ETV Bharat / bharat

'हम यह नहीं कहते महामारी नहीं थी, हम यह बता रहे हैं तयारी नहीं थी' , थरूर यांची कवितेद्वारे मोदींवर टीका

author img

By

Published : Sep 20, 2020, 6:25 PM IST

Updated : Sep 20, 2020, 7:20 PM IST

संसदेमध्ये कोरोना, अर्थव्यवस्था, अचानक लागू करण्यात आलेले लॉकडाऊन तसेच मोदींनी देशातील जनतेला दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनावरुन काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

थरूर
थरूर

नवी दिल्ली - संसदेत पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. यावेळी संसदेमध्ये कोरोना, अर्थव्यवस्था, अचानक लागू करण्यात आलेले लॉकडाऊन तसेच मोदींनी देशातील जनतेला दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनावरुन काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. 'हम यह नही कहते महामारी नही थी, हम यह बता रहे है तयारी नही थी, तयारी से लढते तो हालात ना होते, रेल की पटरी पर वो प्रवासी ना सोते', या कवितेद्वारे त्यांनी लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी सामना केलेल्या संकटाचा उल्लेख करत, मोदींवर निशाणा साधला.

थरूर यांची कवितेद्वारे मोदींवर टीका

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपण सक्षम ठरलो नाही. कोरोचा प्रसार वाढत गेला. तर अर्थव्यवस्था कोसळली. लॉकडाऊनमध्ये लाखो युवक बेरोजगार झाले. घर घर में अधेंरा है, कही बहार नही है. बैठे है युवा खाली, रोजगार नही है, या शायरीतून त्यांनी बेरोजगारांचे दु:ख मांडले. तसेच गेल्या 41 वर्षात प्रथमच जीडीपी इतका रसातळाला गेल्याचे ते म्हणाले.

कुणाशीही चर्चा न करता, मोदींनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली. मोदींच्या भाषणानंतर काही वेळातच वाहतूक बंद झाली. अचानक लॉकडाऊन लागू झाल्याने स्थलांतरीत कामगारांनी पायीच घराचा रस्ता धरला. यामध्ये अनेक दुर्घटना घडल्या. महाभारताचं युद्ध 18 दिवसात जिंकलं होतं, कोरोना विरोधातील युद्ध 21 दिवसात जिंकण्याचा प्रयत्न असेल, असे पंतप्रधान म्हणाले. मात्र, कोरोचा प्रसार वाढत गेला असून देशात कोरोना रुग्णांची संख्या लाखांवर पोहचली आहे, असे थरूर म्हणाले.

वहूानमधून कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर काँग्रेसने सरकारला कोरोना संकटाबाबत सूचीत केले होते. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या 6 वर्षांत मोदी सरकारने धक्कातंत्र वापरत निर्णय घेतले आहेत. निर्णयाच्या तयारीत त्रुटी राहिल्याने लोकांना त्रास झाला, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली - संसदेत पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. यावेळी संसदेमध्ये कोरोना, अर्थव्यवस्था, अचानक लागू करण्यात आलेले लॉकडाऊन तसेच मोदींनी देशातील जनतेला दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनावरुन काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. 'हम यह नही कहते महामारी नही थी, हम यह बता रहे है तयारी नही थी, तयारी से लढते तो हालात ना होते, रेल की पटरी पर वो प्रवासी ना सोते', या कवितेद्वारे त्यांनी लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी सामना केलेल्या संकटाचा उल्लेख करत, मोदींवर निशाणा साधला.

थरूर यांची कवितेद्वारे मोदींवर टीका

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपण सक्षम ठरलो नाही. कोरोचा प्रसार वाढत गेला. तर अर्थव्यवस्था कोसळली. लॉकडाऊनमध्ये लाखो युवक बेरोजगार झाले. घर घर में अधेंरा है, कही बहार नही है. बैठे है युवा खाली, रोजगार नही है, या शायरीतून त्यांनी बेरोजगारांचे दु:ख मांडले. तसेच गेल्या 41 वर्षात प्रथमच जीडीपी इतका रसातळाला गेल्याचे ते म्हणाले.

कुणाशीही चर्चा न करता, मोदींनी अचानक लॉकडाऊनची घोषणा केली. मोदींच्या भाषणानंतर काही वेळातच वाहतूक बंद झाली. अचानक लॉकडाऊन लागू झाल्याने स्थलांतरीत कामगारांनी पायीच घराचा रस्ता धरला. यामध्ये अनेक दुर्घटना घडल्या. महाभारताचं युद्ध 18 दिवसात जिंकलं होतं, कोरोना विरोधातील युद्ध 21 दिवसात जिंकण्याचा प्रयत्न असेल, असे पंतप्रधान म्हणाले. मात्र, कोरोचा प्रसार वाढत गेला असून देशात कोरोना रुग्णांची संख्या लाखांवर पोहचली आहे, असे थरूर म्हणाले.

वहूानमधून कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर काँग्रेसने सरकारला कोरोना संकटाबाबत सूचीत केले होते. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या 6 वर्षांत मोदी सरकारने धक्कातंत्र वापरत निर्णय घेतले आहेत. निर्णयाच्या तयारीत त्रुटी राहिल्याने लोकांना त्रास झाला, असेही ते म्हणाले.

Last Updated : Sep 20, 2020, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.