महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Updated : 4 hours ago

ETV Bharat / state

अक्षय शिंदेच्या वडिलांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, पुरावे नष्ट करण्यासाठी बनावट एन्काउन्टर केल्याचा आरोप - badlapur akshay shinde encounter

Badlapur Akshay Shinde Encounter बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अक्षय शिंदेला एन्काउन्टरमध्ये मारण्यात आले. ते एन्काउन्टर बनावट असल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केला.

badlapur akshay shinde alleged encounter
अक्षय शिंदे एन्काउन्टर प्रकरण (Source- ETV Bharat)

मुंबईBadlapur Akshay Shinde Encounter- बदलापूरमधील शाळेतील चिमुकलींवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेच्या कथित एन्काउन्टरचं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. न्यायालयानं याप्रकरणी लक्ष घालून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी अक्षयच्या पित्यानं याचिकेतून मागणी केली आहे. याप्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

अक्षय शिंदेच्या कथित एन्काउन्टरनंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांसह शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी थेट कोर्टाची पायरी चढत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी बनावट एन्काउन्टरमध्ये अक्षय शिंदेचा जीव घेतला आहे.

अक्षय शिंदेच्या वडिलांनी याचिकेत काय म्हटले?

  • या प्रकरणाची उच्च न्यायालयानं विशेष तपास पथक नेमून चौकशी करावी, अशी मागणी अक्षयच्या वडिलांनी याचिकेत केली आहे. बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी मुलाचा जीव घेतला असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
  • अक्षय शिंदेच्या एन्काउन्टरमुळे कुणाला लाभ होणार आहे? याची चौकशी व्हावी.
  • एन्काउन्टरमध्ये राजकीय लाभार्थी कोण आहेत? त्याचा तपास व्हावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
  • बदलापूरच्या शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचीदेखील उच्च न्यायालयाच्या विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
  • या प्रकरणातील दोन फरार आरोपींवरदेखील याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अक्षयप्रमाणे आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्यानं संरक्षणाची मागणी अक्षयच्या वडिलांकडून करण्यात आली आहे.
  • मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी तातडीने सुनावणी होईल.

विरोधकांचे सत्ताधाऱ्यांनी फेटाळले दावे-अक्षय शिंदेचा पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. "पोलीस अधिकारी गोळीबारात जखमी होणं ही चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्रात पोलीसदेखील सुरक्षित नाही. जर त्या ठिकाणी सीसीटीव्ही असेल तर सार्वजनिक उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे,"असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. विरोधकांकडून अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांचे दावे फेटाळले आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हेही वाचा-

  1. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी चौकशीचा ससेमिरा; पोलिसांची झाली अडचण - Akshay Shinde Encounter Case
  2. बदलापूर घटनेतील आरोपीच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले; "गोळ्या घालून मारण्यापेक्षा...." - Akshay Shinde Encounter
  3. अक्षय शिंदेचा 'एन्काऊंटर' करणाऱ्या पोलिसांना शर्मिला ठाकरेंकडून बक्षीस; किती पैसे मिळणार? - Akshay Shinde Encounter
Last Updated : 4 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details