ETV Bharat / sports

कानपूर कसोटी: तिसऱ्या दिवशीही पाऊस मांडणार खेळ, आज मॅच होणार की नाही? कसं असेल हवामान; वाचा सविस्तर - Kanpur Weather Day 3

author img

By ETV Bharat Sports Team

Published : 2 hours ago

IND vs BAN 2nd Test Day 3 Weather Report : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ 35 षटकेच खेळता आली, तर दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. अशा परिस्थितीत या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हवामान कसं असेल, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

IND vs BAN 2nd Test Day 3 Weather Report
IND vs BAN 2nd Test Day 3 Weather Report (IANS Photo)

कानपूर IND vs BAN 2nd Test Day 3 Weather Report : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील कानपूर कसोटी सामन्यात पाऊस अजूनपर्यंत खलनायक ठरला आहे. पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा खेळ झाला तर दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. अशा स्थितीत तिसऱ्या दिवसाचा सामनाही पावसानं गमावला जाणार का, असा मोठा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. आम्ही कानपूरच्या तिसऱ्या दिवसाचे हवामान अपडेट घेऊन आलो आहोत. तिसऱ्या दिवशीचा सामना पावसानं पूर्णपणे वाहून जाईल किंवा थोडासा व्यत्यय येईल किंवा पाऊस अजिबात नसेल, कानपूर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे हवामान अपडेट जाणून घेऊया.

पहिल्या दिवशी 35 षटकांचा खेळ : या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पावसामुळं खेळ एक तास उशिरानं सुरु झाला. पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण झाला, मात्र दुसऱ्या सत्रात 9 षटकांनंतर पाऊस आला आणि दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. बांगलादेशनं 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळं पूर्णपणे वाया गेला.

दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही : सततच्या पावसामुळं एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचाही खेळ रद्द करण्यात आला. सकाळी हलक्या रिमझिम पावसानंतर मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. 11.15 च्या सुमारास पाऊस थांबला तेव्हा ग्राउंड्समननं तीन सुपर सॉपर तैनात केले. प्रकाश देखील स्पष्ट नव्हता, त्यामुळं खेळ अधिकृतपणे 2:15 वाजता रद्द करावा लागला. आता तिसऱ्या दिवसाच्या खेळाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

खेळाच्या तिसऱ्या दिवशी काय होईल? : रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशीही कानपूरमध्ये ढगाळ आकाश आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक हवामान वेबसाईट्सने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कानपूरमध्ये पावसाची 61 टक्के शक्यता आहे. रिमझिम पावसाचाही अंदाज आहे. तसंच शनिवारी संध्याकाळपासून रविवारी सकाळपर्यंत कानपूरमध्ये वादळांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळच्या अंदाजानुसार, सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 दरम्यान पाऊस पडू शकतो, त्यानंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवसाचा हवामानाचा अंदाज भीतीदायक आहे. तथापि, चाहत्यांना आणि खेळाडूंना आशा आहे की ते खेळाचा आनंद घेऊ शकतील.

चौथ्या आणि पाचव्या दिवशी होऊल सूर्यदेवाचं दर्शन : कसोटीच्या चौथ्या व पाचव्या दिवशी खेळ पाहता येईल. कारण सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी कानपूरमध्ये 3 टक्के आणि मंगळवारी पाचव्या दिवशी फक्त 1 टक्का पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी सूर्यप्रकाश असेल. मात्र, सकाळी हलके ढग येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, 1 ऑक्टोबर रोजी अंशतः ढगाळ वातावरण असेल, परंतु पावसाची फारशी शक्यता नाही.

हेही वाचा :

  1. कानपूर कसोटी पावसामुळं वाहून गेल्यास WTC ​च्या पॉइंट टेबलमध्ये भारताचं किती नुकसान होणार? - WTC Point Table Update
  2. भारत-बांगलादेश मालिकेदरम्यान युवा खेळाडूचा भीषण अपघात; BCCI करणार मोठी कारवाई? - Car Accident of Indian Cricketer

कानपूर IND vs BAN 2nd Test Day 3 Weather Report : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील कानपूर कसोटी सामन्यात पाऊस अजूनपर्यंत खलनायक ठरला आहे. पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा खेळ झाला तर दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. अशा स्थितीत तिसऱ्या दिवसाचा सामनाही पावसानं गमावला जाणार का, असा मोठा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. आम्ही कानपूरच्या तिसऱ्या दिवसाचे हवामान अपडेट घेऊन आलो आहोत. तिसऱ्या दिवशीचा सामना पावसानं पूर्णपणे वाहून जाईल किंवा थोडासा व्यत्यय येईल किंवा पाऊस अजिबात नसेल, कानपूर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे हवामान अपडेट जाणून घेऊया.

पहिल्या दिवशी 35 षटकांचा खेळ : या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पावसामुळं खेळ एक तास उशिरानं सुरु झाला. पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण झाला, मात्र दुसऱ्या सत्रात 9 षटकांनंतर पाऊस आला आणि दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. बांगलादेशनं 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळं पूर्णपणे वाया गेला.

दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही : सततच्या पावसामुळं एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचाही खेळ रद्द करण्यात आला. सकाळी हलक्या रिमझिम पावसानंतर मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. 11.15 च्या सुमारास पाऊस थांबला तेव्हा ग्राउंड्समननं तीन सुपर सॉपर तैनात केले. प्रकाश देखील स्पष्ट नव्हता, त्यामुळं खेळ अधिकृतपणे 2:15 वाजता रद्द करावा लागला. आता तिसऱ्या दिवसाच्या खेळाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

खेळाच्या तिसऱ्या दिवशी काय होईल? : रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशीही कानपूरमध्ये ढगाळ आकाश आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक हवामान वेबसाईट्सने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कानपूरमध्ये पावसाची 61 टक्के शक्यता आहे. रिमझिम पावसाचाही अंदाज आहे. तसंच शनिवारी संध्याकाळपासून रविवारी सकाळपर्यंत कानपूरमध्ये वादळांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळच्या अंदाजानुसार, सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 दरम्यान पाऊस पडू शकतो, त्यानंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवसाचा हवामानाचा अंदाज भीतीदायक आहे. तथापि, चाहत्यांना आणि खेळाडूंना आशा आहे की ते खेळाचा आनंद घेऊ शकतील.

चौथ्या आणि पाचव्या दिवशी होऊल सूर्यदेवाचं दर्शन : कसोटीच्या चौथ्या व पाचव्या दिवशी खेळ पाहता येईल. कारण सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी कानपूरमध्ये 3 टक्के आणि मंगळवारी पाचव्या दिवशी फक्त 1 टक्का पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी सूर्यप्रकाश असेल. मात्र, सकाळी हलके ढग येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, 1 ऑक्टोबर रोजी अंशतः ढगाळ वातावरण असेल, परंतु पावसाची फारशी शक्यता नाही.

हेही वाचा :

  1. कानपूर कसोटी पावसामुळं वाहून गेल्यास WTC ​च्या पॉइंट टेबलमध्ये भारताचं किती नुकसान होणार? - WTC Point Table Update
  2. भारत-बांगलादेश मालिकेदरम्यान युवा खेळाडूचा भीषण अपघात; BCCI करणार मोठी कारवाई? - Car Accident of Indian Cricketer
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.