ETV Bharat / state

मेळघाटात रानभाजी महोत्सव : शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी मारला 'आरा' भाज्यांवर ताव - Ranbhaji festival in Melghat

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2024, 3:36 PM IST

Updated : Aug 31, 2024, 4:24 PM IST

Ranbhaji festival in Melghat : मेळगाटात जैतादेही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत खास रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. प्रत्येक रान भाजीचं महत्त्व आणि फायदे या उत्सवानिमित्त सांगण्यात आले. मेळघाटातील आदिवासी बांधव रानभाज्यांना 'आराभाजी ' असं म्हणतात. शाळेतील चिमुकल्यांच्या या रानभाजी महोत्सवा संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट...

मेळघाटातील शाळेत रानभाजी महोत्सव
मेळघाटातील शाळेत रानभाजी महोत्सव (Etv Bharat Reporter)

अमरावती Ranbhaji festival in Melghat : पावसाळ्यात मेळघाटच्या जंगलात अनेक पौष्टिक आणि आयुर्वेदिक रानभाज्या मिळतात. या रानभाज्यांची माहिती मात्र प्रत्येकाला आहे असं नाही. या भागातील आदिवासींना मात्र रानभाज्यांची चांगलीच जाण आहे. या रानभाज्यांचं महत्त्व इतरांनाही कळावं आणि सर्वांनी एकत्रित येऊन या रानभाज्यांवर ताव मारावा यासाठी जैतादेही येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत खास रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला.

शाळेत रानभाजी महोत्सव (Etv Bharat Reporter)



रानभाज्या आरोग्यासाठी गुणकारी : आता पावसाळ्यामध्ये मेळघाटच्या जंगलात अंबाडी, पिंपळ, अळू, कांचन, काटेमाट, गुळवेल, करटोली, वाघाटी, दिवटी, बांबूचे कोंब अशा रानभाज्यांचा या उत्सवात समावेश होता. निसर्गातील या रानभाज्यातून महत्वपूर्ण जीवनसत्वं शरीराला मिळतात. रासायनिक तसंच कुठलेही हानिकारक घटक या रानभाज्यांमध्ये नसल्यामुळे आरोग्यासाठी त्या अतिशय गुणकारी असल्याची माहिती जैतादेही येथील शाळेचे मुख्याध्यापक गणेश जामूनकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. वर्षातून एकदाच या रानभाज्या खायला मिळतात. मेळघाटातील आदिवासी बांधव अतिशय कमी तेलात आणि कुठलाही भडक मसाला न वापरता या भाज्या बनवतात. "आमच्या शाळेत सर्वच विद्यार्थी हे आदिवासी समुदायातील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात आणि खास त्यांनी जंगलातून आणलेल्या रानभाज्या आम्ही आमच्या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानांतर्गत रानभाजी उत्सवानिमित्त केल्या आणि चाखल्या." असं गणेश जामूनकर यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह : जैतादही येथील शाळेच्या आवारात विविध वृक्षांसह काही रानभाज्या देखील लावण्यात आल्या. शाळेच्या आवारातील रानभाज्यांसह गावालगत जंगलात असणाऱ्या रानभाज्या तोडून आणण्याची भूमिका ही विद्यार्थ्यांची होती. शिक्षकांनी आपल्या शाळेत रानभाजी महोत्सव आपण घेऊ असं केवळ म्हटलं होतं. मात्र विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकारानं या परिसरात असणाऱ्या आठ ते दहा रानभाज्या शाळेत खास चुलीवर बनवण्यात आल्या. पोषण आहार शिजवणारी शाळेतील सेविका आणि तिच्यासोबत पाच सहा विद्यार्थ्यांनी मिळून कर्टुले, वाघाटी, दिवटी, कांचन, पिंपळ यांच्या भाज्या तयार केल्या. बांबूच्या कोंबाची खास भाजी देखील या उत्सवानिमित्त बनवण्यात आली. नव्याने आलेले बांबूचे कोंब शिळून त्यांना उकळून आणि त्याचा गर काढून बांबूची खास भाजी या उत्सवानिमित्त बनवण्यात आली. आदिवासी बांधव बांबूच्या भाजीला केलटाची भाजी असं म्हणतात. केलटाची भाजी सर्व रानभाज्यांमध्ये अतिशय पौष्टिक आहे, अशी माहिती देखील गणेश जामूनकर यांनी दिली.

रानभाज्यांचं असं आहे वैशिष्ट्य : मेळघाटात आढळणाऱ्या काही रानभाज्यांच्या वैशिष्ट्यांसंदर्भातील माहिती शाळेतील विद्यार्थ्यांसह रानभाजी उत्सवानिमित्त शाळेत येणाऱ्या विशिष्ट मंडळींना शिक्षकांच्या वतीने सांगण्यात आली. अंबाडीची भाजी ही अतिशय कमी तेलात कांदा मिरची लसूण जिरं तिखट मीठ हळद टोमॅटो घालून कशी करतात, हे देखील यावेळी सांगण्यात आलं. पिंपळाच्या कोवळ्या पानांची देखील भाजी या महोत्सवात करण्यात आली. देठासह असणारी पिंपळाची कोवळी पानं थोडी चिंच चार लसूणच्या पाकळ्या, मिरची, तेल, मीठ घालून केलेली पिंपळाच्या पानांची भाजी अनेकांना आवडली. अनेक औषधी गुणधर्म असणारी गुळवेलच्या पानांची भाजी देखील या महोत्सवात होती. गुळवेलची कोवळी पानं कांदा लसूण तेल तिखट घालून ही भाजी शिजवण्यात आली. कुष्ठरोग, मधुमेह, पोटाचे विकार, सांधेदुखी, अस्थिविकार, कावीळ अशा विविध आजारांवर गुणकारी आणि रोगप्रतिकारशक्तीवर्धक कर्करोगाच्या गाठी रोधक असणारी ही भाजी देखील या रानभाजी महोत्सवात चाखायला मिळाली. शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कर्टुल्याच्या भाजीवर देखील विद्यार्थी शिक्षक आणि निमंत्रित पाहुण्यांनी मस्त ताव मारला.


चुलीवर स्वयंपाक, केळीच्या पानांवर जेवण : सात, आठ प्रकारच्या रानभाज्या आणि त्यासोबत ज्वारीच्या भाकरी या चुलीवर तयार करण्यात आल्या. या रानभाज्यांसोबत हिरव्या मिरच्यांचा ठेचा देखील अतिशय चवदार होता. वर्षातून एकदा केवळ पावसाळ्यातच मिळणाऱ्या या रानभाज्यांचा स्वाद घेण्याकरता केळीच्या पानावर हे पौष्टिक जेवण वाढण्यात आलं. आता रानभाज्यांचा सीजन संपत आला असला तरी शाळेतील विद्यार्थ्यांनी गावालगत रानभाज्या शोधून त्या खास हा उत्सव साजरा करण्याकरता शाळेत आणल्या. काही रानभाज्या शाळेच्या परिसरात उपलब्ध होत्या. या सर्व रानभाज्या एकत्रित केल्या. पोषण आहार शिजवणाऱ्या ताईंसोबत मुलांनीच रानभाज्या शिजवण्यास मदत केली. शाळेतल्या चिमुकल्यांच्या पुढाकारानच हा रानभाजी उत्सव शाळेत यशस्वी झाल्याची माहिती शाळेतील शिक्षक जितेंद्र राठी यांनी दिली. विशेष म्हणजे या महोत्सवादरम्यान शालेय पोषण आहार अधीक्षक नंदकिशोर खरात यांनी देखील भेट देऊन या रानभाज्यांची चव चाखली.

हेही वाचा...

  1. मेळघाटातील दुर्गम गावात वसलेल्या चिमुकल्यांना मिळालं वर्षभराचं शैक्षणिक साहित्य; अकोल्याच्या सेवा संस्थेचा पुढाकार
  2. जीवन वाचविणारे पाणीच ठरतेय मृत्यूला आमंत्रण: मेळघाटातील गामस्थांना मूत्रपिंडाचे आजार, अनेकांचे मृत्यू

अमरावती Ranbhaji festival in Melghat : पावसाळ्यात मेळघाटच्या जंगलात अनेक पौष्टिक आणि आयुर्वेदिक रानभाज्या मिळतात. या रानभाज्यांची माहिती मात्र प्रत्येकाला आहे असं नाही. या भागातील आदिवासींना मात्र रानभाज्यांची चांगलीच जाण आहे. या रानभाज्यांचं महत्त्व इतरांनाही कळावं आणि सर्वांनी एकत्रित येऊन या रानभाज्यांवर ताव मारावा यासाठी जैतादेही येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत खास रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला.

शाळेत रानभाजी महोत्सव (Etv Bharat Reporter)



रानभाज्या आरोग्यासाठी गुणकारी : आता पावसाळ्यामध्ये मेळघाटच्या जंगलात अंबाडी, पिंपळ, अळू, कांचन, काटेमाट, गुळवेल, करटोली, वाघाटी, दिवटी, बांबूचे कोंब अशा रानभाज्यांचा या उत्सवात समावेश होता. निसर्गातील या रानभाज्यातून महत्वपूर्ण जीवनसत्वं शरीराला मिळतात. रासायनिक तसंच कुठलेही हानिकारक घटक या रानभाज्यांमध्ये नसल्यामुळे आरोग्यासाठी त्या अतिशय गुणकारी असल्याची माहिती जैतादेही येथील शाळेचे मुख्याध्यापक गणेश जामूनकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. वर्षातून एकदाच या रानभाज्या खायला मिळतात. मेळघाटातील आदिवासी बांधव अतिशय कमी तेलात आणि कुठलाही भडक मसाला न वापरता या भाज्या बनवतात. "आमच्या शाळेत सर्वच विद्यार्थी हे आदिवासी समुदायातील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात आणि खास त्यांनी जंगलातून आणलेल्या रानभाज्या आम्ही आमच्या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानांतर्गत रानभाजी उत्सवानिमित्त केल्या आणि चाखल्या." असं गणेश जामूनकर यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह : जैतादही येथील शाळेच्या आवारात विविध वृक्षांसह काही रानभाज्या देखील लावण्यात आल्या. शाळेच्या आवारातील रानभाज्यांसह गावालगत जंगलात असणाऱ्या रानभाज्या तोडून आणण्याची भूमिका ही विद्यार्थ्यांची होती. शिक्षकांनी आपल्या शाळेत रानभाजी महोत्सव आपण घेऊ असं केवळ म्हटलं होतं. मात्र विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकारानं या परिसरात असणाऱ्या आठ ते दहा रानभाज्या शाळेत खास चुलीवर बनवण्यात आल्या. पोषण आहार शिजवणारी शाळेतील सेविका आणि तिच्यासोबत पाच सहा विद्यार्थ्यांनी मिळून कर्टुले, वाघाटी, दिवटी, कांचन, पिंपळ यांच्या भाज्या तयार केल्या. बांबूच्या कोंबाची खास भाजी देखील या उत्सवानिमित्त बनवण्यात आली. नव्याने आलेले बांबूचे कोंब शिळून त्यांना उकळून आणि त्याचा गर काढून बांबूची खास भाजी या उत्सवानिमित्त बनवण्यात आली. आदिवासी बांधव बांबूच्या भाजीला केलटाची भाजी असं म्हणतात. केलटाची भाजी सर्व रानभाज्यांमध्ये अतिशय पौष्टिक आहे, अशी माहिती देखील गणेश जामूनकर यांनी दिली.

रानभाज्यांचं असं आहे वैशिष्ट्य : मेळघाटात आढळणाऱ्या काही रानभाज्यांच्या वैशिष्ट्यांसंदर्भातील माहिती शाळेतील विद्यार्थ्यांसह रानभाजी उत्सवानिमित्त शाळेत येणाऱ्या विशिष्ट मंडळींना शिक्षकांच्या वतीने सांगण्यात आली. अंबाडीची भाजी ही अतिशय कमी तेलात कांदा मिरची लसूण जिरं तिखट मीठ हळद टोमॅटो घालून कशी करतात, हे देखील यावेळी सांगण्यात आलं. पिंपळाच्या कोवळ्या पानांची देखील भाजी या महोत्सवात करण्यात आली. देठासह असणारी पिंपळाची कोवळी पानं थोडी चिंच चार लसूणच्या पाकळ्या, मिरची, तेल, मीठ घालून केलेली पिंपळाच्या पानांची भाजी अनेकांना आवडली. अनेक औषधी गुणधर्म असणारी गुळवेलच्या पानांची भाजी देखील या महोत्सवात होती. गुळवेलची कोवळी पानं कांदा लसूण तेल तिखट घालून ही भाजी शिजवण्यात आली. कुष्ठरोग, मधुमेह, पोटाचे विकार, सांधेदुखी, अस्थिविकार, कावीळ अशा विविध आजारांवर गुणकारी आणि रोगप्रतिकारशक्तीवर्धक कर्करोगाच्या गाठी रोधक असणारी ही भाजी देखील या रानभाजी महोत्सवात चाखायला मिळाली. शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कर्टुल्याच्या भाजीवर देखील विद्यार्थी शिक्षक आणि निमंत्रित पाहुण्यांनी मस्त ताव मारला.


चुलीवर स्वयंपाक, केळीच्या पानांवर जेवण : सात, आठ प्रकारच्या रानभाज्या आणि त्यासोबत ज्वारीच्या भाकरी या चुलीवर तयार करण्यात आल्या. या रानभाज्यांसोबत हिरव्या मिरच्यांचा ठेचा देखील अतिशय चवदार होता. वर्षातून एकदा केवळ पावसाळ्यातच मिळणाऱ्या या रानभाज्यांचा स्वाद घेण्याकरता केळीच्या पानावर हे पौष्टिक जेवण वाढण्यात आलं. आता रानभाज्यांचा सीजन संपत आला असला तरी शाळेतील विद्यार्थ्यांनी गावालगत रानभाज्या शोधून त्या खास हा उत्सव साजरा करण्याकरता शाळेत आणल्या. काही रानभाज्या शाळेच्या परिसरात उपलब्ध होत्या. या सर्व रानभाज्या एकत्रित केल्या. पोषण आहार शिजवणाऱ्या ताईंसोबत मुलांनीच रानभाज्या शिजवण्यास मदत केली. शाळेतल्या चिमुकल्यांच्या पुढाकारानच हा रानभाजी उत्सव शाळेत यशस्वी झाल्याची माहिती शाळेतील शिक्षक जितेंद्र राठी यांनी दिली. विशेष म्हणजे या महोत्सवादरम्यान शालेय पोषण आहार अधीक्षक नंदकिशोर खरात यांनी देखील भेट देऊन या रानभाज्यांची चव चाखली.

हेही वाचा...

  1. मेळघाटातील दुर्गम गावात वसलेल्या चिमुकल्यांना मिळालं वर्षभराचं शैक्षणिक साहित्य; अकोल्याच्या सेवा संस्थेचा पुढाकार
  2. जीवन वाचविणारे पाणीच ठरतेय मृत्यूला आमंत्रण: मेळघाटातील गामस्थांना मूत्रपिंडाचे आजार, अनेकांचे मृत्यू
Last Updated : Aug 31, 2024, 4:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.