ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर : सुरक्षा दलाकडून गेल्या 72 तासांत 12 दहशतवाद्यांना कंठस्नान

author img

By

Published : Apr 11, 2021, 9:40 PM IST

Updated : Apr 11, 2021, 10:56 PM IST

लष्कराकडून गेल्या 72 तासांत 12 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी ही माहिती दिली.

दिलबाग सिंग
दिलबाग सिंग

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने गेल्या 72 तासांत चार चकमकी दरम्यान 12 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, 2021 मध्ये आतापर्यंत तब्बल 40 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे.

लष्कराकडून ठार करण्यात आलेले अतिरेकी अल बद्र, लश्कर-ए-तौयबा (एलईटी) आणि अंसार गजवतुल हिंद (एजीयूएच) या संघटनांचे होते. एजीयूएचचे 7 दहशतवादी, 3 अल बद्र आणि 2 लष्कर दहशतवादी असून त्यात संघटनेच्या प्रमुखांचा समावेश होता, असे डीजीपींनी पत्रकारांना सांगितले. अंसार गजवतुल हिंदमधील 7 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यामुळे संघटना पूर्णपणे पुसली गेल्याची माहिती त्यांनी दिली.

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. अल बद्र या संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले. ओबैद फारुख, फैजल गुलजार आणि आसिफ बशीर अशी या तीन दहशतवाद्यांची नावं आहेत. या तिघांपैकी एक अगदीच नवीन दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याला सुरक्षा दलांकडून शरण येण्याचे आवाहन केले जात होते, मात्र इतर दोघांनी त्याला तसे करु दिले नाही. त्यानंतर चकमकीमध्ये हे तिघे मारले गेले.

छत्तीसगडमध्ये एका लाखाचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार -

छत्तीसगडमधील दंतेवाडात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत एका लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला. वेट्टी हूंगा असे नक्षलवाद्याचे नाव आहे. त्याच्यावर एका लाखाचे बक्षीस होते. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून 2 किलो आयईडी जप्त केला आहे.

हेही वाचा - मोठी बातमी! केंद्राकडून रेमडेसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने गेल्या 72 तासांत चार चकमकी दरम्यान 12 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, 2021 मध्ये आतापर्यंत तब्बल 40 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे.

लष्कराकडून ठार करण्यात आलेले अतिरेकी अल बद्र, लश्कर-ए-तौयबा (एलईटी) आणि अंसार गजवतुल हिंद (एजीयूएच) या संघटनांचे होते. एजीयूएचचे 7 दहशतवादी, 3 अल बद्र आणि 2 लष्कर दहशतवादी असून त्यात संघटनेच्या प्रमुखांचा समावेश होता, असे डीजीपींनी पत्रकारांना सांगितले. अंसार गजवतुल हिंदमधील 7 दहशतवाद्यांचा खात्मा केल्यामुळे संघटना पूर्णपणे पुसली गेल्याची माहिती त्यांनी दिली.

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. अल बद्र या संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले. ओबैद फारुख, फैजल गुलजार आणि आसिफ बशीर अशी या तीन दहशतवाद्यांची नावं आहेत. या तिघांपैकी एक अगदीच नवीन दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याला सुरक्षा दलांकडून शरण येण्याचे आवाहन केले जात होते, मात्र इतर दोघांनी त्याला तसे करु दिले नाही. त्यानंतर चकमकीमध्ये हे तिघे मारले गेले.

छत्तीसगडमध्ये एका लाखाचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार -

छत्तीसगडमधील दंतेवाडात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत एका लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला. वेट्टी हूंगा असे नक्षलवाद्याचे नाव आहे. त्याच्यावर एका लाखाचे बक्षीस होते. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून 2 किलो आयईडी जप्त केला आहे.

हेही वाचा - मोठी बातमी! केंद्राकडून रेमडेसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी

Last Updated : Apr 11, 2021, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.