ETV Bharat / bharat

मोदींना पत्र लिहणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकले अशोक पंडित, म्हणाले तुम्ही तर...

author img

By

Published : Jul 25, 2019, 11:39 AM IST

सेलिब्रिटींची इच्छा मदत करण्याची नाही, त्यांना फक्त प्रसिद्धी मिळवायची आहे. जर त्यांची खरचं मदत करायची ईच्छा असती तर पत्र लिहण्याऐवजी त्यांनी मोदींना भेटून चर्चा केली असती

अशोक पंडित

मुंबई - देशामध्ये वाढत्या झुंडबळीच्या (मॉब लिंचिंग) घटनांविरोधात सेलिब्रेटींनी आवाज उठवला आहे. या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील ४९ मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. मात्र, या पत्रावर चित्रपट दिगदर्शक अशोक पंडित यांनी आगपाखड केली आहे. निवडणुका जवळ आल्या की, पावसाळी बेडकं जशी बाहेर येऊन आवाज करतात, तसं हे सेलिब्रिटी निवडणुकांच्या तोंडावर मोदी विरोधात आवाज करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

या सेलिब्रिटींची इच्छा मदत करण्याची नाही, त्यांना फक्त प्रसिद्धी मिळवायची आहे. जर त्यांची खरचं मदत करायची इच्छा असती तर पत्र लिहण्याऐवजी त्यांनी मोदींना भेटून चर्चा केली असती, असे एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान अशोक पंडित म्हणाले.

२०१९ साली ही पावसाळी बेडकं पुन्हा बाहेर येवून आवाज करतायेत. निवडणुकांच्या आधी यांना बाहेर येवून देशाला शिव्या घाला, असं सांगण्यात आलयं. ही लोकं परदेशात भारताची बदनामी करतात. आम्ही आपल्या देशात जय श्रीराम नाही बोलायचं तर कुठं बोलयचं. ही लोकं पैसे घेऊन निवडणुका आल्या की मोदी विरोधात बोलण्याचं काम करतात, असं अशोक पंडित म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात झुंडबळीच्या घटना वाढल्या असून त्यात अनेक जणांचा बळी गेला आहे. या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील ४९ मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये मणिरत्नम, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील ४९ जणांचा समावेश आहे. त्यांना अशोक पंडित यांनी फटकारले आहे.

देशभरात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात सेलिब्रेटींनी आवाज उठवला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत चिंता व्यक्त केली होती.

मुंबई - देशामध्ये वाढत्या झुंडबळीच्या (मॉब लिंचिंग) घटनांविरोधात सेलिब्रेटींनी आवाज उठवला आहे. या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील ४९ मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. मात्र, या पत्रावर चित्रपट दिगदर्शक अशोक पंडित यांनी आगपाखड केली आहे. निवडणुका जवळ आल्या की, पावसाळी बेडकं जशी बाहेर येऊन आवाज करतात, तसं हे सेलिब्रिटी निवडणुकांच्या तोंडावर मोदी विरोधात आवाज करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

या सेलिब्रिटींची इच्छा मदत करण्याची नाही, त्यांना फक्त प्रसिद्धी मिळवायची आहे. जर त्यांची खरचं मदत करायची इच्छा असती तर पत्र लिहण्याऐवजी त्यांनी मोदींना भेटून चर्चा केली असती, असे एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान अशोक पंडित म्हणाले.

२०१९ साली ही पावसाळी बेडकं पुन्हा बाहेर येवून आवाज करतायेत. निवडणुकांच्या आधी यांना बाहेर येवून देशाला शिव्या घाला, असं सांगण्यात आलयं. ही लोकं परदेशात भारताची बदनामी करतात. आम्ही आपल्या देशात जय श्रीराम नाही बोलायचं तर कुठं बोलयचं. ही लोकं पैसे घेऊन निवडणुका आल्या की मोदी विरोधात बोलण्याचं काम करतात, असं अशोक पंडित म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात झुंडबळीच्या घटना वाढल्या असून त्यात अनेक जणांचा बळी गेला आहे. या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील ४९ मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये मणिरत्नम, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील ४९ जणांचा समावेश आहे. त्यांना अशोक पंडित यांनी फटकारले आहे.

देशभरात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात सेलिब्रेटींनी आवाज उठवला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत चिंता व्यक्त केली होती.

Intro:Body:

north korea tested two missiles in east sea

north korea, south korea, kim jong un, east sea, missile test, sea, korea conflict, उत्तर कोरीयाची   



उत्तर कोरियाची पुन्हा आगळीक; पुर्व समुद्रात दोन क्षेपणास्त्रांची चाचणी 

सेऊल - उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामधील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. उत्तर कोरियाने पुर्व समुद्रामध्ये पुन्हा दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. ही क्षेणपणास्त्रे कशा प्रकारची आहेत, हे मात्र समजू शकले नाही. 

गुरुवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) ५.३० आणि ५.५७ वाजता दोन क्षेपणास्त्रे पुर्व समुद्रात (सी ऑफ जपान) डागण्यात आली. उत्तर कोरियातील वोनसॅन भागातून डागण्यात आलेल्या ही क्षेपणास्त्रे ४३० कि.मी पर्यंत गेल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले.

आमची सुरक्षा दले सर्व घडामोडींवर नजर ठेवून आहेत. उत्तर कोरियाकडून आणखी क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात येत आहे का ? यावरही आम्ही नजर ठेवून आहोत. तसेच आम्ही पुर्णपणे सतर्क आहोत, असे दक्षिण कोरियाचे जॉईन्ट चिफ ऑफ स्टाफ यांनी सांगितले. 

जून महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी दोन्ही देशांच्या 'डिमीलिटराईज्ड' (लष्कर तैनात करण्यास परवानगी नसलेला सीमा भाग) भागामध्ये भेट दिली होती. त्यानंतर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागण्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी मे महिन्यात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. 

  


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.