महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बहराईच हत्याकांडातील आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी; पोलिसांना म्हणाले 'चूक झाली, पुन्हा करणार नाही'

बहराईच हिंसाचारातील आरोपींनी नेपाळ सीमेवर पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन आरोपी जखमी झाले. यावेळी आरोपींनी गयावया करत चूक झाल्याची कबुली दिली.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Bahraich Violence
एन्काऊटंरनंतर आरोपींना पकडताना पोलीस (ETV Bharat)

लखनऊ :उत्तर प्रदेशातील महाराजगंज इथं 13 ऑक्टोबरला झालेल्या राम गोपाल मिश्रा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी 5 आरोपींना अटक केली. हे आरोपी नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना घेरलं. यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर चकमक उडाली. या चकमकीत सरफराज आणि तालीम हे दोन आरोपी गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी आरोपींनी पोलिसांना "आम्ही चूक केली असून अशी चूक पुन्हा करणार नाही," असं आर्जव केलं.

नेपाळ सीमेवर आरोपींची पोलिसांसोबत चकमक :बहराईच हत्याकांडानंतर आरोपी नेपाळमध्ये पळून जात होते. यावेळी पोलिसांनी नेपाळ सीमेवरील हांडा बसहेरी कालव्याजवळ पोलिसांनी आरोपींना थांबण्याच्या सूचना केल्या. मात्र आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनीही आरोपींनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत सर्फराज आणि तालीम जखमी झाले आहेत. दोघांच्या पायात गोळी लागली असून पोलिसांनी तिथून पकडलं. यावेळी दोघांना गोळी लागल्यानं ते वेदनेनं ओरडत होते. "साहेब, माझ्याकडून चूक झाली, मी पुन्हा असं करणार नाही." त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये पोलीस आरामात चालायला सांगत आहेत. आधी त्यांनी गुन्हा केल्यानंतर त्यातून पळून जाण्याचा आणि पोलिसांवर गोळीबार करण्याचा गुन्हा केला. यावर मारेकरी म्हणाला की, "सर, आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो, गोळीबार करणे चूक झाली, आम्ही पुन्हा असं करणार नाही."

बहराईच हत्याकांडातील आरोपी एन्काऊंटरमध्ये जखमी (ETV Bharat)

आरोपींनी केला पोलिसांवर गोळीबार :याबाबत पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी सांगितलं की, "मोहम्मद फहीन, मोहम्मद तालीम उर्फ ​​सबलू, मोहम्मद सरफराज, अब्दुल हमीद आणि मोहम्मद अफजल अशी अटक करण्यात आलेल्या 5 जणांची नावं आहेत. सर्फराज आणि तालीमच्या सांगण्यावरून पोलीस पथक त्यांना हत्येसाठी वापरलेलं हत्यार जप्त करण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी आरोपींनी तिथं ठेवलेल्या शस्त्रांसह पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोघांच्या पायात गोळी लागली आहे. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहराईच हत्येसाठी वापरलेली शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत."

आरोपीची मुलगी (ETV Bharat)

बहराइचमध्ये उसळला हिंसाचार : बहराईच इथं 13 ऑक्टोबरला दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीत दोन समुदायांच्या नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. बहराइचमधील रामपुरवा, महाराजगंज आणि महसी भागात त्यामुळे हिंसाचार उसळला. या हिंसाचारात राम गोपाल मिश्रा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संतप्त झालेल्या जमावानं बाजारातील घरांची जाळपोळ आणि तोडफोड सुरू केली. अब्दुल हमीद यांच्या घरी राम गोपाल मिश्रा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, असा दावा करण्यात येत आहे.

आरोपीच्या नातेवाईकांना एन्काऊंटरची भीती :अब्दुल हमीदची मुलगी रुखसार हिनं सांगितले की, "बुधवारी संध्याकाळी 4 वाजता माझे वडील अब्दुल हमीद, भाऊ सरफराज, फहीम आणि आणखी एका तरुणाला उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफमध्ये नेण्यात आलं. माझा पती आणि मेव्हण्याला प्रथम एसटीएफमध्ये नेलं. त्यांना कुठं ठेवण्यात आलं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र आम्हाला माझे वडील आणि नातेवाईकांना चकमकीत मारलं जाण्याची भीती आहे. त्यासाठी मी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन केलं आहे."

हेही वाचा :

  1. मणिपूरमधील जातीय हिंसा: देशासह समाजाचे अपयश - ETHNIC VIOLENCE IN MANIPUR
  2. पंतप्रधान मोदींना मणिपूरमधील हिंसाचार थांबवता येत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Attack On Pm Modi
  3. बांगलादेशातील हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चिंता व्यक्त, केंद्र सरकारकडं 'ही' केली मागणी - RRS On Bangladesh violence

ABOUT THE AUTHOR

...view details