ETV Bharat / state

फिरायला गेलेली महिला समुद्राच्या भरतीमुळे बुडाली, जीवाची बाजी लावून पोलिसांनी वाचविले प्राण - Mumbai Police news

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 12:33 PM IST

Marine Drive News मुंबईतील मरीन ड्राइव्हवर पर्यटकांची तुफान गर्दी असते. पावसाळ्यात तर समुद्र किनाऱ्यावर अनेक पर्यटक फिरायला येतात. अशातच एका महिलेचा तोल घसरून ती पाण्यात बुडत असल्याची घटना घडली. विशेष म्हणजे भरतीच्या उंच लाटा असतानाही पोलिसांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता महिलेला जीवनदान दिलं.

Marine Drive
दोन पोलिसांनी वाचविले महिलेचं जीव (ETV Bharat Re[porter)

मुंबई Marine Drive : मुंबईतील मरीन ड्राइव्हवर समुद्र आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी अनेक लोक येतात. मात्र, मरीन ड्रायव्हर एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एक महिला सुंदर महल जंक्शन जवळ समुद्रात पडली होती. महिला समुद्रातील पाण्यात बुडत असल्याची माहिती मिळताचं सीपीआरच्या दोघा जवानांनी महिलेला जीवनदान दिलं, अशी माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांनी दिली आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

नेमकं काय घडलं: गुरुवारी पावणे तीनच्या सुमारास स्वाती कनानी (वय 59) ही महिला पाय घसरून समुद्रात पडली. हे समुद्रात पडलेल्या महिलेचं नाव असून त्या अविवाहित आहेत. महिला ही सुंदर महल जंक्शन जवळीत समुद्रात बुडत असल्याचं तेथे असलेल्या दोन सीपीआर प्लाटूमधील पोलिसांच्या नजरेस आलं. हायटाईड असूनदेखील पोलिसांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता महिलेला जीवनदान दिलं. हे बचावकार्य २० मिनिटे चालले. रिंग, टायर आणि सेफ्टी रस्सीचा वापर करून कॉन्स्टेबलनं पटकन कानानी या महिलेला पाण्यातून बाहेर काढले. किरण अशोक ठाकरे आणि अमोल ज्ञानदेव दहिफळे महिलेचे प्राण वाचवणाऱ्या पोलिसांची नावे आहेत. खबरदारी म्हणून त्यांनी महिलेला महिलेला जीटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. महिलेची प्रकृति स्थिर असून पर्स घेण्याच्या प्रयत्नात असताना तिचा तोल घसरला. ती सुमुद्रात पडली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

महिलेला पोलिसांनी दिलं जीवदान (ETV Bharat Reporter)

पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी: पोलीस अधिकारी अधिक महिती देताना म्हणाले की, "मला माझ्या हवालदारांचा अभिमान आहे. आमचे गस्त पथक विशेषत: मरीन ड्राइव्ह हा समुद्रकिनारी परिसर असल्याने नेहमी टायर, रिंग आणि सुरक्षितता दोर यांसारखी मूलभूत बचाव उपकरणे घेऊन सज्ज असतात. अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. अशा घटना आणखी घडण्याच्या शक्यता अधिक आहेत. कारण पावसाळ्यामध्ये मरीनला सतत गर्दी असते. तरी पर्यटकांनी फिरताना सावधगिरी बाळगावी," असे आवाहन त्यांनी केलं आहे.

हेही वाचा

  1. शिखर बँक घोटाळा प्रकरण : मुंबई पोलीस आणि ईडी विशेष न्यायालयात आमने सामने - Shikhar Bank Scam Case
  2. "मुंबईकरांनो, मला तुमची मदत हवीय"; उद्योगपती रतन टाटांनी मागितली श्वानासाठी मदत - Ratan Tata On Dog Blood Donor

मुंबई Marine Drive : मुंबईतील मरीन ड्राइव्हवर समुद्र आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी अनेक लोक येतात. मात्र, मरीन ड्रायव्हर एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एक महिला सुंदर महल जंक्शन जवळ समुद्रात पडली होती. महिला समुद्रातील पाण्यात बुडत असल्याची माहिती मिळताचं सीपीआरच्या दोघा जवानांनी महिलेला जीवनदान दिलं, अशी माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांनी दिली आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

नेमकं काय घडलं: गुरुवारी पावणे तीनच्या सुमारास स्वाती कनानी (वय 59) ही महिला पाय घसरून समुद्रात पडली. हे समुद्रात पडलेल्या महिलेचं नाव असून त्या अविवाहित आहेत. महिला ही सुंदर महल जंक्शन जवळीत समुद्रात बुडत असल्याचं तेथे असलेल्या दोन सीपीआर प्लाटूमधील पोलिसांच्या नजरेस आलं. हायटाईड असूनदेखील पोलिसांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता महिलेला जीवनदान दिलं. हे बचावकार्य २० मिनिटे चालले. रिंग, टायर आणि सेफ्टी रस्सीचा वापर करून कॉन्स्टेबलनं पटकन कानानी या महिलेला पाण्यातून बाहेर काढले. किरण अशोक ठाकरे आणि अमोल ज्ञानदेव दहिफळे महिलेचे प्राण वाचवणाऱ्या पोलिसांची नावे आहेत. खबरदारी म्हणून त्यांनी महिलेला महिलेला जीटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. महिलेची प्रकृति स्थिर असून पर्स घेण्याच्या प्रयत्नात असताना तिचा तोल घसरला. ती सुमुद्रात पडली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

महिलेला पोलिसांनी दिलं जीवदान (ETV Bharat Reporter)

पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी: पोलीस अधिकारी अधिक महिती देताना म्हणाले की, "मला माझ्या हवालदारांचा अभिमान आहे. आमचे गस्त पथक विशेषत: मरीन ड्राइव्ह हा समुद्रकिनारी परिसर असल्याने नेहमी टायर, रिंग आणि सुरक्षितता दोर यांसारखी मूलभूत बचाव उपकरणे घेऊन सज्ज असतात. अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. अशा घटना आणखी घडण्याच्या शक्यता अधिक आहेत. कारण पावसाळ्यामध्ये मरीनला सतत गर्दी असते. तरी पर्यटकांनी फिरताना सावधगिरी बाळगावी," असे आवाहन त्यांनी केलं आहे.

हेही वाचा

  1. शिखर बँक घोटाळा प्रकरण : मुंबई पोलीस आणि ईडी विशेष न्यायालयात आमने सामने - Shikhar Bank Scam Case
  2. "मुंबईकरांनो, मला तुमची मदत हवीय"; उद्योगपती रतन टाटांनी मागितली श्वानासाठी मदत - Ratan Tata On Dog Blood Donor
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.