ETV Bharat / state

'जय श्रीरामची भगवी पट्टी बांधल्यानं जीव वाचला'; मुस्लिम कारसेवकानं सांगितल्या 'त्या' थरारक आठवणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 7:54 PM IST

Muslim Karsevak : मुस्लिम कारसेवक फारुख शेख यांनी 1992 साली अयोध्येतली बाबरी ढाचा विध्वंसाच्या थरारक आठवणी सांगितल्या आहेत. 'मी' मुस्लिम असल्यानं मला अनेकांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कारसेवकांनी माझे प्राण वाचवले, असं त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

Muslim Karsevak Farooq Shaikh
Muslim Karsevak Farooq Shaikh
फारुख शेख आठवणी सांगताना

नागपूर Muslim Karsevak : 1992 साली अयोध्येतील बाबरीचा वादग्रस्त ढाचा कारसेवकांनी पाडला होता. या घटनेला आता 32 वर्ष लोटली आहेत. यात अनेक कारसेवकांनी आपला जीव देखील गमावला होता, तर काही सुखरूप परत आले होते. हजारोच्या संख्येनं अयोध्येला गेलेल्या या कारसेवकांमध्ये एक अशी व्यक्ती होती, ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

एकमेव मुस्लिम कारसेवक : सर्व जाती-धर्माचं बंधन झुगारून 14 वर्षीय (वय 1992 प्रमाणे) फारुख शेख कारसेवेत सहभागी झाले होते. आज त्याचं वय 46 असून त्या दिवशी अयोध्येत घडलेली प्रत्येक प्रसंगाबाबत त्यांनी थरारक अनुभव सांगितले. धर्मानं मुस्लिम असल्यानं त्या दिवशी कारसेवकांचा जमाव त्यांचा शोध घेत होता. त्यावेळी दिवंगत प्रभाकरराव दटके यांनी फारुख यांचा जीव वाचवला होता, तसंच साध्वी ऋतुंबरा यांनी त्यांचं स्वागत केलं होतं.

तिथे मंदिराचे पुरावे दिसत होते : अयोध्येतील वादग्रस्त बाबरी ढाचाचं माझ्या डोळ्यांनी मी निरीक्षण केलं, तेव्हा हा बाबरीचा ढाचा नसून मंदिराचा ढाचा असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. अनेक पुरावे तिथं दिसत होते. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं देखील यावर शिक्कामोर्तब केलंय, आता प्रत्येक मुस्लिमानं ते मान्य केलं पाहिजे, असं फारुख शेख म्हणतात.

'तो' जमाव माझ्या जीवावर उठला होता : फारुक शेख जेव्हा कारसेवेसाठी अयोध्येला गेले होते, त्यावेळी अयोध्येत देशभरातून कारसेवक आले होते. कारसेवकांच्या गर्दीत मुस्लिम मुलगा असल्याची माहिती कळल्यावर त्यावेळी तेथील सर्व लोकांनी संताप व्यक्त केला होता. त्यांना माहितीचं नव्हतं की, मी देखील एक कारसेवक आहे. लोकं माझ्या जीवावर उठले होते, मला जीवे मारण्यासाठी प्रयत्न झाले होते, असं शेख यांनी सांगितलं.

डोक्यावर भगवं कापड बांधून जीव वाचवला : कारसेवेवेळी जमाव माझा शोध घेत होता, त्या वेळी माझ्यासोबतच्या हिंदू कारसेवकांनी प्रसंगावधान ठेऊन माझ्या मस्तकावर भगवी पट्टी बांधली होती. तसंच त्यांनी हा मुलगा शिवा प्रसाद शाहू असल्याचं जमावाला सांगितलं होतं. त्यामुळं फारुख शेख यांचा जीव वाचला होता. कसेबसे नागपुरात परतल्यानंतर फारुख शेख यांना अनेक महिने मुस्लिम समाजातील लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.

आजही मुस्लिम समाजाची नाराजी : आता बाबरी घटनेला 32 वर्ष पूर्ण झाली आहे. मात्र, आजही मुस्लिम समाजातील बांधव आमच्यावर नाराज आहेत. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होत असताना देखील माझ्या कुटुंबाला धमक्या मिळत असल्याचं शेख यांनी सांगितलं.

मी इथंच मरणार : 'मी' या देशाचा नागरिक आहे. लहानाचा मोठा देखील इथंच झालो, मला इथल्या प्रत्येक धर्मात आस्था आहे. मी जन्मानं मुस्लिम असून मी मुस्लिम म्हणूनचं मरणार आहे. परंतु या देशाची धार्मिक ओळख जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळं 22 जानेवारील प्रत्येकानं आपापल्या घरी दिवे लावून राम उत्सव साजरा करावा, असं आवाहनही शेख यांनी केलंय.

'आरएसएस'सोबत संबंध : फारुख शेख यांचे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहेत. ते राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे पदाधिकारी म्हणून संघात काम करत आहेत.

हे वाचलंत का :

  1. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
  2. बाळासाहेबांनी 'ज्यांना' वाचवलं तेच शिवसेना संपवायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा
  3. कॉंग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवर आसाममध्ये गुन्हा; भाजपाकडून यात्रा उधळण्याचा कट असल्याचा कॉंग्रेसचा आरोप

फारुख शेख आठवणी सांगताना

नागपूर Muslim Karsevak : 1992 साली अयोध्येतील बाबरीचा वादग्रस्त ढाचा कारसेवकांनी पाडला होता. या घटनेला आता 32 वर्ष लोटली आहेत. यात अनेक कारसेवकांनी आपला जीव देखील गमावला होता, तर काही सुखरूप परत आले होते. हजारोच्या संख्येनं अयोध्येला गेलेल्या या कारसेवकांमध्ये एक अशी व्यक्ती होती, ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

एकमेव मुस्लिम कारसेवक : सर्व जाती-धर्माचं बंधन झुगारून 14 वर्षीय (वय 1992 प्रमाणे) फारुख शेख कारसेवेत सहभागी झाले होते. आज त्याचं वय 46 असून त्या दिवशी अयोध्येत घडलेली प्रत्येक प्रसंगाबाबत त्यांनी थरारक अनुभव सांगितले. धर्मानं मुस्लिम असल्यानं त्या दिवशी कारसेवकांचा जमाव त्यांचा शोध घेत होता. त्यावेळी दिवंगत प्रभाकरराव दटके यांनी फारुख यांचा जीव वाचवला होता, तसंच साध्वी ऋतुंबरा यांनी त्यांचं स्वागत केलं होतं.

तिथे मंदिराचे पुरावे दिसत होते : अयोध्येतील वादग्रस्त बाबरी ढाचाचं माझ्या डोळ्यांनी मी निरीक्षण केलं, तेव्हा हा बाबरीचा ढाचा नसून मंदिराचा ढाचा असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. अनेक पुरावे तिथं दिसत होते. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं देखील यावर शिक्कामोर्तब केलंय, आता प्रत्येक मुस्लिमानं ते मान्य केलं पाहिजे, असं फारुख शेख म्हणतात.

'तो' जमाव माझ्या जीवावर उठला होता : फारुक शेख जेव्हा कारसेवेसाठी अयोध्येला गेले होते, त्यावेळी अयोध्येत देशभरातून कारसेवक आले होते. कारसेवकांच्या गर्दीत मुस्लिम मुलगा असल्याची माहिती कळल्यावर त्यावेळी तेथील सर्व लोकांनी संताप व्यक्त केला होता. त्यांना माहितीचं नव्हतं की, मी देखील एक कारसेवक आहे. लोकं माझ्या जीवावर उठले होते, मला जीवे मारण्यासाठी प्रयत्न झाले होते, असं शेख यांनी सांगितलं.

डोक्यावर भगवं कापड बांधून जीव वाचवला : कारसेवेवेळी जमाव माझा शोध घेत होता, त्या वेळी माझ्यासोबतच्या हिंदू कारसेवकांनी प्रसंगावधान ठेऊन माझ्या मस्तकावर भगवी पट्टी बांधली होती. तसंच त्यांनी हा मुलगा शिवा प्रसाद शाहू असल्याचं जमावाला सांगितलं होतं. त्यामुळं फारुख शेख यांचा जीव वाचला होता. कसेबसे नागपुरात परतल्यानंतर फारुख शेख यांना अनेक महिने मुस्लिम समाजातील लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.

आजही मुस्लिम समाजाची नाराजी : आता बाबरी घटनेला 32 वर्ष पूर्ण झाली आहे. मात्र, आजही मुस्लिम समाजातील बांधव आमच्यावर नाराज आहेत. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होत असताना देखील माझ्या कुटुंबाला धमक्या मिळत असल्याचं शेख यांनी सांगितलं.

मी इथंच मरणार : 'मी' या देशाचा नागरिक आहे. लहानाचा मोठा देखील इथंच झालो, मला इथल्या प्रत्येक धर्मात आस्था आहे. मी जन्मानं मुस्लिम असून मी मुस्लिम म्हणूनचं मरणार आहे. परंतु या देशाची धार्मिक ओळख जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळं 22 जानेवारील प्रत्येकानं आपापल्या घरी दिवे लावून राम उत्सव साजरा करावा, असं आवाहनही शेख यांनी केलंय.

'आरएसएस'सोबत संबंध : फारुख शेख यांचे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहेत. ते राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे पदाधिकारी म्हणून संघात काम करत आहेत.

हे वाचलंत का :

  1. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
  2. बाळासाहेबांनी 'ज्यांना' वाचवलं तेच शिवसेना संपवायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा
  3. कॉंग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवर आसाममध्ये गुन्हा; भाजपाकडून यात्रा उधळण्याचा कट असल्याचा कॉंग्रेसचा आरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.