ETV Bharat / state

महिलांमध्येसुद्धा वाईट प्रवृत्ती; पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांनी जाळला 'हा' पुतळा

महिलादेखील वाईट प्रवृत्तीच्या असतात, असा आरोप करत पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांनी शूर्पणखाचे दहन केलंय. तसंच सरकारकडं विविध मागण्याही केल्यात.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Shurpanakha dahan on Dasara
पत्नी पीडित पुरुषांनी जाळला पुतळा (Source - ETV Bharat)

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन करायची परंपरा देशात साजरी केली जाते. पुरुषांमधील असलेल्या वाईट वृत्तीचा नायनाट करण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आलीय, परंतु पुरुष नाही तर स्त्रियांमध्येदेखील अशा प्रकारची चुकीची प्रवृत्ती आजच्या युगात पाहायला मिळते. त्यामुळेच पत्नी पीडित पुरुषांतर्फे शूर्पणखेला दहन करण्यात येते. वाळूज या एकमेव ठिकाणी ही अनोखी प्रथा सुरू करण्यात आली. गेल्या काही वर्षांमध्ये पत्नीपासून त्रस्त असलेल्या पुरुषांनादेखील न्यायाची गरज आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे महिलांसाठी कायदे आहेत, तसेच पुरुषांसाठीदेखील संरक्षण कायदे करण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय.

पीडित पुरुषांनी केले शूर्पणखा दहन : दसऱ्याला वाईटावर विजय मिळवत प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. त्यानंतर सीता मातेचे हरण केलेल्या रावणाचे दहन केले. पुरुषांमधील वाईट वृत्तीचा नायनाट करण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली. मात्र, कलियुगात पुरुषांप्रमाणे स्त्रियांनादेखील चुकीच्या प्रवृत्तीची लागण झालीय. रामायणात शूर्पणखेने रामाला भुलवण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच रामायण घडले आणि सर्वशक्तिमान, बुद्धिवान असलेल्या पराक्रमी रावणालाही अद्दल घडवली. आजच्या युगातदेखील अशा शूर्पणखा वाढल्या आहेत. त्यामुळे रावण जर वाईट होता तर शूर्पणखादेखील वाईट होती. त्यामुळे तिचंही दहन केलं पाहिजे, अस मत पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष भरत फुलारे यांनी व्यक्त केलंय.

पत्नी पीडित पुरुषांनी केलं शूर्पणखा दहन (Source - ETV Bharat Reporter)

पुरुषांसाठी कायदे तयार करा : महिलांवर होणारे अत्याचार वाढत असल्याने सरकारतर्फे वेगवेगळे कायदे तयार करण्यात आलेत. महिलांनी तक्रार केल्यावर तातडीनं पोलीस कारवाई सुरू होते. मात्र, या कायद्यांचा गैरवापर काही महिला करीत आहेत. त्या महिलेचा पती आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी न्यायालयात चकरा माराव्या लागतात. महिलेनं केलेली तक्रार खोटी निघाल्यास मात्र तिला शासन होत नाही. त्यामुळे पुरुषांच्या सुरक्षिततेसाठी देखील वेगळे कायदे असावेत, यासाठी अनेक वेळा पत्नी पीडित पुरुष आश्रमतर्फे आंदोलन करण्यात आलंय. सरकारकडे निवेदन देण्यात आलंय. कौटुंबिक त्रासातून अनेक पुरुषांनी आयुष्य उद्ध्वस्त झाल्याने आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे पुरुषांसाठी कायदे करावेत, अशी मागणी पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष भरत फुलारे यांनी केली.

हेही वाचा

  1. मुख्यमंत्र्यांकडून पोलीस पत्नींना 'घराचं गिफ्ट', दीड वर्षापासून रखडलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार
  2. "आचारसंहिता लागल्यावर भूमिका मांडणार, उलथापालथ करावी लागणार", मनोज जरांगे पाटलांचा इशारा
  3. ...अन् मंत्री दीपक केसरकरांनी घरोघरी जाऊन मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

छत्रपती संभाजीनगर : दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन करायची परंपरा देशात साजरी केली जाते. पुरुषांमधील असलेल्या वाईट वृत्तीचा नायनाट करण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आलीय, परंतु पुरुष नाही तर स्त्रियांमध्येदेखील अशा प्रकारची चुकीची प्रवृत्ती आजच्या युगात पाहायला मिळते. त्यामुळेच पत्नी पीडित पुरुषांतर्फे शूर्पणखेला दहन करण्यात येते. वाळूज या एकमेव ठिकाणी ही अनोखी प्रथा सुरू करण्यात आली. गेल्या काही वर्षांमध्ये पत्नीपासून त्रस्त असलेल्या पुरुषांनादेखील न्यायाची गरज आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे महिलांसाठी कायदे आहेत, तसेच पुरुषांसाठीदेखील संरक्षण कायदे करण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय.

पीडित पुरुषांनी केले शूर्पणखा दहन : दसऱ्याला वाईटावर विजय मिळवत प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. त्यानंतर सीता मातेचे हरण केलेल्या रावणाचे दहन केले. पुरुषांमधील वाईट वृत्तीचा नायनाट करण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली. मात्र, कलियुगात पुरुषांप्रमाणे स्त्रियांनादेखील चुकीच्या प्रवृत्तीची लागण झालीय. रामायणात शूर्पणखेने रामाला भुलवण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच रामायण घडले आणि सर्वशक्तिमान, बुद्धिवान असलेल्या पराक्रमी रावणालाही अद्दल घडवली. आजच्या युगातदेखील अशा शूर्पणखा वाढल्या आहेत. त्यामुळे रावण जर वाईट होता तर शूर्पणखादेखील वाईट होती. त्यामुळे तिचंही दहन केलं पाहिजे, अस मत पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष भरत फुलारे यांनी व्यक्त केलंय.

पत्नी पीडित पुरुषांनी केलं शूर्पणखा दहन (Source - ETV Bharat Reporter)

पुरुषांसाठी कायदे तयार करा : महिलांवर होणारे अत्याचार वाढत असल्याने सरकारतर्फे वेगवेगळे कायदे तयार करण्यात आलेत. महिलांनी तक्रार केल्यावर तातडीनं पोलीस कारवाई सुरू होते. मात्र, या कायद्यांचा गैरवापर काही महिला करीत आहेत. त्या महिलेचा पती आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी न्यायालयात चकरा माराव्या लागतात. महिलेनं केलेली तक्रार खोटी निघाल्यास मात्र तिला शासन होत नाही. त्यामुळे पुरुषांच्या सुरक्षिततेसाठी देखील वेगळे कायदे असावेत, यासाठी अनेक वेळा पत्नी पीडित पुरुष आश्रमतर्फे आंदोलन करण्यात आलंय. सरकारकडे निवेदन देण्यात आलंय. कौटुंबिक त्रासातून अनेक पुरुषांनी आयुष्य उद्ध्वस्त झाल्याने आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे पुरुषांसाठी कायदे करावेत, अशी मागणी पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष भरत फुलारे यांनी केली.

हेही वाचा

  1. मुख्यमंत्र्यांकडून पोलीस पत्नींना 'घराचं गिफ्ट', दीड वर्षापासून रखडलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार
  2. "आचारसंहिता लागल्यावर भूमिका मांडणार, उलथापालथ करावी लागणार", मनोज जरांगे पाटलांचा इशारा
  3. ...अन् मंत्री दीपक केसरकरांनी घरोघरी जाऊन मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.