ETV Bharat / bharat

रामदेवबाबा आणि पतंजलीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

author img

By

Published : Jun 24, 2020, 1:42 PM IST

पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयातील वकील सुखविन्द्र सिंह नारा यांनी रामदेवबाबा, त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण व पतंजली कंपनीच्या विरोधात हरियाणा पोलिसांत तक्रार दिली आहे. यात त्यांनी गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

file photo
पत्रकार परिषदेचे छायाचित्र

पंचकुला (हरयाणा) - पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे संस्थापक रामदेवबाबा व त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 आणि साथीचे रोग कायदा, 1897 नुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

रामदेव बाबा अन पतंजलीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयातील वकील सुखविंद्र सिंह नारा यांनी हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित रामदेवबाबा, आचार्य बालकृष्ण आणि त्यांची कंपनी पतंजली यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची विनंती केली आहे.

पतंजली कंपनी, रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनील तसेच श्वासारी औषधाबाबत मंगळवारी (दि.23 जून) पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग कायद्याचे उल्लंघन करत सामाजिक अंतराचा फज्जा उडविला होता. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

तसेच, त्यांनी कोरोनावर हे औषध असल्याचा दावा केला होता. पण, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या औषधासंदर्भात नेमक्या कोणत्या चाचण्या घेण्यात आल्या? कशाच्या आधारे या औषधाचे संशोधन झाले? संशोधन, चाचण्या झाले असतील तर, त्याबाबत यापूर्वी कोणाला माहिती दिली होती? आयसीएमआर व आयुष मंत्रालयाकडून या औषधनिर्मिती तसेच विक्रीची परवानगी पतंजलीला मिळाली आहे का, अशा विविध प्रश्न सुखविंद्र सिंह यांनी उपस्थित केले आहेत. यामुळे जोपर्यंत पतंजलीच्या या औषधाला शासनमान्यता मिळत नाही. तोपर्यंत कोणीही ते औषध घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, 'आयुष'ने जारी केलेल्या एका सूचनेनुसार, मंत्रालयाने पतंजलीच्या या दाव्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळेच, आयुषने कंपनीला या औषधामध्ये वापरण्यात आलेल्या घटकांची महिती मागवली आहे. तसेच, यावेळी कंपनीकडून करण्यात आलेल्या संशोधनाचीही संपूर्ण माहिती मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.

कंपनीला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, की अशा प्रकारचे दावे करणे हे ड्रग्स अ‌ॅण्ड मॅजिक रेमेडिज् (आक्षेपार्ह जाहीराती) कायदा, १९५४; आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार बेकायदेशीर आहे. त्यामुळे याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती, आणि चाचण्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश कंपनीला देण्यात आला आहे.

हेही वाचा - कोरोनासाठी भारतात चौथे औषध; पतंजलीचे 'कोरोनील' लॉंच..

हेही वाचा - पतंजलीचे कोरोनावरील औषध वादाच्या भोवऱ्यात; 'आयुष' मंत्रालयाने मागितले दाव्यांचे पुरावे..

पंचकुला (हरयाणा) - पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे संस्थापक रामदेवबाबा व त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 आणि साथीचे रोग कायदा, 1897 नुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

रामदेव बाबा अन पतंजलीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयातील वकील सुखविंद्र सिंह नारा यांनी हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित रामदेवबाबा, आचार्य बालकृष्ण आणि त्यांची कंपनी पतंजली यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची विनंती केली आहे.

पतंजली कंपनी, रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनील तसेच श्वासारी औषधाबाबत मंगळवारी (दि.23 जून) पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग कायद्याचे उल्लंघन करत सामाजिक अंतराचा फज्जा उडविला होता. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

तसेच, त्यांनी कोरोनावर हे औषध असल्याचा दावा केला होता. पण, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या औषधासंदर्भात नेमक्या कोणत्या चाचण्या घेण्यात आल्या? कशाच्या आधारे या औषधाचे संशोधन झाले? संशोधन, चाचण्या झाले असतील तर, त्याबाबत यापूर्वी कोणाला माहिती दिली होती? आयसीएमआर व आयुष मंत्रालयाकडून या औषधनिर्मिती तसेच विक्रीची परवानगी पतंजलीला मिळाली आहे का, अशा विविध प्रश्न सुखविंद्र सिंह यांनी उपस्थित केले आहेत. यामुळे जोपर्यंत पतंजलीच्या या औषधाला शासनमान्यता मिळत नाही. तोपर्यंत कोणीही ते औषध घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, 'आयुष'ने जारी केलेल्या एका सूचनेनुसार, मंत्रालयाने पतंजलीच्या या दाव्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळेच, आयुषने कंपनीला या औषधामध्ये वापरण्यात आलेल्या घटकांची महिती मागवली आहे. तसेच, यावेळी कंपनीकडून करण्यात आलेल्या संशोधनाचीही संपूर्ण माहिती मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.

कंपनीला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, की अशा प्रकारचे दावे करणे हे ड्रग्स अ‌ॅण्ड मॅजिक रेमेडिज् (आक्षेपार्ह जाहीराती) कायदा, १९५४; आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार बेकायदेशीर आहे. त्यामुळे याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती, आणि चाचण्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश कंपनीला देण्यात आला आहे.

हेही वाचा - कोरोनासाठी भारतात चौथे औषध; पतंजलीचे 'कोरोनील' लॉंच..

हेही वाचा - पतंजलीचे कोरोनावरील औषध वादाच्या भोवऱ्यात; 'आयुष' मंत्रालयाने मागितले दाव्यांचे पुरावे..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.