ETV Bharat / bharat

कोरेगाव-भीमा प्रकरण : 'एनआयए'च्या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने नवलखांना मागितले उत्तर..

दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी आतापर्यंत एनआयएसमोर झालेल्या सर्व सुनावण्यांचे रेकॉर्ड मागितले होते. तर, या सुनावण्यांचे रेकॉर्ड मागण्याचा अधिकार दिल्ली उच्च न्यायालयाला नसल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले आहे.

author img

By

Published : Jun 2, 2020, 5:14 PM IST

Bhima Koregaon case: SC seeks reply of Gautam Navlakha on NIA's plea
कोरेगाव-भीमा प्रकरण : 'एनआयए'च्या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने नवलखांना मागितले उत्तर..

नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोरेगाव-भीमा प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली गेली होती. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखांना उत्तर मागितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी आतापर्यंत एनआयएसमोर झालेल्या सर्व सुनावण्यांचे रेकॉर्ड मागितले होते.

जस्टिस अरुण मिश्रा, एस. ए. नझीर आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने नवलखांना नोटीस बजावली आहे. नवलखांना काही दिवसांपूर्वी दिल्लीहून मुंबईच्या तिहार तुरुंगामध्ये हलवण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाचे म्हणण्यानुसार, नवलखा यांचा आंतरिम जामीन अर्ज पेंडिंग असतानाही एनआयएने त्यांना दिल्लीमधून मुंबईला हलवले. त्यामुळे त्यांनी सर्व सुनावण्यांचे रेकॉर्ड मागितले होते. तर, या सुनावण्यांचे रेकॉर्ड मागण्याचा अधिकार दिल्ली उच्च न्यायालयाला नसल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले आहे.

एल्गार परिषद प्रकरणी नवलखांना २२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा : तेलुगु लेखक वरावरा राव मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोरेगाव-भीमा प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली गेली होती. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखांना उत्तर मागितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी आतापर्यंत एनआयएसमोर झालेल्या सर्व सुनावण्यांचे रेकॉर्ड मागितले होते.

जस्टिस अरुण मिश्रा, एस. ए. नझीर आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने नवलखांना नोटीस बजावली आहे. नवलखांना काही दिवसांपूर्वी दिल्लीहून मुंबईच्या तिहार तुरुंगामध्ये हलवण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाचे म्हणण्यानुसार, नवलखा यांचा आंतरिम जामीन अर्ज पेंडिंग असतानाही एनआयएने त्यांना दिल्लीमधून मुंबईला हलवले. त्यामुळे त्यांनी सर्व सुनावण्यांचे रेकॉर्ड मागितले होते. तर, या सुनावण्यांचे रेकॉर्ड मागण्याचा अधिकार दिल्ली उच्च न्यायालयाला नसल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले आहे.

एल्गार परिषद प्रकरणी नवलखांना २२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा : तेलुगु लेखक वरावरा राव मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.