ETV Bharat / state

'गेटवे ऑफ इंडिया'जवळ दिसली कुवेतहून आलेली संशयास्पद बोट, तिघे ताब्यात

Kuwait Boat Near Gateway Of India : मुंबईच्या 'गेटवे ऑफ इंडिया'जवळ फिरणाऱ्या कुवेतच्या संशयास्पद बोटीतून तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलंय. हे तिघे तामिळनाडूचे रहिवासी आहेत.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 7:34 AM IST

Updated : Feb 7, 2024, 10:13 AM IST

Kuwait Boat Near Gateway Of India
Kuwait Boat Near Gateway Of India

मुंबई Kuwait Boat Near Gateway Of India : मुंबई पोलिसांना 6 फेब्रुवारीला सकाळी 'गेटवे ऑफ इंडिया'च्या परिसरात एक संशयास्पद बोट फिरताना दिसली. पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता, ती बोट कुवेतची असल्याचं समजलं. 'अब्दुला शरीफ 1' असं या बोटीचं नाव आहे. बोटीवरील तिन्ही व्यक्ती भारताचे नागरिक असून ते तामिळनाडूचे रहिवासी आहेत. ते व्यवसायानं मासेमार आहेत. ही बोट ही विनापरवाना भारताच्या समुद्री हद्दीत फिरत होती. पोलिसांनी बोट आणि त्यावरील व्यक्तींना ताब्यात घेतलंय. यलो गेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांनी ही माहिती दिली.

काय आहे प्रकरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीवरील व्यक्ती कामाच्या शोधात होते. तेव्हा तामिळनाडूमधील एका एजंटनं त्यांना दोन वर्षांपूर्वी कुवेत इथं पाठवलं. गेल्या दोन वर्षांपासून ते कुवेत इथं 'अब्दुला शरीफ 1' या बोटीवर मासेमारी करत होते. मात्र या दोन वर्षामध्ये बोटीच्या मालकानं त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. तसेच त्यांना मालकाकडून मारहाण देखील केली जात होती. मालकानं त्यांचे भारतीय पासपोर्ट जप्त करून घेतले. तसेच त्यांना काम सोडून गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

भारतात पळून आले : या गोष्टीला कंटाळून तिघांनी भारतात पळून यायचं ठरवलं. 28 जानेवारीला तिघे कुवेत येथून मालकाची 'अब्दुला शरीफ 1' बोट न सांगता घेऊन निघाले. ते 6 फेब्रुवारीला मुंबईला पोहचले. तेथे मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी पुढील तपास चालू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांनी दिली आहे.

हे वाचलंत का :

  1. गॅंगस्टर लॉरेन्स बिन्सोईच्या संपर्कात असलेल्या गॅंगस्टरला पुण्यातून अटक, दोन देशी पिस्तुलासह मॅकझीन जप्त
  2. मुंबईत नऊ कोटी रुपयांचं कोकेन जप्त, नायजेरियाच्या दोघांना अटक

मुंबई Kuwait Boat Near Gateway Of India : मुंबई पोलिसांना 6 फेब्रुवारीला सकाळी 'गेटवे ऑफ इंडिया'च्या परिसरात एक संशयास्पद बोट फिरताना दिसली. पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता, ती बोट कुवेतची असल्याचं समजलं. 'अब्दुला शरीफ 1' असं या बोटीचं नाव आहे. बोटीवरील तिन्ही व्यक्ती भारताचे नागरिक असून ते तामिळनाडूचे रहिवासी आहेत. ते व्यवसायानं मासेमार आहेत. ही बोट ही विनापरवाना भारताच्या समुद्री हद्दीत फिरत होती. पोलिसांनी बोट आणि त्यावरील व्यक्तींना ताब्यात घेतलंय. यलो गेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांनी ही माहिती दिली.

काय आहे प्रकरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीवरील व्यक्ती कामाच्या शोधात होते. तेव्हा तामिळनाडूमधील एका एजंटनं त्यांना दोन वर्षांपूर्वी कुवेत इथं पाठवलं. गेल्या दोन वर्षांपासून ते कुवेत इथं 'अब्दुला शरीफ 1' या बोटीवर मासेमारी करत होते. मात्र या दोन वर्षामध्ये बोटीच्या मालकानं त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. तसेच त्यांना मालकाकडून मारहाण देखील केली जात होती. मालकानं त्यांचे भारतीय पासपोर्ट जप्त करून घेतले. तसेच त्यांना काम सोडून गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

भारतात पळून आले : या गोष्टीला कंटाळून तिघांनी भारतात पळून यायचं ठरवलं. 28 जानेवारीला तिघे कुवेत येथून मालकाची 'अब्दुला शरीफ 1' बोट न सांगता घेऊन निघाले. ते 6 फेब्रुवारीला मुंबईला पोहचले. तेथे मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी पुढील तपास चालू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांनी दिली आहे.

हे वाचलंत का :

  1. गॅंगस्टर लॉरेन्स बिन्सोईच्या संपर्कात असलेल्या गॅंगस्टरला पुण्यातून अटक, दोन देशी पिस्तुलासह मॅकझीन जप्त
  2. मुंबईत नऊ कोटी रुपयांचं कोकेन जप्त, नायजेरियाच्या दोघांना अटक
Last Updated : Feb 7, 2024, 10:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.