ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाबाबत भाजपाचा ठराव, परंतु फडणवीसांचा निर्णय अजूनही गुलदस्त्यातच - Devendra Fadnavsi Resign Issue

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 9:28 PM IST

Devendra Fadnavsi Resign Issue : अठराव्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या भाजपाच्या पिछेहाटीची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबई प्रदेश कार्यालयात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर त्यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील पिछेहाटीला स्वतःला जबाबदार ठरवत सरकारमधून त्यांना मोकळं करण्यात यावं, अशी इच्छा व्यक्त करून दाखवली. याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत आपलं मत मांडलं.

Devendra Fadnavsi Resign Issue
देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)

मुंबई Devendra Fadnavsi Resign Issue : केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेवरून महाराष्ट्रातील सर्व भाजपा आमदार आणि विधान परिषद सदस्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव मांडण्यात आले. पहिला ठराव हा पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा होता. तर दुसरा ठराव हा देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पिछेहाटीनंतर जी भूमिका मांडली आहे, ती त्यांनी परत घ्यावी याबद्दल होता; परंतु या ठरावानंतरसुद्धा देवेंद्र फडवणीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नसल्याने अजूनही देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.

चंद्रशेखर बावनकुळे फडणवीसांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर बोलताना (ETV Bharat Reporter)
मन परिवर्तन होऊन निर्णय बदलतील : मुंबईत भाजपा आमदारांच्या पार पडलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची मोठ्या प्रमाणामध्ये मनधरणी करण्यात आली. या मुद्द्यावर बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून सरकारमधून त्यांना मोकळं करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे; परंतु राज्यातील नेते, आमदार त्यांच्या मताशी सहमत नसून राज्याला पुढे नेण्यासाठी आणि पुन्हा मजबुतीने विधानसभेत पकड बनवण्यासाठी देवेंद्र फडवणीस यांची सरकारमध्ये महत्त्वाची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी भाजपा विधिमंडळ गटाने, सर्व भाजपा जिल्हाध्यक्षांनी ठराव मांडला असून त्यांचे मन परिवर्तन होऊन ते नक्कीच आपला निर्णय बदलतील असं बावनकुळे म्हणाले आहेत.

विधानसभेत पुन्हा महायुतीचा झेंडा : देवेंद्र फडवणीस यांना महाराष्ट्रातील पराभव अतिशय जिव्हारी लागला असल्या कारणाने त्यांनी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तसेच उत्तर प्रदेश या ठिकाणी भाजपाचा जो धोबीपछाड झाला आहे. त्यातून नेत्यांना सावरणं फार कठीण आहे. या दोन राज्यातील पराभवाने केंद्रातील भाजपाची समीकरण बदलली गेली आणि त्यांना नितेश कुमार तसेच चंद्रबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली. याकरिता आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पक्षाची झालेली हानी भरून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पूर्णवेळ पक्षासाठी देता यावा म्हणून त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडवणीस यांनीसुद्धा आजच्या बैठकीत पक्षाला या पराभवातून सावरत जोमाने कशा पद्धतीने पुढे नेता येईल, विधानसभेत पुन्हा महायुतीचा झेंडा कसा फडकवता येईल, याबाबत उपस्थित नेते आणि आमदारांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर राज्यातील नेत्यांनी, आमदारांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले; परंतु पक्षाकडून मांडण्यात आलेल्या ठरावावर त्यांनी कुठलंही भाष्य केलं नाही किंवा आपला निर्णय बदलला असल्याचंही सांगितलं नाही.

कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम : देवेंद्र फडवणीस सरकारमध्ये राहूनच चांगल्या प्रकारे पक्ष मजबूत करू शकतात अशी अनेक भाजपाच्या नेत्यांची, आमदारांची इच्छा आहे. देवेंद्र फडवणीस यांनी सरकारमधून बाहेर पडू नये या मतांवर ते सर्व ठाम आहेत. त्यातच जर देवेंद्र फडणवीस यांच्या जागी इतर कोणाची वर्णी लागली तर महायुतीच्या घटक पक्षांवर असलेला भाजपाचा दबदबा कमी होईल, अशी भीतीही भाजपा नेत्यांना सतावत आहे. देवेंद्र फडणवीस राजीनामा देऊ नये या मतावर अमित शाहसुद्धा ठाम आहेत. जर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर त्याचा परिणाम राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोबळावरसुद्धा होईल, असंही अमित शाह यांना वाटतं. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ जून रोजी शपथविधी आटोपल्यानंतर या विषयावर पुन्हा एकदा केंद्रात सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जातं. असं असलं तरी सध्यातरी देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.

हेही वाचा :

  1. नीट परीक्षेची सीबीआय चौकशी करा; शिक्षक, पालकांची मागणी - Neet Exam
  2. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा का घेतला निर्णय? देवेंद्र फडणवीस राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच बोलले - Devendra Fadnavis
  3. मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदासाठी शिवसेना पक्षातील नेते आग्रही - Shrikant Shinde should get cabinet

मुंबई Devendra Fadnavsi Resign Issue : केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेवरून महाराष्ट्रातील सर्व भाजपा आमदार आणि विधान परिषद सदस्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव मांडण्यात आले. पहिला ठराव हा पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा होता. तर दुसरा ठराव हा देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पिछेहाटीनंतर जी भूमिका मांडली आहे, ती त्यांनी परत घ्यावी याबद्दल होता; परंतु या ठरावानंतरसुद्धा देवेंद्र फडवणीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नसल्याने अजूनही देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.

चंद्रशेखर बावनकुळे फडणवीसांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर बोलताना (ETV Bharat Reporter)
मन परिवर्तन होऊन निर्णय बदलतील : मुंबईत भाजपा आमदारांच्या पार पडलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची मोठ्या प्रमाणामध्ये मनधरणी करण्यात आली. या मुद्द्यावर बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून सरकारमधून त्यांना मोकळं करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे; परंतु राज्यातील नेते, आमदार त्यांच्या मताशी सहमत नसून राज्याला पुढे नेण्यासाठी आणि पुन्हा मजबुतीने विधानसभेत पकड बनवण्यासाठी देवेंद्र फडवणीस यांची सरकारमध्ये महत्त्वाची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी भाजपा विधिमंडळ गटाने, सर्व भाजपा जिल्हाध्यक्षांनी ठराव मांडला असून त्यांचे मन परिवर्तन होऊन ते नक्कीच आपला निर्णय बदलतील असं बावनकुळे म्हणाले आहेत.

विधानसभेत पुन्हा महायुतीचा झेंडा : देवेंद्र फडवणीस यांना महाराष्ट्रातील पराभव अतिशय जिव्हारी लागला असल्या कारणाने त्यांनी या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तसेच उत्तर प्रदेश या ठिकाणी भाजपाचा जो धोबीपछाड झाला आहे. त्यातून नेत्यांना सावरणं फार कठीण आहे. या दोन राज्यातील पराभवाने केंद्रातील भाजपाची समीकरण बदलली गेली आणि त्यांना नितेश कुमार तसेच चंद्रबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली. याकरिता आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पक्षाची झालेली हानी भरून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पूर्णवेळ पक्षासाठी देता यावा म्हणून त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडवणीस यांनीसुद्धा आजच्या बैठकीत पक्षाला या पराभवातून सावरत जोमाने कशा पद्धतीने पुढे नेता येईल, विधानसभेत पुन्हा महायुतीचा झेंडा कसा फडकवता येईल, याबाबत उपस्थित नेते आणि आमदारांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर राज्यातील नेत्यांनी, आमदारांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले; परंतु पक्षाकडून मांडण्यात आलेल्या ठरावावर त्यांनी कुठलंही भाष्य केलं नाही किंवा आपला निर्णय बदलला असल्याचंही सांगितलं नाही.

कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम : देवेंद्र फडवणीस सरकारमध्ये राहूनच चांगल्या प्रकारे पक्ष मजबूत करू शकतात अशी अनेक भाजपाच्या नेत्यांची, आमदारांची इच्छा आहे. देवेंद्र फडवणीस यांनी सरकारमधून बाहेर पडू नये या मतांवर ते सर्व ठाम आहेत. त्यातच जर देवेंद्र फडणवीस यांच्या जागी इतर कोणाची वर्णी लागली तर महायुतीच्या घटक पक्षांवर असलेला भाजपाचा दबदबा कमी होईल, अशी भीतीही भाजपा नेत्यांना सतावत आहे. देवेंद्र फडणवीस राजीनामा देऊ नये या मतावर अमित शाहसुद्धा ठाम आहेत. जर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर त्याचा परिणाम राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोबळावरसुद्धा होईल, असंही अमित शाह यांना वाटतं. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ जून रोजी शपथविधी आटोपल्यानंतर या विषयावर पुन्हा एकदा केंद्रात सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जातं. असं असलं तरी सध्यातरी देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय गुलदस्त्यातच आहे.

हेही वाचा :

  1. नीट परीक्षेची सीबीआय चौकशी करा; शिक्षक, पालकांची मागणी - Neet Exam
  2. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा का घेतला निर्णय? देवेंद्र फडणवीस राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच बोलले - Devendra Fadnavis
  3. मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदासाठी शिवसेना पक्षातील नेते आग्रही - Shrikant Shinde should get cabinet
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.