हैदराबाद :२०२७ मध्ये भारताची चंद्रयान मोहीम लॉंच होणार आहे. या मोहिमेचं नाव चंद्रयान ४ असं असणार आहे. चंद्राच्या खडकांचं नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी भारत चांद्रयान ४ मोहीम सुरू करेल, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. चांद्रयान ४ मध्ये जड-लिफ्ट एलव्हीएम-३ रॉकेटचं दोन वेळा वेगवेगळं प्रक्षेपण केलं जाईल. "चांद्रयान-४ मोहिमेचं उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुनं गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणं असं," सिंह यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
ते म्हणाले की, गगनयान मोहीमेमध्ये भारतीय अंतराळवीरांना विशेषतः डिझाइन केलेल्या अंतराळयानातून कमी-पृथ्वीच्या कक्षेत पाठवणं आणि त्यांना सुरक्षितपणं परत आणणे समाविष्ट आहे, ही मोहिम पुढील वर्षी लाँच केलं जाईल. २०२६ मध्ये, भारत समुद्रयान मोहिम देखील लॉंच करणार आहे, ज्यामध्ये समुद्राच्या तळाशी ६,००० मीटर खोलीपर्यंतच्या पाणबुडीतून तीन शास्त्रज्ञ समुद्रतळाचा शोध घेतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात समुद्रयान मोहिमेवर प्रकाश टाकलाय. समुद्राच्या प्रचंड संसाधनांचा शोध घेण्यावर देखील मंत्री जितेंद्र सिंह यांनी प्रकाश टाकलाय. ज्यामध्ये महत्त्वाची खनिजे, दुर्मिळ धातू आणि न सापडलेलं सागरी जैवविविधता यांचा समावेश आहे. हे संसाधनं सर्व देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी महत्त्वाचं आहेत.