ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : वाचा, राजस्थानातील बारहठ कुटुंबाचा त्याग, तपश्चर्या आणि बलिदानाची गाथा

author img

By

Published : Oct 23, 2021, 6:07 AM IST

कवी केसरी सिंह बारहठ आणि त्यांच्या कुटुंबाचे बलिदान राजस्थानच्या प्रत्येक हृदयात अजूनही स्मरणात आहे. पण ते राजस्थानच्या बाहेर ज्ञात नाहीत. त्यापैकी एक केसरी सिंह बारहाठचा मुलगा प्रतापसिंह बारहाठ वयाच्या 25 व्या वर्षी शहीद झाला. भगतसिंग, सुखदेव आणि शिवराम राजगुरू यासारख्या प्रसिद्ध क्रांतिकारकांमध्ये प्रतापसिंह यांचा समावेश होतो. 1931 मध्ये भगतसिंग आणि त्याच्या मित्रांना फाशी देण्यात आली, तर 1912 मध्ये लॉर्ड हार्डिंगच्या मिरवणुकीत बॉम्ब फेकल्यामुळे प्रताप सिंह 1918 मध्ये तुरुंगात मरण पावला.

बारहठ कुटुंब
बारहठ कुटुंब

जयपूर (राजस्थान) - भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना, ईटीव्ही भारत देशभरातून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या कथा एकत्र आणत आहे. या आठवड्यात ती राजस्थानमधील बारहाठ कुटुंबाबद्दल कथा आहे. ज्यांनी ब्रिटिश वसाहतवादी शक्तींना भारत सोडून जाण्यासाठी क्रांतीचा मार्ग स्वीकारला. ही एक पिता, मुलगा आणि भावाची कथा आहे. ज्यांनी लोकगीतांद्वारे क्रांतीची बीजे पेरली आणि राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये ब्रिटिश विरोधी कारवाई केली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण कुटुंबाने आपले जीवन समर्पित केले.

राजस्थानातील बारहठ कुटुंबाचा त्याग, तपश्चर्या आणि बलिदानाची गाथा

कवी केसरी सिंह बारहठ आणि त्यांच्या कुटुंबाचे बलिदान राजस्थानच्या प्रत्येक हृदयात अजूनही स्मरणात आहे. पण ते राजस्थानच्या बाहेर ज्ञात नाहीत. त्यापैकी एक केसरी सिंह बारहठचा मुलगा प्रतापसिंह बारहठ वयाच्या 25 व्या वर्षी शहीद झाला. भगतसिंग, सुखदेव आणि शिवराम राजगुरू यासारख्या प्रसिद्ध क्रांतिकारकांमध्ये प्रतापसिंह यांचा समावेश होतो. 1931 मध्ये भगतसिंग आणि त्याच्या मित्रांना फाशी देण्यात आली, तर 1912 मध्ये लॉर्ड हार्डिंगच्या मिरवणुकीत बॉम्ब फेकल्यामुळे प्रताप सिंह 1918 मध्ये तुरुंगात मरण पावला. ही घटना भारतीय इतिहासाच्या पानांमध्ये दिल्ली षड्यंत्र प्रकरण म्हणून अधोरेखित करण्यात आली. या घटनांमुळेच ब्रिटिशांना भारत सोडण्याचे दडपण वाटले.

कोण होते केसरी सिंह बारहठ?

21 नोव्हेंबर 1872 रोजी जन्मलेले केसरी सिंह बारहठ शक्ती, भक्ती आणि त्यागाची अमर भूमी शाहपुरा येथील श्रीमंत बारहठ कुटुंबातील कवी आणि विद्वान होते. ते राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात वसलेल्या शाहपुरा भागातील देव खेडाचे जहागीरदार होते. शहीद प्रताप सिंह बारहठ संस्थानचे सचिव कैलाश सिंह जडावत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना रासबिहारी बोसचा हवाला देत सांगितले, की केसरी सिंह बारहठ यांच्यासारखे देशात क्वचितच कुटुंब असेल ज्याने क्रांतीचा मार्ग स्वीकारण्यासाठी मुलाला प्रोत्साहन दिले असेल. फक्त त्यांचा मुलगा प्रताप सिंहच नाही, तर भाऊ जोरावर सिंग यांनीही या क्रांतीच्या लढ्यात योगदान देत देशासाठी बलिदान दिले. केसरी सिंह यांनी राग सोरथमध्ये रचलेल्या त्यांच्या 'चेतवानी रा चुंगठ्या' या प्रसिद्ध ऐतिहासिक कृतीने ब्रिटीश वसाहतवादी सैन्याला आश्चर्यचकित केले. ही क्रांतीची घोषणा होती आणि अनेक तरुण त्यांच्या गीतांनी प्रभावित झाले. केसरी सिंह स्वाभाविकपणे ब्रिटीशांच्या हिटलिस्टमध्ये आले. त्यांनी राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्याबद्दल मोठे लिखाण केल्यामुळे ते नेहमीच त्यांच्या रडारखाली होते. नंतर केसरी सिंहला अटक करण्यात आली. त्यांच्यावर महंत प्यारे लाल यांच्या हत्येचा आरोप लावला गेला. बिहारच्या हजारीबागमध्ये 20 वर्षांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले. 14 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचे निधन झाले.

महात्मा गांधींना दिला होता पाठिंबा

स्वातंत्र्य चळवळीची रणनीती आखण्यासाठी केसरी सिंह यांचा हवेलीत अनेकदा गुप्त सल्लामसलत होत असे. स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारी विचार आणि रणनीती असूनही त्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीला पूर्ण पाठिंबा दिला. गांधींनीही त्यांना सत्याग्रहात सहभागी करुन घेतले. ज्येष्ठ पत्रकार मूलचंद पेसवानी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले, दांडी यात्रेत संपूर्ण कुटुंब सामील होते. महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडे मेवाडा राज्याची जबाबदारी होती. विशेष म्हणजे, मेवाडचे राजा महाराणा जेव्हा ब्रिटीश शासकाच्या हाकेवर दिल्लीला जात होते, तेव्हा केसरी सिंह यांनी त्यांना एक चेतावणी पत्र दिले होते. त्यांचे पत्र वाचल्यानंतर मेवाडचे महाराणा ब्रिटिश शासकांशी कोणतीही भेट न घेता परत आले.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : स्वातंत्र्य मिळवून देणारे 'साबरमतीचे संत' महात्मा गांधी!

महान क्रांतीकारक म्हणून निधन

ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्त्याहून नवी दिल्लीत स्थलांतरित करण्याच्या निमित्ताने ३ डिसेंबर १९१२ रोजी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग यांच्यावर बॉम्ब हल्ल्याचा कट रचणाऱ्या गटात प्रताप सिंग सामील झाले. त्यांचे काका जोरावरसिंह बारहठही त्या गटात होते. प्रताप सिंह यांना अटक करण्यात आली आणि बरेली मध्यवर्ती कारागृहात त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. शिवाय त्यांना त्यांच्या इतर सहकार्यांचे नावे उघड करण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नोकरीची ऑफर देण्यात आली होती. परंतु प्रताप सिंह बारहठ यांनी ब्रिटीश शासकांना कोणतीही माहिती दिली नाही. जेव्हा सर्व प्रयत्न अयशस्वी झाले, तेव्हा ब्रिटिश अधिकारी चार्ल्सने प्रतापसिंह यांना सांगितले, की तुझी आई तुझ्यासाठी रडत आहे. तेव्हा प्रताप सिंह यांनी उत्तर दिले. माझ्या आईचे रडणे थांबवण्यासाठी मी हजारो मातांना रडू देऊ शकत नाही. 18 मे 1918 रोजी या धाडसी तरुणाचा तुरुंगात मृत्यू झाला. त्यांच्या हुतात्म्याने इंग्रज इतके घाबरले की प्रतापसिंह बारहठ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांचे पार्थिव तुरुंगातच पुरण्यात आले. दरम्यान, जोरावर सिंह यांनी स्वातंत्र्याचा संदेश देण्यासाठी 27 वर्षे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भूमिगत होते. 17 ऑक्टोबर 1939 रोजी त्यांचे निधन झाले.

पुढच्या पिढीलाही सार्थ अभिमान

ईटीव्हीने केसरी सिंह बारहठ यांची नात सरला कंवर यांचीही भेट घेतली, ती म्हणाली, बारहठ कुटुंबातील सदस्य असल्याचा तिला अभिमान वाटतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझ्या पूर्वजांच्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटतो, असे त्या म्हणाल्या. आजही, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात आपला ठसा उमटवणाऱ्या क्रांतिकारी कुटुंबाची वीर गाथा राजस्थानच्या लोकांवर प्रभाव करते.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : हिसारचे विस्मरणातील 'स्वातंत्र्य युद्ध', वाचा सविस्तर...

जयपूर (राजस्थान) - भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना, ईटीव्ही भारत देशभरातून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या कथा एकत्र आणत आहे. या आठवड्यात ती राजस्थानमधील बारहाठ कुटुंबाबद्दल कथा आहे. ज्यांनी ब्रिटिश वसाहतवादी शक्तींना भारत सोडून जाण्यासाठी क्रांतीचा मार्ग स्वीकारला. ही एक पिता, मुलगा आणि भावाची कथा आहे. ज्यांनी लोकगीतांद्वारे क्रांतीची बीजे पेरली आणि राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये ब्रिटिश विरोधी कारवाई केली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण कुटुंबाने आपले जीवन समर्पित केले.

राजस्थानातील बारहठ कुटुंबाचा त्याग, तपश्चर्या आणि बलिदानाची गाथा

कवी केसरी सिंह बारहठ आणि त्यांच्या कुटुंबाचे बलिदान राजस्थानच्या प्रत्येक हृदयात अजूनही स्मरणात आहे. पण ते राजस्थानच्या बाहेर ज्ञात नाहीत. त्यापैकी एक केसरी सिंह बारहठचा मुलगा प्रतापसिंह बारहठ वयाच्या 25 व्या वर्षी शहीद झाला. भगतसिंग, सुखदेव आणि शिवराम राजगुरू यासारख्या प्रसिद्ध क्रांतिकारकांमध्ये प्रतापसिंह यांचा समावेश होतो. 1931 मध्ये भगतसिंग आणि त्याच्या मित्रांना फाशी देण्यात आली, तर 1912 मध्ये लॉर्ड हार्डिंगच्या मिरवणुकीत बॉम्ब फेकल्यामुळे प्रताप सिंह 1918 मध्ये तुरुंगात मरण पावला. ही घटना भारतीय इतिहासाच्या पानांमध्ये दिल्ली षड्यंत्र प्रकरण म्हणून अधोरेखित करण्यात आली. या घटनांमुळेच ब्रिटिशांना भारत सोडण्याचे दडपण वाटले.

कोण होते केसरी सिंह बारहठ?

21 नोव्हेंबर 1872 रोजी जन्मलेले केसरी सिंह बारहठ शक्ती, भक्ती आणि त्यागाची अमर भूमी शाहपुरा येथील श्रीमंत बारहठ कुटुंबातील कवी आणि विद्वान होते. ते राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात वसलेल्या शाहपुरा भागातील देव खेडाचे जहागीरदार होते. शहीद प्रताप सिंह बारहठ संस्थानचे सचिव कैलाश सिंह जडावत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना रासबिहारी बोसचा हवाला देत सांगितले, की केसरी सिंह बारहठ यांच्यासारखे देशात क्वचितच कुटुंब असेल ज्याने क्रांतीचा मार्ग स्वीकारण्यासाठी मुलाला प्रोत्साहन दिले असेल. फक्त त्यांचा मुलगा प्रताप सिंहच नाही, तर भाऊ जोरावर सिंग यांनीही या क्रांतीच्या लढ्यात योगदान देत देशासाठी बलिदान दिले. केसरी सिंह यांनी राग सोरथमध्ये रचलेल्या त्यांच्या 'चेतवानी रा चुंगठ्या' या प्रसिद्ध ऐतिहासिक कृतीने ब्रिटीश वसाहतवादी सैन्याला आश्चर्यचकित केले. ही क्रांतीची घोषणा होती आणि अनेक तरुण त्यांच्या गीतांनी प्रभावित झाले. केसरी सिंह स्वाभाविकपणे ब्रिटीशांच्या हिटलिस्टमध्ये आले. त्यांनी राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्याबद्दल मोठे लिखाण केल्यामुळे ते नेहमीच त्यांच्या रडारखाली होते. नंतर केसरी सिंहला अटक करण्यात आली. त्यांच्यावर महंत प्यारे लाल यांच्या हत्येचा आरोप लावला गेला. बिहारच्या हजारीबागमध्ये 20 वर्षांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले. 14 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचे निधन झाले.

महात्मा गांधींना दिला होता पाठिंबा

स्वातंत्र्य चळवळीची रणनीती आखण्यासाठी केसरी सिंह यांचा हवेलीत अनेकदा गुप्त सल्लामसलत होत असे. स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारी विचार आणि रणनीती असूनही त्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीला पूर्ण पाठिंबा दिला. गांधींनीही त्यांना सत्याग्रहात सहभागी करुन घेतले. ज्येष्ठ पत्रकार मूलचंद पेसवानी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले, दांडी यात्रेत संपूर्ण कुटुंब सामील होते. महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडे मेवाडा राज्याची जबाबदारी होती. विशेष म्हणजे, मेवाडचे राजा महाराणा जेव्हा ब्रिटीश शासकाच्या हाकेवर दिल्लीला जात होते, तेव्हा केसरी सिंह यांनी त्यांना एक चेतावणी पत्र दिले होते. त्यांचे पत्र वाचल्यानंतर मेवाडचे महाराणा ब्रिटिश शासकांशी कोणतीही भेट न घेता परत आले.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : स्वातंत्र्य मिळवून देणारे 'साबरमतीचे संत' महात्मा गांधी!

महान क्रांतीकारक म्हणून निधन

ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्त्याहून नवी दिल्लीत स्थलांतरित करण्याच्या निमित्ताने ३ डिसेंबर १९१२ रोजी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग यांच्यावर बॉम्ब हल्ल्याचा कट रचणाऱ्या गटात प्रताप सिंग सामील झाले. त्यांचे काका जोरावरसिंह बारहठही त्या गटात होते. प्रताप सिंह यांना अटक करण्यात आली आणि बरेली मध्यवर्ती कारागृहात त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. शिवाय त्यांना त्यांच्या इतर सहकार्यांचे नावे उघड करण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नोकरीची ऑफर देण्यात आली होती. परंतु प्रताप सिंह बारहठ यांनी ब्रिटीश शासकांना कोणतीही माहिती दिली नाही. जेव्हा सर्व प्रयत्न अयशस्वी झाले, तेव्हा ब्रिटिश अधिकारी चार्ल्सने प्रतापसिंह यांना सांगितले, की तुझी आई तुझ्यासाठी रडत आहे. तेव्हा प्रताप सिंह यांनी उत्तर दिले. माझ्या आईचे रडणे थांबवण्यासाठी मी हजारो मातांना रडू देऊ शकत नाही. 18 मे 1918 रोजी या धाडसी तरुणाचा तुरुंगात मृत्यू झाला. त्यांच्या हुतात्म्याने इंग्रज इतके घाबरले की प्रतापसिंह बारहठ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांचे पार्थिव तुरुंगातच पुरण्यात आले. दरम्यान, जोरावर सिंह यांनी स्वातंत्र्याचा संदेश देण्यासाठी 27 वर्षे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भूमिगत होते. 17 ऑक्टोबर 1939 रोजी त्यांचे निधन झाले.

पुढच्या पिढीलाही सार्थ अभिमान

ईटीव्हीने केसरी सिंह बारहठ यांची नात सरला कंवर यांचीही भेट घेतली, ती म्हणाली, बारहठ कुटुंबातील सदस्य असल्याचा तिला अभिमान वाटतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझ्या पूर्वजांच्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटतो, असे त्या म्हणाल्या. आजही, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात आपला ठसा उमटवणाऱ्या क्रांतिकारी कुटुंबाची वीर गाथा राजस्थानच्या लोकांवर प्रभाव करते.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : हिसारचे विस्मरणातील 'स्वातंत्र्य युद्ध', वाचा सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.