ETV Bharat / state

४८ मतांचं महत्त्व काय असतं, हे संपूर्ण देशानं पाहिलं- रवींद्र वायकर - Ravindra Waikar News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 9:56 AM IST

Updated : Jun 5, 2024, 12:33 PM IST

Lok Sabha Election 2024 : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच विजय झालाय. या लोकसभा मतदारसंघातील सर्व फेऱ्या होईपर्यंत मतमोजणीच्या दरम्यान आघाडी पिछाडीचा खेळ पाहायला मिळाला.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 (Etv Bharat)

मुंबई Lok Sabha Election 2024 : मुंबईमधील उपनगरातील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात लढत पाहायला मिळाली. दोघांतील लढत शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीपर्यंत ठरली. मतमोजणीत कधी वायकर आघाडीवर होते, तर कधी कीर्तीकर आघाडीवर होते. मात्र शेवटी 48 मतांनी रवींद्र वायकर यांनी बाजी मारत विजय खेचून आणला.

Lok Sabha Election 2024 (ETV Bharat Reporter)

मुलगा ठाकरेंसोबत तर वडील शिंदेंसोबत : अमोल कीर्तिकर यांनी पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांची साथ दिली. त्याचं फळ त्यांना मिळालं. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांच्यावर विश्वास ठेवत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. गजानन कीर्तिकर यांनी मात्र रवींद्र वायकर यांचा प्रचार केला होता. त्यामुळं या ठिकाणची लढत चांगलीचं रंगल्याचं पाहायला मिळालं.

48 मतांनी निसटता विजय : सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत रवींद्र वायकर यांनी आघाडी घेतली होती. तर त्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी आघाडी घेतली होती. पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सर्व फेऱ्या होईपर्यंत मतमोजणीच्या दरम्यान आघाडी पिछाडीचा खेळ पाहायला मिळाला. शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठा लागलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांबरोबरच कार्यकर्त्यांचीदेखील धाकधूक वाढली होती.अखेर या अटीतटीच्या लढतीत वायकर यांना 4 लाख 52 हजार 644 तर किर्तीकर यांच्या पारड्यात 4 लाख 52 हजार 596 इतकी मतं पडली. यामध्ये वायकर यांचा अवघ्या 48 मतांनी निसटता विजय झाला. नोटा 15161 तर वंचित उमेदवार परमेश्वर रनशूर 6052 मते मिळाली. 26 फेऱ्या आणि टपालीमत पत्रिकांच्या निकालानंतर मुंबई उत्तर पश्चिममधील विजय उमेदवार घोषित करण्यात आला.



जिंकण्यासाठी लढायचं असत - रवींद्र वायकर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार रवींद्र वायकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "मला अवघे तेरा दिवस प्रचारासाठी मिळाले होते. माझ्यासोबत असलेले कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांच्या माध्यमातून मी मतदार संघातील मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केला. या सर्वात मोठा वाटा कार्यकर्त्यांचा होता. त्यांनी माझ्या विजयासाठी जीवाचं रान केलं."

48 मतांचं महत्त्व काय हे संपूर्ण देशानं पाहिलं- रवींद्र वायकर यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचेदेखील आभार मानले आहे. त्यांनी अतिशय कमी फरकानं पराभव झालेल्या अमोल कीर्तीकर यांची माफीदेखील मागितली आहे. "एक मताचं महत्त्व आणि 48 मतांचं महत्त्व काय, हे संपूर्ण देशानं पाहिलंय. त्यामुळं विजय विजय असतो," असं रवींद्र वायकर यांनी म्हटलंय.

हेही वाचा

मुंबई Lok Sabha Election 2024 : मुंबईमधील उपनगरातील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात लढत पाहायला मिळाली. दोघांतील लढत शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीपर्यंत ठरली. मतमोजणीत कधी वायकर आघाडीवर होते, तर कधी कीर्तीकर आघाडीवर होते. मात्र शेवटी 48 मतांनी रवींद्र वायकर यांनी बाजी मारत विजय खेचून आणला.

Lok Sabha Election 2024 (ETV Bharat Reporter)

मुलगा ठाकरेंसोबत तर वडील शिंदेंसोबत : अमोल कीर्तिकर यांनी पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांची साथ दिली. त्याचं फळ त्यांना मिळालं. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांच्यावर विश्वास ठेवत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. गजानन कीर्तिकर यांनी मात्र रवींद्र वायकर यांचा प्रचार केला होता. त्यामुळं या ठिकाणची लढत चांगलीचं रंगल्याचं पाहायला मिळालं.

48 मतांनी निसटता विजय : सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत रवींद्र वायकर यांनी आघाडी घेतली होती. तर त्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी आघाडी घेतली होती. पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सर्व फेऱ्या होईपर्यंत मतमोजणीच्या दरम्यान आघाडी पिछाडीचा खेळ पाहायला मिळाला. शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठा लागलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांबरोबरच कार्यकर्त्यांचीदेखील धाकधूक वाढली होती.अखेर या अटीतटीच्या लढतीत वायकर यांना 4 लाख 52 हजार 644 तर किर्तीकर यांच्या पारड्यात 4 लाख 52 हजार 596 इतकी मतं पडली. यामध्ये वायकर यांचा अवघ्या 48 मतांनी निसटता विजय झाला. नोटा 15161 तर वंचित उमेदवार परमेश्वर रनशूर 6052 मते मिळाली. 26 फेऱ्या आणि टपालीमत पत्रिकांच्या निकालानंतर मुंबई उत्तर पश्चिममधील विजय उमेदवार घोषित करण्यात आला.



जिंकण्यासाठी लढायचं असत - रवींद्र वायकर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार रवींद्र वायकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "मला अवघे तेरा दिवस प्रचारासाठी मिळाले होते. माझ्यासोबत असलेले कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांच्या माध्यमातून मी मतदार संघातील मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केला. या सर्वात मोठा वाटा कार्यकर्त्यांचा होता. त्यांनी माझ्या विजयासाठी जीवाचं रान केलं."

48 मतांचं महत्त्व काय हे संपूर्ण देशानं पाहिलं- रवींद्र वायकर यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचेदेखील आभार मानले आहे. त्यांनी अतिशय कमी फरकानं पराभव झालेल्या अमोल कीर्तीकर यांची माफीदेखील मागितली आहे. "एक मताचं महत्त्व आणि 48 मतांचं महत्त्व काय, हे संपूर्ण देशानं पाहिलंय. त्यामुळं विजय विजय असतो," असं रवींद्र वायकर यांनी म्हटलंय.

हेही वाचा

Last Updated : Jun 5, 2024, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.