ETV Bharat / state

महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता : वर्धा जिल्ह्यात राजकीय समीकरण बदललं, 'या' पक्षानं केला दावा - Mahavikas Aghadi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 10:54 PM IST

Mahavikas Aghadi : वर्धा जिल्ह्यात राजकीय समीकरण बदल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आगामी निवडणुकीसाठी रस्सीखेच होणार आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षाची डोकोदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Mahavikas Aghadi leaders
महाविकास आघाडीतील नेते (Etv Bharat File Photo)

वर्धा/नागपूर Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीनंतर कधी-काळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून अशी ओळख असणाऱ्या वर्धा जिल्ह्याची राजकीय परिस्थिती बदलेली दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देखील वर्धा जिल्ह्यात कामाला सुरवात केली आहे. त्यामुळं काँग्रेसच्या गोटात मात्र, काहीशी अस्वस्थता पसरू लागलेली आहे.

काँग्रेसची मोठी अडचण होणार : लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीत वाटाघाटी झाली. त्यानंतर काँग्रेस पक्षाचा हक्काच्या समजला जाणारा वर्धा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्यात आला. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत अनके दावेदार तयार झाले आहेत. यात शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे पक्ष सर्वात पुढं आहेत. उद्धव ठाकरे यांनी वर्धा, हिंगणघाट या दोन मतदारसंघावर दावा केलाय, तर राष्ट्रवादीसुद्धा आर्वी मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षाचे स्थानिक नेते परस्पर मतदारसंघ वाटून घेत, असल्यानं काँग्रेसची मोठी अडचण होणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.

शरद पवारांची ताकत वाढली : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये झालेल्या वाटाघाटीत काँग्रेसवासी अमर काळे हे ईच्छा नसतान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले. तसंच त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलाय. त्यामुळं स्वाभाविक राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धेत पक्षासाठी उज्वल भविष्य दिसत असल्यानं शरद पवार आपला जोर लावणार आहेत.

हिंगणघाटसह वर्धेवर उद्धव ठाकरेचा डोळा : दुसरीकडं हिंगणघाट मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आधीचं डोळा आहे. तशी तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पूर्वीपासून ताकत आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते हिंगणघाटनंतर वर्धेवर दावा सांगू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार अरविंद सावंत पश्चिम विदर्भ दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी वर्धा जिल्हाचा आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आदेश दिल्यानं हिंगणघाट विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे नेते कामाला लागले आहेत.

'हे' आहेत इच्छुक : महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांनीचं परस्पर मतदारसंघ वाटून घेत कामाला
सुरुवातीला केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेला हिंगणघाट मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे सेनापती सक्रिय झाली असून राजू खूपसरे यांनी हिंगणघाटवर दावा सांगितला आहे.

'हे' वाचलंत का :

  1. मुंबईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं स्वप्न; विरोधकांचा घेतला खरपूस समाचार - PM Narendra Modi in Mumbai
  2. फुटलेल्या आमदारांना जोड्याने मारा; विधानपरिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया - Jitendra Awhad
  3. ‘तेही आमच्यासोबत भाजपासारखेच वागले’; तर इंडिया आघाडीत राहायचं की नाही?...; कपिल पाटलांची पोस्ट चर्चेत - Kapil Patil On Mahavikas Aaghadi

वर्धा/नागपूर Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीनंतर कधी-काळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून अशी ओळख असणाऱ्या वर्धा जिल्ह्याची राजकीय परिस्थिती बदलेली दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देखील वर्धा जिल्ह्यात कामाला सुरवात केली आहे. त्यामुळं काँग्रेसच्या गोटात मात्र, काहीशी अस्वस्थता पसरू लागलेली आहे.

काँग्रेसची मोठी अडचण होणार : लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीत वाटाघाटी झाली. त्यानंतर काँग्रेस पक्षाचा हक्काच्या समजला जाणारा वर्धा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्यात आला. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत अनके दावेदार तयार झाले आहेत. यात शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे पक्ष सर्वात पुढं आहेत. उद्धव ठाकरे यांनी वर्धा, हिंगणघाट या दोन मतदारसंघावर दावा केलाय, तर राष्ट्रवादीसुद्धा आर्वी मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षाचे स्थानिक नेते परस्पर मतदारसंघ वाटून घेत, असल्यानं काँग्रेसची मोठी अडचण होणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.

शरद पवारांची ताकत वाढली : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये झालेल्या वाटाघाटीत काँग्रेसवासी अमर काळे हे ईच्छा नसतान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले. तसंच त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलाय. त्यामुळं स्वाभाविक राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धेत पक्षासाठी उज्वल भविष्य दिसत असल्यानं शरद पवार आपला जोर लावणार आहेत.

हिंगणघाटसह वर्धेवर उद्धव ठाकरेचा डोळा : दुसरीकडं हिंगणघाट मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आधीचं डोळा आहे. तशी तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पूर्वीपासून ताकत आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते हिंगणघाटनंतर वर्धेवर दावा सांगू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार अरविंद सावंत पश्चिम विदर्भ दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी वर्धा जिल्हाचा आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आदेश दिल्यानं हिंगणघाट विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे नेते कामाला लागले आहेत.

'हे' आहेत इच्छुक : महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांनीचं परस्पर मतदारसंघ वाटून घेत कामाला
सुरुवातीला केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेला हिंगणघाट मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे सेनापती सक्रिय झाली असून राजू खूपसरे यांनी हिंगणघाटवर दावा सांगितला आहे.

'हे' वाचलंत का :

  1. मुंबईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं स्वप्न; विरोधकांचा घेतला खरपूस समाचार - PM Narendra Modi in Mumbai
  2. फुटलेल्या आमदारांना जोड्याने मारा; विधानपरिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया - Jitendra Awhad
  3. ‘तेही आमच्यासोबत भाजपासारखेच वागले’; तर इंडिया आघाडीत राहायचं की नाही?...; कपिल पाटलांची पोस्ट चर्चेत - Kapil Patil On Mahavikas Aaghadi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.