ETV Bharat / bharat

लष्करप्रमुख आणि राजनाथ सिंह यांची बैठक; लडाख सीमेवरील सद्य स्थितीचा घेतला आढावा

author img

By

Published : Jun 26, 2020, 10:16 PM IST

15 जूनला गलवान खोऱ्यातील हिंसाचारानंतर भारतीय सीमेवर हाय अलर्ट आहे. 22 जूनला वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चिनी सैनिक आणि वाहनांचा ताफा सीमेवरुन काही अंतर मागे सरकला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी आज(शुक्रवार) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेवून लडाख सीमेवरील परिस्थितीची माहिती दिली. लष्करप्रमुख नरवणे दोन दिवस पूर्व लडाखच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सीमेवरील फॉर्वर्ड पोस्टला(चौकी) भेटी दिल्या तसेच सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला.

15 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर भारतीय सीमेवर ‘हाय अलर्ट’ आहे. 22 जूनला वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चिनी सैनिक आणि वाहनांचा ताफा सीमेवरुन काही अंतर मागे सरकला आहे. पुन्हा सीमेवर हिंसाचाराची घटना टाळण्यासाठी लष्कराकडून पाऊले उचलण्यात येत आहेत. 22 जूनला भारतीय लष्कराचे 14 कॉर्पर्स कमांडर हरिंदर सिंग आणि चीनी समकक्ष अधिकारी यांच्यात मोल्डो येथे चर्चा झाली. या बैठकीत सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.

15 जूनच्या रात्री गलवान व्हॅली भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाली. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. तर अनेकजण जखमी झाले. चीनचेही सैनिक या हाणामारीत मारले गेले असून चीनने आकडेवारी जाहीर केली नाही. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीवर चीनने दावा सांगितला आहे. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. चीनच्या याआधीच्या भूमिकांशीच हा दावा सुसंगत नसल्याचे म्हणत भारताने हा दावा फेटाळला आहे. दोन्ही देशांतील कराराचे चीनने पालन केले नाही तर दोन्ही देशांतील संबध आणखी बिघडतील, असा इशारा भारताने चीनला दिला आहे.

नवी दिल्ली - लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी आज(शुक्रवार) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेवून लडाख सीमेवरील परिस्थितीची माहिती दिली. लष्करप्रमुख नरवणे दोन दिवस पूर्व लडाखच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सीमेवरील फॉर्वर्ड पोस्टला(चौकी) भेटी दिल्या तसेच सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला.

15 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर भारतीय सीमेवर ‘हाय अलर्ट’ आहे. 22 जूनला वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चिनी सैनिक आणि वाहनांचा ताफा सीमेवरुन काही अंतर मागे सरकला आहे. पुन्हा सीमेवर हिंसाचाराची घटना टाळण्यासाठी लष्कराकडून पाऊले उचलण्यात येत आहेत. 22 जूनला भारतीय लष्कराचे 14 कॉर्पर्स कमांडर हरिंदर सिंग आणि चीनी समकक्ष अधिकारी यांच्यात मोल्डो येथे चर्चा झाली. या बैठकीत सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.

15 जूनच्या रात्री गलवान व्हॅली भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाली. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. तर अनेकजण जखमी झाले. चीनचेही सैनिक या हाणामारीत मारले गेले असून चीनने आकडेवारी जाहीर केली नाही. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीवर चीनने दावा सांगितला आहे. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. चीनच्या याआधीच्या भूमिकांशीच हा दावा सुसंगत नसल्याचे म्हणत भारताने हा दावा फेटाळला आहे. दोन्ही देशांतील कराराचे चीनने पालन केले नाही तर दोन्ही देशांतील संबध आणखी बिघडतील, असा इशारा भारताने चीनला दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.