ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : राणी चेन्नम्मा आणि अब्बाक्कांची महान शौर्यगाथा!

स्वातंत्र्यपूर्व कालखंडात केवळ पुरुषच नव्हे तर देशातील शूर महिलांनीही परकीय शक्तींविरोधात मोठा लढा दिला. भारतीय भूमीवर युरोपीय शक्तींच्या राजकीय आकांक्षांना मोठा धक्का या शूरवीर महिलांनी दिला. स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना आपण दोन शूर राण्यांचे स्मरण करूया ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत वसाहती शासकांशी लढा दिला.

author img

By

Published : Nov 13, 2021, 6:03 AM IST

स्वातंत्र्याची 75 वर्षे : राणी चेन्नम्मा आणि अब्बाक्कांची महान शौर्यगाथा!
स्वातंत्र्याची 75 वर्षे : राणी चेन्नम्मा आणि अब्बाक्कांची महान शौर्यगाथा!

बेळगाव : स्वातंत्र्यपूर्व कालखंडात केवळ पुरुषच नव्हे तर देशातील शूर महिलांनीही परकीय शक्तींविरोधात मोठा लढा दिला. भारतीय भूमीवर युरोपीय शक्तींच्या राजकीय आकांक्षांना मोठा धक्का या शूरवीर महिलांनी दिला. स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना आपण दोन शूर राण्यांचे स्मरण करूया ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत वसाहती शासकांशी लढा दिला.

स्वातंत्र्याची 75 वर्षे : राणी चेन्नम्मा आणि अब्बाक्कांची महान शौर्यगाथा!

ब्रिटिशविरोधील लढ्याची प्रेरणा राणी चेन्नम्मा

उत्तर कर्नाटकात, कित्तूरच्या राणी चेन्नम्मांच्या लढ्यामुळे ब्रिटिशांविरोधात लढण्यास नागरिकांना प्रेरणा मिळाली. दरवर्षी 23 ऑक्टोबर रोजी बेळगाव आणि आजूबाजूच्या प्रदेशातील लोक ब्रिटिशांवरील चेन्नम्मांच्या विजयाचा उत्सव साजरा करतात. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे पोलिटिकल एजंट आणि धारवाडचे कलेक्टर जॉन ठाकरे हा चेन्नम्मांच्या संस्थानवर चालुन आला होता. त्याने कित्तूर किल्ल्याचा खजिना जप्त करण्याचा प्रयत्न केला. राणीचा लेफ्टनंट अमातूर बाळाप्पा याने त्याला मारले. संगोली रायण्णा आणि बाळाप्पा या सेनापतींसोबत राणीने कंपनीच्या सैन्याचा नाश केला.

चेन्नम्मांनी हाती घेतला राज्य कारभार

कित्तूरच्या राणी चेन्नम्मांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील काकती येथे १७७८ मध्ये झाला. १५ व्या वर्षी कित्तूरचा राजा मल्लसरजा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तेव्हा चेन्नम्मा धनुर्विद्या, घोडेस्वारी आणि तलवारबाजी यात पारंगत होत्या. १८१६ मध्ये राजा मल्लसर्जाचा मृत्यू झाला आणि पहिली राणी रुद्रम्माचा मुलगा गादीवर बसला. पण 1824 मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि राज्याचा वारस नसताना, चेन्नम्माने राज्यकारभार हाती घेतला. तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कित्तूरचे राज्य गिळंकृत करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला.

राणीचे ब्रिटिशांविरोधात बंड

1848 - 58 च्या दरम्यान औपचारिकपणे स्थापना केली असली तरी, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने 1824 मध्ये जेव्हा शिवलिंगप्पाला तिचा वारस म्हणून दत्तक घेतले तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कित्तूरवर लॅप्सचा सिद्धांत लागू केला. पोलिटिकल एजंट जॉन ठाकरेने वारसाला मान्यता दिली नाही आणि तिला कंपनीला प्रदेश देण्यास भाग पाडले. यावेळी राणीने बॉम्बे प्रेसिडेन्सीकडे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा राणीची विनंती नाकारली गेली तेव्हा राणीने ब्रिटिशांविरुद्ध बंड केले.

दुसऱ्या युद्धात चेन्नम्माला पकडले

पहिल्या युद्धात राणी यशस्वी झाली असली तरी दुसऱ्या युद्धात चेन्नम्माला पकडण्यात आले. उपजिल्हाधिकारी मुनरो, थॉमस मुनरो यांचा पुतण्या मद्रासचा गव्हर्नर जनरल कित्तूर सैन्याने मारला. चेन्नम्मा यांना बायलहोंगळ किल्ल्यात कैद करण्यात आले जेथे 1829 मध्ये तिचा मृत्यू झाला. राणीचा सेनापती संगोली रायण्णाने आपल्या गुरिल्ला युक्तीने इंग्रजांशी लढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच वर्षी राणीचा मृत्यू झाला. कित्तूर चेन्नम्माचा वारसा आजपर्यंत जिवंत आहे, कर्नाटक सरकार दरवर्षी 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान तिचा विजयोत्सव साजरा करते.

उल्लालची राणी अब्बाक्कांची शौर्यगाथा

ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या चेन्नम्मांच्या आधी तीनशे वर्षांपूर्वी कर्नाटकातील किनारपट्टीच्या राज्यातील एक स्त्री पोर्तुगीजांसाठी एक भयानक स्वप्न ठरली होती. वसाहतवादाविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या त्या पहिल्या राणी होत्या. जोपर्यंत त्या जिवंत होत्या तोपर्यंत पोर्तुगीजांना त्यांची भीती वाटत होती. त्यांचे नाव होते अब्बाक्का महादेवी. तुलुनाडूमधील मंगळुरूजवळ उल्लालच्या एका छोट्याशा राज्यावर त्यांनी राज्य केले. अब्बाक्कांचा 1525 मध्ये उल्लालची राणी म्हणून राज्याभिषेक करण्यात आला होता.

राणीचा पोर्तुगीजांविरोधात लढा

गोवा काबीज केल्यानंतर, पोर्तुगीजांनी त्यांचे लक्ष वेस्टर्न कोस्टकडे वळवले आणि 1525 मध्ये मंगळूरू काबीज केले. मंगळुरूच्या पुढे असलेले उल्लाल बंदर अरबी द्वीपकल्पासह मसाल्यांच्या व्यापारामुळे खूप समृद्ध होते. एका स्त्रीच्या अधिपत्याखालील एक छोटेसे राज्य वसाहतवादी शक्तींसाठी केकवॉकसारखे दिसू लागले. परंतु पोर्तुगीज चुकीचे होते. अब्बाक्का एक हुशार स्त्री होती. जिने जाती आणि धर्मातील सर्व स्थानिक राज्यकर्त्यांशी पटकन युती केली. तिच्या सैन्यात सर्व समुदायातील सैनिकांचा समावेश होता आणि नौदलात स्थानिक मोगवीरा मच्छीमार आणि मुस्लीम बेअरी यांचा समावेश होता. जे नौदल युद्धात चांगले होते. तिने पोर्तुगीजांच्या ताफ्यावर अग्निबाण (अग्नी-बाण) वापरून आक्रमणकर्त्यांच्या नौकानयन जहाजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचेही म्हटले आहे.

खंडणी देण्यास नकार

तिने कालिकतच्या झामोरिनशी युती केली आणि पुढच्या काही वर्षांपासून पोर्तुगीजांना वेठीस धरले. पोर्तुगीजांनी वारंवार मागणी करूनही त्यांना खंडणी देण्यास तिने नकार दिला. तिच्या डावपेचांना कंटाळून पोर्तुगीजांनी १५५५ मध्ये अॅडमिरल डोम अल्वारो दा सिल्वेरा यांच्या नेतृत्वाखाली नौदल पाठवले पण तिने आपला किल्ला राखण्यात यश मिळवले. 1557 मध्ये पोर्तुगीजांनी पुन्हा एकदा मंगळूरूवर आक्रमण केले परंतु अब्बाक्काचा उल्लाल आणखी एक दशक त्यांच्या आवाक्याबाहेर राहिला.

राणीचा प्रतिहल्ला

1568 मध्ये पोर्तुगीज सेनापती जोआओ पिक्सोटोने मोठ्या सैन्यासह उल्लालवर कूच केल्यावर दुसरा हल्ला झाला. त्यांनी उल्लालला पकडण्यात यश मिळवले पण राणी पळून गेली. तिने जवळच असलेल्या मशिदीत आश्रय घेतला आणि त्वरीत आपले सैन्य गोळा केले. ती त्याच रात्री परत आली आणि पोर्तुगीज जनरल पेक्सोटोला ठार मारले. सत्तर पोर्तुगीज सैनिक जिवंत पकडले गेले. तिने त्यांचा अॅडमिरल मास्करेन्हास देखील मारला आणि पोर्तुगीजांचा मंगळुरूमधून पाठलाग केला.

अब्बाक्का पोर्तुगीजांसाठी डोकेदुखी

पुढील वर्षांमध्ये, पोर्तुगीजांनी प्रदेश मिळवण्यात यश मिळवले, परंतु अब्बाक्का ही त्यांची सर्वात मोठी डोकेदुखी बनली. युद्धात तिची बरोबरी करू न शकल्याने, पोर्तुगीजांना तिच्या विभक्त पतीला हाताशी धरले. त्याने 1570 विश्वासघाताने तिला पोर्तुगीजांना पकडवून दिले. तिला तुरुंगात टाकण्यात आले परंतु तिने तुरुंगात बंड केले आणि लढताना तिचा मृत्यू झाला.

अब्बाकांची शौर्यगाथा आजही कायम

किनारपट्टीच्या कर्नाटकसाठी, अब्बाक्का ही एक आख्यायिका आहे आणि तिचे शौर्य यक्षगान या किनारपट्टीच्या कर्नाटकातील लोकप्रिय लोककला द्वारे पिढ्यानपिढ्या पुढे जात आहे. भारतीय तटरक्षक दलाने हिंदुस्तान शिपयार्डमधून तयार केलेल्या त्यांच्या इनशोर पेट्रोल व्हेसल्सचे पहिले नाव राणी अब्बाक्का असे ठेवले आणि राणी अब्बक्का क्लासमध्ये स्वतंत्र देशाच्या किनारपट्टीवर लक्ष ठेवणाऱ्या पाच गस्ती जहाजांचा समावेश आहे.

बेळगाव : स्वातंत्र्यपूर्व कालखंडात केवळ पुरुषच नव्हे तर देशातील शूर महिलांनीही परकीय शक्तींविरोधात मोठा लढा दिला. भारतीय भूमीवर युरोपीय शक्तींच्या राजकीय आकांक्षांना मोठा धक्का या शूरवीर महिलांनी दिला. स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना आपण दोन शूर राण्यांचे स्मरण करूया ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत वसाहती शासकांशी लढा दिला.

स्वातंत्र्याची 75 वर्षे : राणी चेन्नम्मा आणि अब्बाक्कांची महान शौर्यगाथा!

ब्रिटिशविरोधील लढ्याची प्रेरणा राणी चेन्नम्मा

उत्तर कर्नाटकात, कित्तूरच्या राणी चेन्नम्मांच्या लढ्यामुळे ब्रिटिशांविरोधात लढण्यास नागरिकांना प्रेरणा मिळाली. दरवर्षी 23 ऑक्टोबर रोजी बेळगाव आणि आजूबाजूच्या प्रदेशातील लोक ब्रिटिशांवरील चेन्नम्मांच्या विजयाचा उत्सव साजरा करतात. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे पोलिटिकल एजंट आणि धारवाडचे कलेक्टर जॉन ठाकरे हा चेन्नम्मांच्या संस्थानवर चालुन आला होता. त्याने कित्तूर किल्ल्याचा खजिना जप्त करण्याचा प्रयत्न केला. राणीचा लेफ्टनंट अमातूर बाळाप्पा याने त्याला मारले. संगोली रायण्णा आणि बाळाप्पा या सेनापतींसोबत राणीने कंपनीच्या सैन्याचा नाश केला.

चेन्नम्मांनी हाती घेतला राज्य कारभार

कित्तूरच्या राणी चेन्नम्मांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील काकती येथे १७७८ मध्ये झाला. १५ व्या वर्षी कित्तूरचा राजा मल्लसरजा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तेव्हा चेन्नम्मा धनुर्विद्या, घोडेस्वारी आणि तलवारबाजी यात पारंगत होत्या. १८१६ मध्ये राजा मल्लसर्जाचा मृत्यू झाला आणि पहिली राणी रुद्रम्माचा मुलगा गादीवर बसला. पण 1824 मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि राज्याचा वारस नसताना, चेन्नम्माने राज्यकारभार हाती घेतला. तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कित्तूरचे राज्य गिळंकृत करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला.

राणीचे ब्रिटिशांविरोधात बंड

1848 - 58 च्या दरम्यान औपचारिकपणे स्थापना केली असली तरी, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने 1824 मध्ये जेव्हा शिवलिंगप्पाला तिचा वारस म्हणून दत्तक घेतले तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कित्तूरवर लॅप्सचा सिद्धांत लागू केला. पोलिटिकल एजंट जॉन ठाकरेने वारसाला मान्यता दिली नाही आणि तिला कंपनीला प्रदेश देण्यास भाग पाडले. यावेळी राणीने बॉम्बे प्रेसिडेन्सीकडे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा राणीची विनंती नाकारली गेली तेव्हा राणीने ब्रिटिशांविरुद्ध बंड केले.

दुसऱ्या युद्धात चेन्नम्माला पकडले

पहिल्या युद्धात राणी यशस्वी झाली असली तरी दुसऱ्या युद्धात चेन्नम्माला पकडण्यात आले. उपजिल्हाधिकारी मुनरो, थॉमस मुनरो यांचा पुतण्या मद्रासचा गव्हर्नर जनरल कित्तूर सैन्याने मारला. चेन्नम्मा यांना बायलहोंगळ किल्ल्यात कैद करण्यात आले जेथे 1829 मध्ये तिचा मृत्यू झाला. राणीचा सेनापती संगोली रायण्णाने आपल्या गुरिल्ला युक्तीने इंग्रजांशी लढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच वर्षी राणीचा मृत्यू झाला. कित्तूर चेन्नम्माचा वारसा आजपर्यंत जिवंत आहे, कर्नाटक सरकार दरवर्षी 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान तिचा विजयोत्सव साजरा करते.

उल्लालची राणी अब्बाक्कांची शौर्यगाथा

ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या चेन्नम्मांच्या आधी तीनशे वर्षांपूर्वी कर्नाटकातील किनारपट्टीच्या राज्यातील एक स्त्री पोर्तुगीजांसाठी एक भयानक स्वप्न ठरली होती. वसाहतवादाविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या त्या पहिल्या राणी होत्या. जोपर्यंत त्या जिवंत होत्या तोपर्यंत पोर्तुगीजांना त्यांची भीती वाटत होती. त्यांचे नाव होते अब्बाक्का महादेवी. तुलुनाडूमधील मंगळुरूजवळ उल्लालच्या एका छोट्याशा राज्यावर त्यांनी राज्य केले. अब्बाक्कांचा 1525 मध्ये उल्लालची राणी म्हणून राज्याभिषेक करण्यात आला होता.

राणीचा पोर्तुगीजांविरोधात लढा

गोवा काबीज केल्यानंतर, पोर्तुगीजांनी त्यांचे लक्ष वेस्टर्न कोस्टकडे वळवले आणि 1525 मध्ये मंगळूरू काबीज केले. मंगळुरूच्या पुढे असलेले उल्लाल बंदर अरबी द्वीपकल्पासह मसाल्यांच्या व्यापारामुळे खूप समृद्ध होते. एका स्त्रीच्या अधिपत्याखालील एक छोटेसे राज्य वसाहतवादी शक्तींसाठी केकवॉकसारखे दिसू लागले. परंतु पोर्तुगीज चुकीचे होते. अब्बाक्का एक हुशार स्त्री होती. जिने जाती आणि धर्मातील सर्व स्थानिक राज्यकर्त्यांशी पटकन युती केली. तिच्या सैन्यात सर्व समुदायातील सैनिकांचा समावेश होता आणि नौदलात स्थानिक मोगवीरा मच्छीमार आणि मुस्लीम बेअरी यांचा समावेश होता. जे नौदल युद्धात चांगले होते. तिने पोर्तुगीजांच्या ताफ्यावर अग्निबाण (अग्नी-बाण) वापरून आक्रमणकर्त्यांच्या नौकानयन जहाजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचेही म्हटले आहे.

खंडणी देण्यास नकार

तिने कालिकतच्या झामोरिनशी युती केली आणि पुढच्या काही वर्षांपासून पोर्तुगीजांना वेठीस धरले. पोर्तुगीजांनी वारंवार मागणी करूनही त्यांना खंडणी देण्यास तिने नकार दिला. तिच्या डावपेचांना कंटाळून पोर्तुगीजांनी १५५५ मध्ये अॅडमिरल डोम अल्वारो दा सिल्वेरा यांच्या नेतृत्वाखाली नौदल पाठवले पण तिने आपला किल्ला राखण्यात यश मिळवले. 1557 मध्ये पोर्तुगीजांनी पुन्हा एकदा मंगळूरूवर आक्रमण केले परंतु अब्बाक्काचा उल्लाल आणखी एक दशक त्यांच्या आवाक्याबाहेर राहिला.

राणीचा प्रतिहल्ला

1568 मध्ये पोर्तुगीज सेनापती जोआओ पिक्सोटोने मोठ्या सैन्यासह उल्लालवर कूच केल्यावर दुसरा हल्ला झाला. त्यांनी उल्लालला पकडण्यात यश मिळवले पण राणी पळून गेली. तिने जवळच असलेल्या मशिदीत आश्रय घेतला आणि त्वरीत आपले सैन्य गोळा केले. ती त्याच रात्री परत आली आणि पोर्तुगीज जनरल पेक्सोटोला ठार मारले. सत्तर पोर्तुगीज सैनिक जिवंत पकडले गेले. तिने त्यांचा अॅडमिरल मास्करेन्हास देखील मारला आणि पोर्तुगीजांचा मंगळुरूमधून पाठलाग केला.

अब्बाक्का पोर्तुगीजांसाठी डोकेदुखी

पुढील वर्षांमध्ये, पोर्तुगीजांनी प्रदेश मिळवण्यात यश मिळवले, परंतु अब्बाक्का ही त्यांची सर्वात मोठी डोकेदुखी बनली. युद्धात तिची बरोबरी करू न शकल्याने, पोर्तुगीजांना तिच्या विभक्त पतीला हाताशी धरले. त्याने 1570 विश्वासघाताने तिला पोर्तुगीजांना पकडवून दिले. तिला तुरुंगात टाकण्यात आले परंतु तिने तुरुंगात बंड केले आणि लढताना तिचा मृत्यू झाला.

अब्बाकांची शौर्यगाथा आजही कायम

किनारपट्टीच्या कर्नाटकसाठी, अब्बाक्का ही एक आख्यायिका आहे आणि तिचे शौर्य यक्षगान या किनारपट्टीच्या कर्नाटकातील लोकप्रिय लोककला द्वारे पिढ्यानपिढ्या पुढे जात आहे. भारतीय तटरक्षक दलाने हिंदुस्तान शिपयार्डमधून तयार केलेल्या त्यांच्या इनशोर पेट्रोल व्हेसल्सचे पहिले नाव राणी अब्बाक्का असे ठेवले आणि राणी अब्बक्का क्लासमध्ये स्वतंत्र देशाच्या किनारपट्टीवर लक्ष ठेवणाऱ्या पाच गस्ती जहाजांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.