ETV Bharat / state

सुधा चंद्रन, रितेश देशमुख ते भरत जाधव यांच्यापर्यंत दिग्गज स्टार्सना लॉन्च करणारे रामोजी राव - Ramoji Rao

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 12:14 PM IST

Ramoji Rao no more :भारताचे माध्यम सम्राट असलेल्या रामोजी राव यांचं 88 व्या वर्षी निधन झालं. सातत्यानं नवी प्रतिभा शोधून त्यांना पैलू पाडण्याचं काम त्यांच्या हातून घडलं. आज दक्षिणेत निर्माण झालेलं फिल्म इंडस्ट्रीचं जाळं उभं करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. अनेक नव्या कलाकारांना त्यांनी आपल्या चित्रपटातून पहिल्यांदा संधी दिली आणि त्यांचं करियर उभं केलं.

RAMOJI RAO
रामोजी राव (Etv Bharat)

हैदराबाद Ramoji Rao no more - रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक रामोजी राव यांचं 8 जून रोजी निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कलात्मक दूरदृष्टी लाभलेल्या या प्रति विश्वामित्रानं रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्सची निर्मिती करुन चित्रपट उद्योगात मोठं योगदान दिलं. चित्रपटासाठी लागणारे सर्व प्रकारचे खरेखुरे सेट्स, बाग-बगिचे, भव्य बिग फ्लोअर्स स्टुडिओपासून अगदी रुग्णालय, जेल, पोलीस स्टेशन, वाडे, जुनी गावं, मेट्रो शहरातील रस्ते ते विमानतळापर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी उभं करुन चित्रपट निर्मितीचा मार्ग सुकर केला. रामोजी राव यांचा मूळ पिंड पत्रकारितेचा, परंतु त्यांनी वर्तमान पत्र, मासिकं, वृत्त वाहिन्यांपासून ते फिल्म, हॉटेल, चिटफंड, फुड इंडस्ट्रीपर्यंत अनेक यशस्वी उद्योग उभे केले. या सर्व उद्योगांमध्ये एका गोष्टीचं साम्य त्यांनी सातत्यानं बाळगलं की, नवा उद्योग सुरू करताना नवी प्रतिभावान माणसं शोधायची, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन द्यायचं आणि एक सजग निर्मिती करायची. वर्तमानपत्र, वृतवाहिन्यांसह सर्वच उद्योगात त्यांनी हा कटाक्ष कायम पाळला. त्यांचा हाच दृष्टीकोन फिल्म उद्योगातही दिसून येतो.

Ramoji Rao
रामोजी राव (Etv Bharat)

साऊथची फिल्म इंडस्ट्री अतिशय जोमात असण्याचा तो काळ होता. 80 च्या दशकात प्रेक्षकांचं निव्वळ मनोरंज करण्यासाठी अनेक निर्माते त्याकाळात पुढं येत होते. सुरुवातीच्या काळात पौराणिक चित्रपटांची लाट होती. परंतु ती लाट मनोरंजनाच्या नावानं आणि केवळ नफ्याच्या हेतूनं कधी मारधाड करणाऱ्या हिंसक चित्रपटाकडे वळली, हे प्रेक्षकांसह निर्मात्यांनाही कळलं नाही. असे चित्रपट कुटुंबासह पाहणं मुश्किल होऊन बसलं. अशावेळी रामोजी राव यांनी दर्जेदार कथा कुटुंबासह एकत्र पाहता येतील अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं. 1984 मध्ये 'श्रीवरिकी प्रेमलेखा' हा सामाजिक विषयावरील पहिला विनोदी चित्रपट बनवला. त्यांच्या या पहिल्याच प्रयत्नाला प्रेक्षकांनी उचलून धरलं आणि समीक्षकांनीही त्याची प्रशंसा केली. या चित्रटाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोच्च 'नंदी अवॉर्ड' हा पुरस्कार मिळाला आणि रामोजी राव यांचा निर्माता म्हणून उदय झाला. तेलुगुमधील नामवंत लेखकांच्या उत्तम कथा कादंबऱ्यावर चित्रपट निर्मितीसाठीचा सिलसिला त्यांनी जारी ठेवला आणि गेल्या 40 वर्षात तेलुगु, तमिळ, कन्नड, मराठी, बंगाली, मल्याळम, हिंदी या भाषेत 65 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली.

रामोजी राव यांनी जेवढे म्हणून चित्रपट निर्माण केले त्यामध्ये कुठेही हिंसा, बिभत्सपणा, चावट विनोद यांना थारा दिला नाही. चित्रपट निर्माण झाल्यानंतर सेन्सॉरला संमतीसाठी पाठवण्यापूर्वी ते त्यांच्या प्रीव्ह्यू थिएटरमध्ये स्वतः पाहायचे आणि एखादा चित्रपटातील प्रसंग त्यांना पटला नाही तर त्याला कात्री लावण्याचा आदेश द्यायचे. मग तो सीन बनवण्यासाठी किती खर्च झाला याची फिकीर ते बाळगत नसत. खरं तर त्यांच्या चित्रपटाचे ते स्वतःच पहिले सेन्सॉर असायचे. आपला चित्रपट पाहताना तो कुणालाही खटकणार नाही याची दक्षता ते घ्यायचे.

चित्रपट बनवताना त्यांनी कथानक उत्तम असायलाच हवे हा आग्रह कायम ठेवला. नामवंत प्रतिभावान लेखकांपासून नव्या दर्जेदार लिहिणाऱ्या लेखकापर्यंतच्या कथा त्यांनी आपल्या चित्रपटासाठी निवडल्या. सर्जनशील दिग्दर्शकांना त्यांनी संधी दिली. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी नव्या प्रतिभेला संधी दिली. त्यामुळं आज चित्रपट क्षेत्रात ख्यातनाम असलेल्या व्यक्तिमत्वांना पहिली संधी देण्याचं काम रामोजी राव यांनी केलं. 1985 मध्ये त्यांनी 'मयुरी' हा सुधा चंद्रन यांची भूमिका असलेला चित्रपट निर्माण केला. सुधा चंद्रन यांना अभिनेत्री म्हणून पहिली संधी याच चित्रपटामुळं मिळाली. नंतर हा चित्रपट हिंदीमध्ये 'नाचे मयुरी' या नावानं रिमेक करण्यात आला. या चित्रपटाला देशभर प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

मराठी चित्रपट सृष्टीतही रामोजी राव यांचं योगदान खूप मोठं आहे. वैभव पाहिलेल्या मराठी चित्रपटकडे प्रेक्षकांनी हळूहळू पाठ फिरवली होती. तेच तेच उथळ कॉमेडी चित्रपट पाहून प्रेक्षक कंटाळला होता. त्यावेळी 2003 मध्ये 'चालू नवरा भोळी बायको' हा चित्रपट रामोजी राव यांनी निर्माण केला. ए. राधास्वामी दिग्दर्शित या चित्रपटातून त्यांनी भरत जाधव यांना पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची संधी दिली आणि त्यानं त्याचं सोनं केलं. आज मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भरत जाधवच्या यशाचा मार्ग रामोजी राव यांनी निर्माण केला होता. ईटीव्ही मराठी वाहिनी सुरू केल्यानंतर त्यांच्यामुळे मराठी कलाकारांना मोठी संधी निर्माण झाली. मालिका ते टेलिफिल्म्स यामधून अनेक कलाकार आपली प्रतिभा सिद्ध करु शकले. गुरुदक्षिणा, सूर जुळता जुळता, बिन पैशाचा तमाशा यासारख्या टेलिफिचर फिल्म्सही त्यांनी निर्माण केल्या. दुसरं उदाहरण रितेश देशमुख याचं. 'तुझे मेरी कसम' हा रितेश देशमुखचा पहिला चित्रपट रामोजी राव यांची निर्मिती होती. या चित्रपटातून रितेश आणि जेनेलिया डिसुझाची जोडी सर्वप्रथम रुपेरी पडद्यावर झळकली. आज रितेश देशमुखनं आपली कारकिर्द बहारदार बनवली आहे ती रामोजी रावांच्या आशीर्वादानच. 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट 'नुवे कावाली' या तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. 2000 मध्ये सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटातून तरुण या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्यानं पदार्पण केलं होतं. ईटीव्हीच्या प्रादेषिक भाषेतील वाहिन्या त्यांनी निर्माण केल्या. यातून संपूर्ण देशभर मराठी, तेलुगु, कन्नड, बंगाली, गुजराती, ओडिशासह हिंदीतील मनोरंजन करणाऱ्या या वाहिन्यांनी देशातील नव्या प्रादेषिक कलाकारांना एक मंच निर्माण केला. आज दाक्षिणात्य चित्रपट उद्योगात यशाच्या शिखरावर असलेल्या प्रत्येक कलाकाराच्या, दिग्दर्शक, संगीतकार आणि तंत्रज्ञांच्या यशात रामोजी राव यांचा मोठा आशीर्वाद आहे.

हेही वाचा -

  1. रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांचं निधन - Ramoji Rao Passes Away
  2. "रामोजी रावांना श्रद्धांजली अपर्ण करण्याचा मार्ग म्हणजे भारतरत्न प्रदान करणे"-चित्रपट दिग्दर्शक राजमौली - ramoji rao passed away

हैदराबाद Ramoji Rao no more - रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक रामोजी राव यांचं 8 जून रोजी निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कलात्मक दूरदृष्टी लाभलेल्या या प्रति विश्वामित्रानं रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्सची निर्मिती करुन चित्रपट उद्योगात मोठं योगदान दिलं. चित्रपटासाठी लागणारे सर्व प्रकारचे खरेखुरे सेट्स, बाग-बगिचे, भव्य बिग फ्लोअर्स स्टुडिओपासून अगदी रुग्णालय, जेल, पोलीस स्टेशन, वाडे, जुनी गावं, मेट्रो शहरातील रस्ते ते विमानतळापर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी उभं करुन चित्रपट निर्मितीचा मार्ग सुकर केला. रामोजी राव यांचा मूळ पिंड पत्रकारितेचा, परंतु त्यांनी वर्तमान पत्र, मासिकं, वृत्त वाहिन्यांपासून ते फिल्म, हॉटेल, चिटफंड, फुड इंडस्ट्रीपर्यंत अनेक यशस्वी उद्योग उभे केले. या सर्व उद्योगांमध्ये एका गोष्टीचं साम्य त्यांनी सातत्यानं बाळगलं की, नवा उद्योग सुरू करताना नवी प्रतिभावान माणसं शोधायची, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन द्यायचं आणि एक सजग निर्मिती करायची. वर्तमानपत्र, वृतवाहिन्यांसह सर्वच उद्योगात त्यांनी हा कटाक्ष कायम पाळला. त्यांचा हाच दृष्टीकोन फिल्म उद्योगातही दिसून येतो.

Ramoji Rao
रामोजी राव (Etv Bharat)

साऊथची फिल्म इंडस्ट्री अतिशय जोमात असण्याचा तो काळ होता. 80 च्या दशकात प्रेक्षकांचं निव्वळ मनोरंज करण्यासाठी अनेक निर्माते त्याकाळात पुढं येत होते. सुरुवातीच्या काळात पौराणिक चित्रपटांची लाट होती. परंतु ती लाट मनोरंजनाच्या नावानं आणि केवळ नफ्याच्या हेतूनं कधी मारधाड करणाऱ्या हिंसक चित्रपटाकडे वळली, हे प्रेक्षकांसह निर्मात्यांनाही कळलं नाही. असे चित्रपट कुटुंबासह पाहणं मुश्किल होऊन बसलं. अशावेळी रामोजी राव यांनी दर्जेदार कथा कुटुंबासह एकत्र पाहता येतील अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं. 1984 मध्ये 'श्रीवरिकी प्रेमलेखा' हा सामाजिक विषयावरील पहिला विनोदी चित्रपट बनवला. त्यांच्या या पहिल्याच प्रयत्नाला प्रेक्षकांनी उचलून धरलं आणि समीक्षकांनीही त्याची प्रशंसा केली. या चित्रटाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोच्च 'नंदी अवॉर्ड' हा पुरस्कार मिळाला आणि रामोजी राव यांचा निर्माता म्हणून उदय झाला. तेलुगुमधील नामवंत लेखकांच्या उत्तम कथा कादंबऱ्यावर चित्रपट निर्मितीसाठीचा सिलसिला त्यांनी जारी ठेवला आणि गेल्या 40 वर्षात तेलुगु, तमिळ, कन्नड, मराठी, बंगाली, मल्याळम, हिंदी या भाषेत 65 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली.

रामोजी राव यांनी जेवढे म्हणून चित्रपट निर्माण केले त्यामध्ये कुठेही हिंसा, बिभत्सपणा, चावट विनोद यांना थारा दिला नाही. चित्रपट निर्माण झाल्यानंतर सेन्सॉरला संमतीसाठी पाठवण्यापूर्वी ते त्यांच्या प्रीव्ह्यू थिएटरमध्ये स्वतः पाहायचे आणि एखादा चित्रपटातील प्रसंग त्यांना पटला नाही तर त्याला कात्री लावण्याचा आदेश द्यायचे. मग तो सीन बनवण्यासाठी किती खर्च झाला याची फिकीर ते बाळगत नसत. खरं तर त्यांच्या चित्रपटाचे ते स्वतःच पहिले सेन्सॉर असायचे. आपला चित्रपट पाहताना तो कुणालाही खटकणार नाही याची दक्षता ते घ्यायचे.

चित्रपट बनवताना त्यांनी कथानक उत्तम असायलाच हवे हा आग्रह कायम ठेवला. नामवंत प्रतिभावान लेखकांपासून नव्या दर्जेदार लिहिणाऱ्या लेखकापर्यंतच्या कथा त्यांनी आपल्या चित्रपटासाठी निवडल्या. सर्जनशील दिग्दर्शकांना त्यांनी संधी दिली. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी नव्या प्रतिभेला संधी दिली. त्यामुळं आज चित्रपट क्षेत्रात ख्यातनाम असलेल्या व्यक्तिमत्वांना पहिली संधी देण्याचं काम रामोजी राव यांनी केलं. 1985 मध्ये त्यांनी 'मयुरी' हा सुधा चंद्रन यांची भूमिका असलेला चित्रपट निर्माण केला. सुधा चंद्रन यांना अभिनेत्री म्हणून पहिली संधी याच चित्रपटामुळं मिळाली. नंतर हा चित्रपट हिंदीमध्ये 'नाचे मयुरी' या नावानं रिमेक करण्यात आला. या चित्रपटाला देशभर प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

मराठी चित्रपट सृष्टीतही रामोजी राव यांचं योगदान खूप मोठं आहे. वैभव पाहिलेल्या मराठी चित्रपटकडे प्रेक्षकांनी हळूहळू पाठ फिरवली होती. तेच तेच उथळ कॉमेडी चित्रपट पाहून प्रेक्षक कंटाळला होता. त्यावेळी 2003 मध्ये 'चालू नवरा भोळी बायको' हा चित्रपट रामोजी राव यांनी निर्माण केला. ए. राधास्वामी दिग्दर्शित या चित्रपटातून त्यांनी भरत जाधव यांना पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची संधी दिली आणि त्यानं त्याचं सोनं केलं. आज मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भरत जाधवच्या यशाचा मार्ग रामोजी राव यांनी निर्माण केला होता. ईटीव्ही मराठी वाहिनी सुरू केल्यानंतर त्यांच्यामुळे मराठी कलाकारांना मोठी संधी निर्माण झाली. मालिका ते टेलिफिल्म्स यामधून अनेक कलाकार आपली प्रतिभा सिद्ध करु शकले. गुरुदक्षिणा, सूर जुळता जुळता, बिन पैशाचा तमाशा यासारख्या टेलिफिचर फिल्म्सही त्यांनी निर्माण केल्या. दुसरं उदाहरण रितेश देशमुख याचं. 'तुझे मेरी कसम' हा रितेश देशमुखचा पहिला चित्रपट रामोजी राव यांची निर्मिती होती. या चित्रपटातून रितेश आणि जेनेलिया डिसुझाची जोडी सर्वप्रथम रुपेरी पडद्यावर झळकली. आज रितेश देशमुखनं आपली कारकिर्द बहारदार बनवली आहे ती रामोजी रावांच्या आशीर्वादानच. 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट 'नुवे कावाली' या तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. 2000 मध्ये सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटातून तरुण या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्यानं पदार्पण केलं होतं. ईटीव्हीच्या प्रादेषिक भाषेतील वाहिन्या त्यांनी निर्माण केल्या. यातून संपूर्ण देशभर मराठी, तेलुगु, कन्नड, बंगाली, गुजराती, ओडिशासह हिंदीतील मनोरंजन करणाऱ्या या वाहिन्यांनी देशातील नव्या प्रादेषिक कलाकारांना एक मंच निर्माण केला. आज दाक्षिणात्य चित्रपट उद्योगात यशाच्या शिखरावर असलेल्या प्रत्येक कलाकाराच्या, दिग्दर्शक, संगीतकार आणि तंत्रज्ञांच्या यशात रामोजी राव यांचा मोठा आशीर्वाद आहे.

हेही वाचा -

  1. रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांचं निधन - Ramoji Rao Passes Away
  2. "रामोजी रावांना श्रद्धांजली अपर्ण करण्याचा मार्ग म्हणजे भारतरत्न प्रदान करणे"-चित्रपट दिग्दर्शक राजमौली - ramoji rao passed away
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.