ETV Bharat / bharat

Autobiography of Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसवर पुन्हा निशाणा! आपल्या आत्मचरित्रात केले हे गंभीर आरोप

author img

By

Published : Apr 4, 2023, 10:58 PM IST

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गुंडगिरीमुळे पक्ष संपत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. मात्र, त्यामुळे पक्षाचे अस्तित्वच धोक्यात येणार असल्याने पक्ष उघड करू इच्छित नसल्याचेही त्यांनी लिहिले आहे. दरम्यान, त्यांनी यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना खरा राजकारणी नेता असे म्हटले आहे.

Ghulam Nabi Azad
Ghulam Nabi Azad

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी आत्मचरित्राच्या निमित्ताने पुन्हा काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. आझाद म्हणाले की, पक्षात गुंडगिरी शिगेला पोहोचली असून एकता कुठेच दिसत नाही असा थेट आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी लिहलेल्या आत्मचरित्राचे बुधवारी प्रकाशन होणार आहे. त्याचे काही भाग प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

संसदेत त्यांच्या जागेवर बसवून ठेवण्यात आले : कलम ३७० चा उल्लेख करून आझाद यांनी जयराम रमेश यांच्यावर जोरदार हल्ला केल्याचे समोर आले आहे. आझाद यांनी लिहिले की, जेव्हा भाजप सरकारने हे कलम हटवण्याची घोषणा केली होती, तेव्हा आम्हा सर्व नेत्यांनी विरोध केला होता. आम्ही संसदेत विरोध केला. आम्ही धरणे धरत बसलो होतो. मात्र, जयराम रमेश या धरणे आंदोलनात सहभागी झाले नाहीत आणि आज तीच व्यक्ती पक्षाचे सरचिटणीस तर आहेच, पण आयटीचेही प्रभारी आहेत. तसेच, आझाद यांनी लिहिले आहे की, जयरामेश यांना संसदेत त्यांच्या जागेवर बसवून ठेवण्यात आले होते.

पक्षाच्या कामकाजावर प्रश्न : सलमान खुर्शीद यांच्याबाबत आझाद यांनी लिहिले आहे की, त्यांनी जी-23 नेत्यांमधील माझ्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. आझाद यांनी पुढे लिहिलं आहे की, आम्ही कधीही पक्षाचा अवाजवी फायदा घेतला नाही, उलट आम्हाला जे काही मिळालं त्यापेक्षा कितीतरी पट जास्त वेळ आम्ही पक्षाला दिला, तर तुमच्यासारख्यांनी उपस्थिती दाखवण्याशिवाय काहीही केलं नाही. खरे तर खुर्शीद म्हणाले होते की, तुम्ही ज्या शिडीवरून चढता, एकदा का तुम्ही वर पोहोचलात की तिला लाथ मारता कामा नये. त्यांची टिप्पणी आझाद यांच्यासाठी होती. G-23 च्या माध्यमातून आझाद सतत पक्षाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत होते.

दुर्दैवाने पक्षातील कोणीही कटू सत्य ऐकायला तयार नाही : आझाद यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला. त्यांनी आपला नवा पक्ष स्थापन केला आहे. आझाद यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, काँग्रेसच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणजे सक्षम नेत्यांच्या समांतर इतर नेत्यांना उभे करून सक्षम लोकांना संपवणे हे आहे. ते लिहितात की, काँग्रेस राज्यांमध्ये नालायक नेत्यांना उभे करते आणि त्यांच्या माध्यमातून जननेते उद्ध्वस्त करते, पण दुर्दैवाने पक्षातील कोणीही कटू सत्य ऐकायला तयार नाही.

त्यांच्याकडूनही काही चुका झाल्या : आझाद यांनी लिहिलेली सर्वात आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे ते कॉंग्रेसला पूर्णपणे उघड करू इच्छित नाहीत, जेणेकरून पक्ष अडचणीत येऊ शकेल. त्यांच्याकडे अजूनही अनेक गुपिते असल्याचा अर्थ लावला जात आहे. आझाद यांनी लिहिले की, मी काँग्रेस विचारसरणीचा माणूस आहे, माझा त्यावर कोणताही आक्षेप नाही. त्याच वेळी, मी नेहरू आणि इतर नेत्यांची प्रशंसा करतो आणि टीका करतो, कारण त्यांच्याकडूनही काही चुका झाल्या आहेत.

राजकारण्यासारखे वागले : त्याचवेळी यामध्ये आझाद म्हणाले की, जी23 भाजपच्या जवळ आहे असे कोणी म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत. ते म्हणाले की, मी वेगळा पक्ष काढला आहे, पण जे नेते आहेत त्यांचे काय चालले आहे. आझाद यांनी पंतप्रधान मोदींना राजकारणी म्हटले आहे. आझाद म्हणाले की, मी उघडपणे मोदींना विरोध केला, पण तरीही ते राजकारण्यासारखे वागले. ते नेते आहेत.

हेही वाचा : कर्नाटक विधानसभा निवडणूक वार्ता, अजूनही येडियुरप्पा, कुमारस्वामी अन् सिद्धरामय्या यांचाच आहे प्रभाव

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी आत्मचरित्राच्या निमित्ताने पुन्हा काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. आझाद म्हणाले की, पक्षात गुंडगिरी शिगेला पोहोचली असून एकता कुठेच दिसत नाही असा थेट आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी लिहलेल्या आत्मचरित्राचे बुधवारी प्रकाशन होणार आहे. त्याचे काही भाग प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

संसदेत त्यांच्या जागेवर बसवून ठेवण्यात आले : कलम ३७० चा उल्लेख करून आझाद यांनी जयराम रमेश यांच्यावर जोरदार हल्ला केल्याचे समोर आले आहे. आझाद यांनी लिहिले की, जेव्हा भाजप सरकारने हे कलम हटवण्याची घोषणा केली होती, तेव्हा आम्हा सर्व नेत्यांनी विरोध केला होता. आम्ही संसदेत विरोध केला. आम्ही धरणे धरत बसलो होतो. मात्र, जयराम रमेश या धरणे आंदोलनात सहभागी झाले नाहीत आणि आज तीच व्यक्ती पक्षाचे सरचिटणीस तर आहेच, पण आयटीचेही प्रभारी आहेत. तसेच, आझाद यांनी लिहिले आहे की, जयरामेश यांना संसदेत त्यांच्या जागेवर बसवून ठेवण्यात आले होते.

पक्षाच्या कामकाजावर प्रश्न : सलमान खुर्शीद यांच्याबाबत आझाद यांनी लिहिले आहे की, त्यांनी जी-23 नेत्यांमधील माझ्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. आझाद यांनी पुढे लिहिलं आहे की, आम्ही कधीही पक्षाचा अवाजवी फायदा घेतला नाही, उलट आम्हाला जे काही मिळालं त्यापेक्षा कितीतरी पट जास्त वेळ आम्ही पक्षाला दिला, तर तुमच्यासारख्यांनी उपस्थिती दाखवण्याशिवाय काहीही केलं नाही. खरे तर खुर्शीद म्हणाले होते की, तुम्ही ज्या शिडीवरून चढता, एकदा का तुम्ही वर पोहोचलात की तिला लाथ मारता कामा नये. त्यांची टिप्पणी आझाद यांच्यासाठी होती. G-23 च्या माध्यमातून आझाद सतत पक्षाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत होते.

दुर्दैवाने पक्षातील कोणीही कटू सत्य ऐकायला तयार नाही : आझाद यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला. त्यांनी आपला नवा पक्ष स्थापन केला आहे. आझाद यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, काँग्रेसच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणजे सक्षम नेत्यांच्या समांतर इतर नेत्यांना उभे करून सक्षम लोकांना संपवणे हे आहे. ते लिहितात की, काँग्रेस राज्यांमध्ये नालायक नेत्यांना उभे करते आणि त्यांच्या माध्यमातून जननेते उद्ध्वस्त करते, पण दुर्दैवाने पक्षातील कोणीही कटू सत्य ऐकायला तयार नाही.

त्यांच्याकडूनही काही चुका झाल्या : आझाद यांनी लिहिलेली सर्वात आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे ते कॉंग्रेसला पूर्णपणे उघड करू इच्छित नाहीत, जेणेकरून पक्ष अडचणीत येऊ शकेल. त्यांच्याकडे अजूनही अनेक गुपिते असल्याचा अर्थ लावला जात आहे. आझाद यांनी लिहिले की, मी काँग्रेस विचारसरणीचा माणूस आहे, माझा त्यावर कोणताही आक्षेप नाही. त्याच वेळी, मी नेहरू आणि इतर नेत्यांची प्रशंसा करतो आणि टीका करतो, कारण त्यांच्याकडूनही काही चुका झाल्या आहेत.

राजकारण्यासारखे वागले : त्याचवेळी यामध्ये आझाद म्हणाले की, जी23 भाजपच्या जवळ आहे असे कोणी म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत. ते म्हणाले की, मी वेगळा पक्ष काढला आहे, पण जे नेते आहेत त्यांचे काय चालले आहे. आझाद यांनी पंतप्रधान मोदींना राजकारणी म्हटले आहे. आझाद म्हणाले की, मी उघडपणे मोदींना विरोध केला, पण तरीही ते राजकारण्यासारखे वागले. ते नेते आहेत.

हेही वाचा : कर्नाटक विधानसभा निवडणूक वार्ता, अजूनही येडियुरप्पा, कुमारस्वामी अन् सिद्धरामय्या यांचाच आहे प्रभाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.