लखनौ- उत्तर प्रदेशात 61 हजार 500 नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तर 438 जणांना विलगीकरण कक्षात भर्ती करण्यात आले आहे. 4 हजारांपेक्षा जास्त जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
-
उत्तर प्रदेश में आइसोलेशन वार्ड में 438 लोगों को और क्वारंटाइन में 4000 लोगों को रखा गया है। निगरानी में रखे गए लोगों की संख्या 61,500 से अधिक है। 25 लोग ठीक भी हो चुके हैं: उत्तर प्रदेश CM योगी आदित्यनाथ pic.twitter.com/jTbnO5Vjuq
— ANI_HindiNews (@AHindinews) April 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">उत्तर प्रदेश में आइसोलेशन वार्ड में 438 लोगों को और क्वारंटाइन में 4000 लोगों को रखा गया है। निगरानी में रखे गए लोगों की संख्या 61,500 से अधिक है। 25 लोग ठीक भी हो चुके हैं: उत्तर प्रदेश CM योगी आदित्यनाथ pic.twitter.com/jTbnO5Vjuq
— ANI_HindiNews (@AHindinews) April 7, 2020उत्तर प्रदेश में आइसोलेशन वार्ड में 438 लोगों को और क्वारंटाइन में 4000 लोगों को रखा गया है। निगरानी में रखे गए लोगों की संख्या 61,500 से अधिक है। 25 लोग ठीक भी हो चुके हैं: उत्तर प्रदेश CM योगी आदित्यनाथ pic.twitter.com/jTbnO5Vjuq
— ANI_HindiNews (@AHindinews) April 7, 2020
राज्यामध्ये 25 कोरोनाचे रुग्ण बरे झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अडीचशे पेक्षा जास्त विविध धर्माच्या प्रमुखांशी बैठक घेतली. राज्यामध्ये कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये, तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी धर्मप्रमुखांना केले. दिल्लीतीत तबलिगी जमात कार्यक्रमानंतर देशातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे सर्व राज्य सरकारे सतर्क झाली आहेत.
उत्तर प्रदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या 324 झाली असून आज 16 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील 37 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. 168 रुग्ण तबलिगी कार्यक्रमाशी संबंधित आहेत.