमाणात लोकांनी पाठिंबा दिला. अगदी महिलादेखील यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन, महिला आपल्या अंगावरचे दागिनेही त्यांच्या झोळीत टाकले होते.

रामशंकर तिवारी या एका स्थानिक नेत्याच्या कार्याने प्रभावित होऊन, गांधीजींनी कोरानसराई या गावाला भेट दिली. हे गाव जिल्हा मुख्यालयापासून ३० किलोमीटर लांब होते. तिथे त्यांनी स्थानिक नेत्यांची बैठक घेतली. या भेटीनंतर गांधीजी परत गेले. मात्र इकडे, स्थानिक नेत्यांनी दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खून केला, ज्यामुळे स्वातंत्र्यलढ्याच्या आगीत आणखी तेल ओतले गेले. या घटनेला कित्येक दशके लोटली आहेत. मात्र, या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना आजही या गोष्टीचा अभिमान वाटतो.

हेही पहा : चंपारणचे 'ते' आंदोलन, ज्यामुळे गांधी झाले 'महात्मा'...

Last Updated : Sep 12, 2019, 7:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.