ETV Bharat / state

जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडलं उपोषण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 9:05 AM IST

Updated : Jan 27, 2024, 2:29 PM IST

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केल्याचं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आमचा विरोध आता संपलाय. आमची विनंती मान्य करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. आज सकाळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपलं उपोषण सोडलंय.

Maratha Reservation
Maratha Reservation

मुंबई Maratha Reservation : राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यानं त्यांनी शनिवारी आंदोलन संपल्याची घोषणा केली. यानंतर मराठा आरक्षण कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण सोडलंय. तसंच उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी उपस्थितांना संबोधित केलंय.

सरकारच्या शिष्टमंडळानं मध्यरात्री घेतली भेट : मध्यरात्री कॅबिनेट मंत्री दीपक केसकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलं होतं. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्यांबाबत अधिसूचना काढण्यात आली. त्या अधिसूचनेची प्रत मनोज जरांगे यांच्याकडं सुपूर्द करण्यात आली. त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या आहेत. मागण्यांबाबत जीआर काढण्याची मागणी करण्यात आली होती.

काय होती मनोज जरांगे पाटलांची मागणी? : अंतरवलीसह महाराष्ट्रात दाखल झालेले सर्व गुन्हे मागं घेण्यात यावेत, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. त्यांचं शासन आदेश पत्र त्यांना दाखवावं, जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत मराठा समाजातील मुलांना शिक्षण मोफत करावं. यासोबतच शासकीय भरतीमध्ये मराठ्यांसाठी राखीव कोटा ठेवावा. आम्हाला कुणबी नोंदी शोधण्यात मदत करावी लागेल. नोंदी मिळाल्यावर सर्व नातेवाइकांना प्रमाणपत्रं देण्यात यावीत. तसंच नातेवाईकांबाबत अध्यादेश काढावा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं : सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटलं की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलंय. आमचा विरोध आता संपलाय. आमची विनंती मान्य करण्यात आलीय. त्यांचं पत्र आम्ही स्वीकारु." यानंतर त्यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्या उपोषणाची सांगता केली.

हेही वाचा :

  1. आझाद मैदानातून माघार घेण्यास मराठा आंदोलकांचा नकार
  2. मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस; 'मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता'
  3. आरक्षणाची मागणी कायद्याला धरूनच, मुंबईतून आरक्षण घेऊनच येणार - मनोज जरांगे पाटील

मुंबई Maratha Reservation : राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यानं त्यांनी शनिवारी आंदोलन संपल्याची घोषणा केली. यानंतर मराठा आरक्षण कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण सोडलंय. तसंच उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी उपस्थितांना संबोधित केलंय.

सरकारच्या शिष्टमंडळानं मध्यरात्री घेतली भेट : मध्यरात्री कॅबिनेट मंत्री दीपक केसकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलं होतं. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्यांबाबत अधिसूचना काढण्यात आली. त्या अधिसूचनेची प्रत मनोज जरांगे यांच्याकडं सुपूर्द करण्यात आली. त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या आहेत. मागण्यांबाबत जीआर काढण्याची मागणी करण्यात आली होती.

काय होती मनोज जरांगे पाटलांची मागणी? : अंतरवलीसह महाराष्ट्रात दाखल झालेले सर्व गुन्हे मागं घेण्यात यावेत, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. त्यांचं शासन आदेश पत्र त्यांना दाखवावं, जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत मराठा समाजातील मुलांना शिक्षण मोफत करावं. यासोबतच शासकीय भरतीमध्ये मराठ्यांसाठी राखीव कोटा ठेवावा. आम्हाला कुणबी नोंदी शोधण्यात मदत करावी लागेल. नोंदी मिळाल्यावर सर्व नातेवाइकांना प्रमाणपत्रं देण्यात यावीत. तसंच नातेवाईकांबाबत अध्यादेश काढावा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं : सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटलं की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलंय. आमचा विरोध आता संपलाय. आमची विनंती मान्य करण्यात आलीय. त्यांचं पत्र आम्ही स्वीकारु." यानंतर त्यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्या उपोषणाची सांगता केली.

हेही वाचा :

  1. आझाद मैदानातून माघार घेण्यास मराठा आंदोलकांचा नकार
  2. मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस; 'मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता'
  3. आरक्षणाची मागणी कायद्याला धरूनच, मुंबईतून आरक्षण घेऊनच येणार - मनोज जरांगे पाटील
Last Updated : Jan 27, 2024, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.