ETV Bharat / state

Stone Pelting Case : विभागीय आयुक्तालयावर दगडफेक प्रकरणात 1500 आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 9:54 PM IST

Stone Pelting Case : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. याप्रकरणी आंदोलकांनी अंजनगाव (Anjangaon) येथील विभागीय आयुक्तालयावर दगडफेक केली होती. सदरील प्रकरणात 1500 आंदोलकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stone Pelting Case
दगडफेक प्रकरण

अमरावती Stone Pelting Case : अंजनगाव (Anjangaon) सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूरच्या (Pandhari Khanampur) स्वागत प्रवेशद्वाराच्या मुद्यावरून विभागीय आयुक्त कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या 1500 आंदोलकांविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, 11 जणांची नावे पुढे आली आहेत. अमरावती शहरासह अंजनगाव सुर्जी तालुक्यात शांतता असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुंषगानं पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. तर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.



अशी आहे घटना : पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असावं, या मागणीसाठी शेकडो आंदोलकांचे 11 मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन केले होते. दरम्यान आंदोलकाचे शिष्ठमंडळ विभागीय आयुक्त यांना भेटणार होते. परंतु आंदोलकातील काही पुरूष आणि महिलांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशगेटवर चढून जोर-जोराने प्रशासना विरुध्द घोषणाबाजी केली होती. सदर आंदोलकांना शांत राहण्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं होतं. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनीही आंदोलकांना समजावून सांगण्याचे बरेच प्रयत्न केले. परंतु सायंकाळी आंदोलनातील शिष्ठमंडळ विभागीय आयुक्त यांना भेटुन बाहेर येताच आंदोलकांनी उग्र रूप धारण केलं होतं.

अशी घडली घटना : आंदोलकांनी प्रशासनाविरुध्द घोषणाबाजी करून, हातातील पाण्याच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली होती. दरम्यान काही समाजकंटक आंदोलकांनी पोलीसांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक केली होती. त्यामुळं काही पोलिस जखमी झाले. तर दगडफेकीत शेकडो वाहनांचे नुकसान झाले. त्यामुळं आंदोलनाचे उग्र रूप पाहता सर्वप्रथम अग्निशामक दलाद्वारे पाण्याचा फवारा आंदोलकांवर करण्यात आला. पंरतु आंदोलकांनी पुन्हा हिंसक वळण घेतलं. त्यामुळं आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिस निरीक्षक निलेश करे यांच्या आदेशानं आंदोलकांच्या दिशेने अश्रुधुर फेकण्यात आले. दरम्यान पुन्हा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पोलिसांना आंदोलकांवर सौम्य बळाचा वापर करावा लागला. लाठीचार्ज पाहताच आंदोलकांनी तेथून पळ काढला. परंतु या हिंसक आंदोलनात 25 ते 30 पोलिस जखमी झाले आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.




सा‍‍‍‍र्वजनिक मालमत्तेचे नुकसान : या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये अग्निशमन वाहनांसह पोलीस वाहनांचेही मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये अग्निशमनचे एमएच 27-बीएक्स-6913 वाहन, आरसीपी वाहन क्रमांक एमएच 27 ए 9613, वज्र वाहन क्रमांक एमएच 27 एए 9323, वरूण वाहन क्रमांक एमएच 27 एए 5031, वाहतुक विभागाची दुचाकी क्रमांक एमएच 12 व्हीएस 3084 व इतर अनेक वाहने, खासगी वाहन क्रमांक एमएच 27 डीपी 0729, एमएच 27 डीपी 1711, अशा प्रकारचे वाहने आणि सार्वजनिक मालमत्तेचं अंदाजे 4 ते 5 लाख रूपयांचं नुकसान आंदोलकांनी केलं.




आंदोलनात 25 ते 30 पोलिस जखमी : आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये बंदोबस्तात असलेले पोलिस उपनिरीक्षक अविनाश नारनवरे, पोलीस अमंलदार सुदाम इंगळे, शेख अयुब खान, श्रीकांत मेश्राम, विक्की यादव, व्ही.आर.अहिरे यांच्यासह इतर 25 ते 30 पोलीस अधिकारी व अंमलदार जखमी झाले आहेत.



या आंदोलकांविरुध्द गुन्हे : पांढरी खानमपूर येथील प्रवेशद्वाराच्या नावासाठी झालेल्या हिंसक आंदोलनाची तक्रार 11 मार्च रोजी पोलिस उपनिरीक्षक गजानन प्रताप लोकडे (29) यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. त्यानुसार पोलिसांनी सतिष उत्तमराव इंगोले (48, रा.अचलपुर), दिलीप जानराव रायबोले (57), कैलास लक्ष्मण वाकपांजर (45), अजय बाबाराव रायबोले (25), पंकज मोहोड, बजरंग नागोराव राक्षसकर (42), छाया अभ्यंकर, सुनिल रायबोले, विनोद दुर्योधन रायबोले, रविन्द्र रामराव रायबोले ( 58), प्रज्ञा जनार्धन इंगोले (सर्व रा. पांढरी खानमपूर) आणि इतर 1000 ते 1500 अज्ञात पुरुष आणि महिलांविरुध्द बेकायदेशिर जमाव जमविणं, शासकीय कामात अडथळा करणं, पोलिस अधिकारी आणि अंमलदारांवर हल्ला करणं, इच्छापुर्वक दुखापत करणं तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, अशा भादंविच्या कलम 143, 147, 148, 149, 109, 117, 353, 332, 333, 427 सहकलम 3 सार्वजनिक मालमत्ता हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 सहकलम 135 महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.



पांढरी खानमपूरात वाढविला पोलिस बंदोबस्त : अमरावती येथे घडलेल्या घटनेनंतर अंजनगाव शहर, पांढरी खानमपूर गावातही पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पांढरी खानमपूर गावात पूर्वीपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र अमरावती येथे घडलेल्या घटनेनंतर तेथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच अंजनगाव शहरातील चौका- चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या आंदोलनप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. व्हीडीओ शुटींग, सीसीटीव्हींची तपासणी करून आरोपी निष्पन्न केलं जात आहे.

हेही वाचा -

  1. Stone Pelting In Shahada : शहादा दगडफेक प्रकरणात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 200 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
  2. बीड जाळपोळ आणि दगडफेक प्रकरण; 'या' प्रमुख आरोपींसह 262 जणांना घेतलं ताब्यात
  3. मराठा आरक्षण आंदोलन; अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणी मुख्य आरोपीला कोठडी, पोलिसांनी एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस केले जप्त

अमरावती Stone Pelting Case : अंजनगाव (Anjangaon) सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूरच्या (Pandhari Khanampur) स्वागत प्रवेशद्वाराच्या मुद्यावरून विभागीय आयुक्त कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या 1500 आंदोलकांविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, 11 जणांची नावे पुढे आली आहेत. अमरावती शहरासह अंजनगाव सुर्जी तालुक्यात शांतता असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुंषगानं पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. तर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.



अशी आहे घटना : पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असावं, या मागणीसाठी शेकडो आंदोलकांचे 11 मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन केले होते. दरम्यान आंदोलकाचे शिष्ठमंडळ विभागीय आयुक्त यांना भेटणार होते. परंतु आंदोलकातील काही पुरूष आणि महिलांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशगेटवर चढून जोर-जोराने प्रशासना विरुध्द घोषणाबाजी केली होती. सदर आंदोलकांना शांत राहण्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं होतं. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनीही आंदोलकांना समजावून सांगण्याचे बरेच प्रयत्न केले. परंतु सायंकाळी आंदोलनातील शिष्ठमंडळ विभागीय आयुक्त यांना भेटुन बाहेर येताच आंदोलकांनी उग्र रूप धारण केलं होतं.

अशी घडली घटना : आंदोलकांनी प्रशासनाविरुध्द घोषणाबाजी करून, हातातील पाण्याच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली होती. दरम्यान काही समाजकंटक आंदोलकांनी पोलीसांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक केली होती. त्यामुळं काही पोलिस जखमी झाले. तर दगडफेकीत शेकडो वाहनांचे नुकसान झाले. त्यामुळं आंदोलनाचे उग्र रूप पाहता सर्वप्रथम अग्निशामक दलाद्वारे पाण्याचा फवारा आंदोलकांवर करण्यात आला. पंरतु आंदोलकांनी पुन्हा हिंसक वळण घेतलं. त्यामुळं आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिस निरीक्षक निलेश करे यांच्या आदेशानं आंदोलकांच्या दिशेने अश्रुधुर फेकण्यात आले. दरम्यान पुन्हा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पोलिसांना आंदोलकांवर सौम्य बळाचा वापर करावा लागला. लाठीचार्ज पाहताच आंदोलकांनी तेथून पळ काढला. परंतु या हिंसक आंदोलनात 25 ते 30 पोलिस जखमी झाले आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.




सा‍‍‍‍र्वजनिक मालमत्तेचे नुकसान : या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये अग्निशमन वाहनांसह पोलीस वाहनांचेही मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये अग्निशमनचे एमएच 27-बीएक्स-6913 वाहन, आरसीपी वाहन क्रमांक एमएच 27 ए 9613, वज्र वाहन क्रमांक एमएच 27 एए 9323, वरूण वाहन क्रमांक एमएच 27 एए 5031, वाहतुक विभागाची दुचाकी क्रमांक एमएच 12 व्हीएस 3084 व इतर अनेक वाहने, खासगी वाहन क्रमांक एमएच 27 डीपी 0729, एमएच 27 डीपी 1711, अशा प्रकारचे वाहने आणि सार्वजनिक मालमत्तेचं अंदाजे 4 ते 5 लाख रूपयांचं नुकसान आंदोलकांनी केलं.




आंदोलनात 25 ते 30 पोलिस जखमी : आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये बंदोबस्तात असलेले पोलिस उपनिरीक्षक अविनाश नारनवरे, पोलीस अमंलदार सुदाम इंगळे, शेख अयुब खान, श्रीकांत मेश्राम, विक्की यादव, व्ही.आर.अहिरे यांच्यासह इतर 25 ते 30 पोलीस अधिकारी व अंमलदार जखमी झाले आहेत.



या आंदोलकांविरुध्द गुन्हे : पांढरी खानमपूर येथील प्रवेशद्वाराच्या नावासाठी झालेल्या हिंसक आंदोलनाची तक्रार 11 मार्च रोजी पोलिस उपनिरीक्षक गजानन प्रताप लोकडे (29) यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. त्यानुसार पोलिसांनी सतिष उत्तमराव इंगोले (48, रा.अचलपुर), दिलीप जानराव रायबोले (57), कैलास लक्ष्मण वाकपांजर (45), अजय बाबाराव रायबोले (25), पंकज मोहोड, बजरंग नागोराव राक्षसकर (42), छाया अभ्यंकर, सुनिल रायबोले, विनोद दुर्योधन रायबोले, रविन्द्र रामराव रायबोले ( 58), प्रज्ञा जनार्धन इंगोले (सर्व रा. पांढरी खानमपूर) आणि इतर 1000 ते 1500 अज्ञात पुरुष आणि महिलांविरुध्द बेकायदेशिर जमाव जमविणं, शासकीय कामात अडथळा करणं, पोलिस अधिकारी आणि अंमलदारांवर हल्ला करणं, इच्छापुर्वक दुखापत करणं तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, अशा भादंविच्या कलम 143, 147, 148, 149, 109, 117, 353, 332, 333, 427 सहकलम 3 सार्वजनिक मालमत्ता हानी प्रतिबंधक अधिनियम 1984 सहकलम 135 महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.



पांढरी खानमपूरात वाढविला पोलिस बंदोबस्त : अमरावती येथे घडलेल्या घटनेनंतर अंजनगाव शहर, पांढरी खानमपूर गावातही पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पांढरी खानमपूर गावात पूर्वीपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र अमरावती येथे घडलेल्या घटनेनंतर तेथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच अंजनगाव शहरातील चौका- चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या आंदोलनप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. व्हीडीओ शुटींग, सीसीटीव्हींची तपासणी करून आरोपी निष्पन्न केलं जात आहे.

हेही वाचा -

  1. Stone Pelting In Shahada : शहादा दगडफेक प्रकरणात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 200 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
  2. बीड जाळपोळ आणि दगडफेक प्रकरण; 'या' प्रमुख आरोपींसह 262 जणांना घेतलं ताब्यात
  3. मराठा आरक्षण आंदोलन; अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणी मुख्य आरोपीला कोठडी, पोलिसांनी एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस केले जप्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.